शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कचरा प्रकल्पांच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 07:04 IST

शहराचा गेल्या दोन दशकांपासून गंभीर बनलेला कचराप्रश्न सोडविण्याऐवजी तो जटिल बनविण्यात आला आहे.

दीपक जाधवपुणे : शहराचा गेल्या दोन दशकांपासून गंभीर बनलेला कचराप्रश्न सोडविण्याऐवजी तो जटिल बनविण्यात आला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शहरात कच-यावर प्रक्रिया करणारे छोटे व मोठे प्रकल्प उभारण्याचा सपाटा लावून त्यावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला. तसेच त्यांना प्रत्येक टनामागे अनुदान देऊन पोसले गेले. मात्र, हे प्रकल्प कधीही पूर्ण क्षमतेने चालले नाहीत तर अनेक प्रकल्प मध्येच बंद पडले. तिथे कच-यापासून वीजनिर्मिती, बायोगॅस निर्माण करण्याचे प्रयोग सपशेल फसले आहेत. मात्र, त्याचा जाब प्रशासनाला कधीच विचारला गेला नाही.उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये उघड्यावर कचरा टाकण्यास तिथल्या ग्रामस्थांनी विरोध करण्यास सुरू केल्यानंतर हा प्रश्न गंभीर बनण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी प्रशासनाकडून याचा बागलबुवा उभा करून अंदाजपत्रकामध्ये यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे बजेट ठेवले. अत्यावश्यक बाब म्हणून शहराच्या विकासाचा पैसा त्यासाठी वळविण्यात आला. त्यानंतर कचराप्रश्न पूर्णपणे सुटणे आवश्यक असताना प्रत्यक्षात तो आणखीनच जटिल बनला आहे. कचºयापासून वीजनिर्मिती, बायोगॅस निर्मिती करण्याचे गोड स्वप्न दाखवून पुणेकरांच्या पैसा मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला.कचरा प्रकल्पांच्या या संपूर्ण गैरव्यवहाराची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी सजग नागरिक मंचामार्फत करण्यात आलेली आहे.बीओटी तत्त्वावर दररोज ७०० टन सुक्या कचºयावर प्रक्रिया होऊन वीजनिर्मिती करण्यासाठी रोकेम प्रकल्प उभारला गेला. मात्र तिथे वीजनिर्मिती कधी झालीच नाही. सध्या तिथे ३५० ते ४०० टन कचºयावर प्रक्रिया केली जात आहे. त्याचबरोबर शहरात ५ टन क्षमतेचे २५ प्रकल्प वीजनिर्मितीसाठी उभारले गेले. मात्र कचºयापासून वीज व बायोगॅस निर्मितीचे प्रयोग अनेकदासपशेल फसले असतानाही पुन्हा पुन्हा नव्याने प्रकल्प उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे.शहरात तयार होणारा कचरा जिरविणे हा साधा पायाभूत हेतूही या प्रकल्पांमधून साध्य होऊ शकला नाही. छोट्या १२५ टन क्षमतेच्या प्रकल्पांमध्ये फक्त ६० टक्के ओला कचरा पाठवला गेला. क्षमतेपेक्षा दर रोज किमान ४५ टन कचरा कमी पाठवला गेला.एकूण ४५ टन क्षमतेचे कºयापासून खतनिर्मिती करणारे प्रकल्प करण्यासाठी गेल्या २ वर्षांत १५ कोटी रुपये खर्च केले. या एकूण १० प्रकल्पातील वानवडी व विश्रांतवाडी प्रकल्प बंदच आहेत.कचराप्रश्न अभ्यास समिती स्थापनकचराप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊन तो प्रश्न जैसे थे तसाच आहे. या विभागाच्या धुरा वर्षानुवर्षे एकाच अधिकाºयांकडे आहे. या पार्श्वभूमीवर सर्व कचरा प्रकल्पांना भेटी देऊन त्याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्वयंसेवी संस्था व राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी एकत्र येऊन कचराप्रश्न अभ्यास समिती स्थापन केली आहे. मनसेचे शहर सचिव प्रशांत कनोजिया, वडगाव शेरी मंचचे आशिष माने, काँग्रेसचे सरचिटणीस हृषीकेश बालगुडे व लोकहित फाउंडेशनचे अजहर खान आदींकडून याचा अभ्यास केला जात आहे. सविस्तर लेखाजोखा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाणार आहे.बंद कचरा प्रकल्पांचा लेखाजोखाएक हजार मेट्रीक टनाचा हंजर प्रकल्प काही दिवसातच गुंडाळल्याने प्रचंड आर्थिक नुकसान.१०० टनांचा दिशा प्रकल्प बंद झाल्याने कोट्यवधींचा खर्चगेला पाण्यात.नागरिकांच्या विरोधामुळे मनपा कर्मशाळा, वर्तक उद्यान, झाशीची राणी पुतळा प्रकल्प बंद, लाखोंचा खर्च वाया.पेशवे पार्क येथील १, हडपसर १ व २, घोले रोड व कात्रज रेल्वे हे ५ प्रकल्प पूर्णपणे अनेकवेळा चालू-बंद.बाणेर (स्मार्ट सिटी भाग) प्रकल्प दोन वर्षांत ३ महिने बंद होता. तर कात्रज १ व पेशवे पार्क २ हे प्रकल्प या कालावधीत ४ महिने बंद होते.वानवडी प्रकल्पात मनपाने दिलेल्या माहितीनुसार १५ टक्केकचरा जिरवला जातो व त्यापासून गॅस निर्मितीही होते. मात्र स्थानिक नागरिकांच्या मते हा प्रकल्प गेल्या २ वर्षांपासून पूर्णपणे बंदच आहे.कात्रज १, वडगाव २, येरवडा हाउसिंग बोर्ड या तीन ठिकाणी या कालावधीत एकही युनिट वीजनिर्मिती झालेली नाही.

टॅग्स :Puneपुणे