शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
3
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
4
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
5
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
6
सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
7
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
8
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
9
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
10
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
11
"लोकशाहीचे वस्त्रहरण, १७ ईव्हीएम मशिनचे सील तोडून पुन्हा मतदान पण अद्याप गुन्हा दाखल नाही"
12
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
13
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
15
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
16
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
17
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
18
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
19
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
20
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
Daily Top 2Weekly Top 5

चासकमानचा डावा कालवा फुटण्याचा धोका, रेटवडीत मोठी गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:14 IST

रेटवडी (ता. खेड) येथे पिराचीवस्ती येथे चासकमान धरणाचा कालवाच्या पाण्याच्या गळतीमुळे घरात पाणी शिरले आहे. कालवा फुटण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे या भागातील आजू-बाजूचे शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत.

दावडी - रेटवडी (ता. खेड) येथे पिराचीवस्ती येथे चासकमान धरणाचा कालवाच्या पाण्याच्या गळतीमुळे घरात पाणी शिरले आहे. कालवा फुटण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे या भागातील आजू-बाजूचे शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत. स्थानिक रहिवासी जीव मुठीत धरून राहत असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाचे आम्हाला दुसरीकडे राहण्यासाठी जागाद्यावी, अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.चासकमान धरणाचे पाणी खेड, शिरूर तालुक्यातील शेतीला उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने धरणापासून १४४ किलोमीटर लांबीचा कालवा तयार केला. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे काम होऊन अनेक वर्षे झाली आहेत. हा कालवा मुरुम व मातीचा वापर करून बनविण्यात आला आहे. त्यासाठी काही ठिकाणी कालव्याचे अस्तरीकरण, पाण्यासाठी सिमेंटचे बांधकाम केलेले भुयारी मार्ग व पूल तयार केले आहेत. मात्र, या कालव्याच्या कामाला २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. त्यामुळे कालव्याचा भराव कमकुवत झाला आहे. रेटवडी येथील पिराचीवस्ती येथे १० कुटुंबे डाव्या कालव्यालगत पिढीजात राहत आहे. कालव्यासाठी त्यांच्या जमिनी गेल्या आहेत. उन्हाळा व पावसाळ््यात डाव्या कालव्यात सोडण्यात येते. यामुळे कालव्यात सोडण्यात आलेले पाणी लगतच्या घरामध्ये जात असल्याने घरांना धोका निर्माण झाला आहे. उन्हाळ्याप्रमाणे आता पावसाळ्यातही या कालव्याचे पाणी लगतच्या घरामध्ये झिरपत असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. भिंतींमध्ये पाणी झिरपत आहे, घराच्या आजूबाजूने पाणी वाहत आहे. काही ठिकाणी पाण्याची डबकी तयार होऊन रहिवाशांच्या घरांमध्ये पाण्याचे उमाळे फुटले आहेत.ओलसरपणा असल्यामुळे नीट झोपता येत नाही. सतत पाणी मुरत असल्याने भिंतीही कमकुवत झाल्या आहेत.सध्या पावसाळा असल्याने धरणाचा डावा कालवा तुडुंब भरून वाहत आहे. घरापुढील रस्त्यावरून पाण्याचा लोट वाहत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरियासारखे आजार फैलावत आहेत.डाव्या कालव्याच्या जमिनीलगत मोठे भगदाड पडले आहे. त्यामधून रोज लाखो लिटर पाणी बाहेर पडत आहे. कालव्याचा भराव कमकुवत झाल्यामुळे कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. कालवा फुटण्याची एखादी मोठी घटना घडल्यास बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे आदींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात कालवा फुटण्याचा धोका संभवतो.पाणीगळती व दुरुस्तीसंदर्भात स्थानिक रहिवासी व पदाधिकाºयांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. कालवा दुरुस्तीच्या कामासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. मात्र, भविष्यात कालवा फुटल्याची घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान व खर्चाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या