शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
2
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
3
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
4
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
5
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
6
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
7
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
8
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
9
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
10
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
11
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
12
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
13
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर
14
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
15
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
16
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
17
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
18
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
19
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
20
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले

चासकमानचा डावा कालवा फुटण्याचा धोका, रेटवडीत मोठी गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:14 IST

रेटवडी (ता. खेड) येथे पिराचीवस्ती येथे चासकमान धरणाचा कालवाच्या पाण्याच्या गळतीमुळे घरात पाणी शिरले आहे. कालवा फुटण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे या भागातील आजू-बाजूचे शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत.

दावडी - रेटवडी (ता. खेड) येथे पिराचीवस्ती येथे चासकमान धरणाचा कालवाच्या पाण्याच्या गळतीमुळे घरात पाणी शिरले आहे. कालवा फुटण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे या भागातील आजू-बाजूचे शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत. स्थानिक रहिवासी जीव मुठीत धरून राहत असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाचे आम्हाला दुसरीकडे राहण्यासाठी जागाद्यावी, अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.चासकमान धरणाचे पाणी खेड, शिरूर तालुक्यातील शेतीला उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने धरणापासून १४४ किलोमीटर लांबीचा कालवा तयार केला. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे काम होऊन अनेक वर्षे झाली आहेत. हा कालवा मुरुम व मातीचा वापर करून बनविण्यात आला आहे. त्यासाठी काही ठिकाणी कालव्याचे अस्तरीकरण, पाण्यासाठी सिमेंटचे बांधकाम केलेले भुयारी मार्ग व पूल तयार केले आहेत. मात्र, या कालव्याच्या कामाला २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. त्यामुळे कालव्याचा भराव कमकुवत झाला आहे. रेटवडी येथील पिराचीवस्ती येथे १० कुटुंबे डाव्या कालव्यालगत पिढीजात राहत आहे. कालव्यासाठी त्यांच्या जमिनी गेल्या आहेत. उन्हाळा व पावसाळ््यात डाव्या कालव्यात सोडण्यात येते. यामुळे कालव्यात सोडण्यात आलेले पाणी लगतच्या घरामध्ये जात असल्याने घरांना धोका निर्माण झाला आहे. उन्हाळ्याप्रमाणे आता पावसाळ्यातही या कालव्याचे पाणी लगतच्या घरामध्ये झिरपत असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. भिंतींमध्ये पाणी झिरपत आहे, घराच्या आजूबाजूने पाणी वाहत आहे. काही ठिकाणी पाण्याची डबकी तयार होऊन रहिवाशांच्या घरांमध्ये पाण्याचे उमाळे फुटले आहेत.ओलसरपणा असल्यामुळे नीट झोपता येत नाही. सतत पाणी मुरत असल्याने भिंतीही कमकुवत झाल्या आहेत.सध्या पावसाळा असल्याने धरणाचा डावा कालवा तुडुंब भरून वाहत आहे. घरापुढील रस्त्यावरून पाण्याचा लोट वाहत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरियासारखे आजार फैलावत आहेत.डाव्या कालव्याच्या जमिनीलगत मोठे भगदाड पडले आहे. त्यामधून रोज लाखो लिटर पाणी बाहेर पडत आहे. कालव्याचा भराव कमकुवत झाल्यामुळे कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. कालवा फुटण्याची एखादी मोठी घटना घडल्यास बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे आदींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात कालवा फुटण्याचा धोका संभवतो.पाणीगळती व दुरुस्तीसंदर्भात स्थानिक रहिवासी व पदाधिकाºयांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. कालवा दुरुस्तीच्या कामासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. मात्र, भविष्यात कालवा फुटल्याची घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान व खर्चाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या