शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

चासकमानचा डावा कालवा फुटण्याचा धोका, रेटवडीत मोठी गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:14 IST

रेटवडी (ता. खेड) येथे पिराचीवस्ती येथे चासकमान धरणाचा कालवाच्या पाण्याच्या गळतीमुळे घरात पाणी शिरले आहे. कालवा फुटण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे या भागातील आजू-बाजूचे शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत.

दावडी - रेटवडी (ता. खेड) येथे पिराचीवस्ती येथे चासकमान धरणाचा कालवाच्या पाण्याच्या गळतीमुळे घरात पाणी शिरले आहे. कालवा फुटण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे या भागातील आजू-बाजूचे शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत. स्थानिक रहिवासी जीव मुठीत धरून राहत असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाचे आम्हाला दुसरीकडे राहण्यासाठी जागाद्यावी, अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.चासकमान धरणाचे पाणी खेड, शिरूर तालुक्यातील शेतीला उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने धरणापासून १४४ किलोमीटर लांबीचा कालवा तयार केला. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे काम होऊन अनेक वर्षे झाली आहेत. हा कालवा मुरुम व मातीचा वापर करून बनविण्यात आला आहे. त्यासाठी काही ठिकाणी कालव्याचे अस्तरीकरण, पाण्यासाठी सिमेंटचे बांधकाम केलेले भुयारी मार्ग व पूल तयार केले आहेत. मात्र, या कालव्याच्या कामाला २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. त्यामुळे कालव्याचा भराव कमकुवत झाला आहे. रेटवडी येथील पिराचीवस्ती येथे १० कुटुंबे डाव्या कालव्यालगत पिढीजात राहत आहे. कालव्यासाठी त्यांच्या जमिनी गेल्या आहेत. उन्हाळा व पावसाळ््यात डाव्या कालव्यात सोडण्यात येते. यामुळे कालव्यात सोडण्यात आलेले पाणी लगतच्या घरामध्ये जात असल्याने घरांना धोका निर्माण झाला आहे. उन्हाळ्याप्रमाणे आता पावसाळ्यातही या कालव्याचे पाणी लगतच्या घरामध्ये झिरपत असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. भिंतींमध्ये पाणी झिरपत आहे, घराच्या आजूबाजूने पाणी वाहत आहे. काही ठिकाणी पाण्याची डबकी तयार होऊन रहिवाशांच्या घरांमध्ये पाण्याचे उमाळे फुटले आहेत.ओलसरपणा असल्यामुळे नीट झोपता येत नाही. सतत पाणी मुरत असल्याने भिंतीही कमकुवत झाल्या आहेत.सध्या पावसाळा असल्याने धरणाचा डावा कालवा तुडुंब भरून वाहत आहे. घरापुढील रस्त्यावरून पाण्याचा लोट वाहत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरियासारखे आजार फैलावत आहेत.डाव्या कालव्याच्या जमिनीलगत मोठे भगदाड पडले आहे. त्यामधून रोज लाखो लिटर पाणी बाहेर पडत आहे. कालव्याचा भराव कमकुवत झाल्यामुळे कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. कालवा फुटण्याची एखादी मोठी घटना घडल्यास बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे आदींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात कालवा फुटण्याचा धोका संभवतो.पाणीगळती व दुरुस्तीसंदर्भात स्थानिक रहिवासी व पदाधिकाºयांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. कालवा दुरुस्तीच्या कामासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. मात्र, भविष्यात कालवा फुटल्याची घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान व खर्चाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या