शहरं
Join us  
Trending Stories
1
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
2
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
3
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
4
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
5
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
6
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
7
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
8
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
9
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
10
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
11
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
12
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
13
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
14
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
15
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
16
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
17
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
18
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
19
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
20
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट

विद्यापीठ मान्यतेच्या नियमावलीत होणार बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 04:25 IST

एआययूमध्ये चार संशोधक विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाणार असून त्यांना विविध संशोधन प्रकल्पांवर काम करावे लागेल.

राहुल शिंदे पुणे : देशातील विद्यापीठांना मान्यता देण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या नियमावलीत बदल करण्याचा निर्णय असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीजने (एआययू) घेतला आहे. लवकरच या नियमांची अंमलबजावणी सुरू केली जाणार असल्याचे एआययुचे अध्यक्ष डॉ. माणिकराव साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

देशातील पारंपरिक विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे, मुक्त विद्यापीठे,अभिमत व खासगी आदी विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्याचे काम एआयूतर्फे काही वर्षांपासून सुरू आहे. बांगलादेश, भूतान, रिपब्लिक आॅफ कझाकस्तान, मलेशिया, नेपाळ, थायलंड आदी देशातील १३ विद्यापीठे एआययूचे सहयोगी सदस्य आहेत. देशाच्या उच्च शिक्षणाला दिशा देण्यात एआययूची भूमिका महत्त्वाची आहे.

डॉ. साळुंखे म्हणाले, माहिती तंत्रज्ञानामुळे पुढील काळात अनेक अभ्यासक्रम आॅनलाईन शिकविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यापीठांसाठी शेकडो एकर जागेची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे एआययूकडून विद्यापीठ मान्यतेच्या नियमावलीत बदल केले जाणार आहेत. परदेशातून पदवी प्राप्त करून भारतात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीची समकक्षता एआययूकडून तपासून दिली जाते. परदेशातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी भारतात येऊन शिक्षण घ्यावे. या उद्देशाने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार एआययूतर्फे ‘स्टडी इंडिया’हा उपक्रम राबविला जात आहे.

एआययूमध्ये चार संशोधक विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाणार असून त्यांना विविध संशोधन प्रकल्पांवर काम करावे लागेल. भारतात परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केल्यास काय होईल आदी विषयावर हे विद्यार्थी काम करतील, असेही त्यांनी सांगितले.जगभरातील घडामोडींचे जर्नल प्रसिद्ध करणारजगभरातील शिक्षण क्षेत्रात घडणाºया नावीन्यपूर्ण गोष्टींची व घडामोडींची माहिती माहिती व्हावी. या उद्देशाने एआययूतर्फे स्वतंत्र जर्नल प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यात प्रसिद्ध होणाºया लेखांची-शोधनिबंधांची गुणवत्ता तपासली जाईल. एआययूच्या संकेतस्थळावर जगभरातील विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी माहिती उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे परदेशी विद्यापीठांचे भारतातील विद्यापीठांशी करार करण्याचे काम सोपे होणार आहे, असे डॉ. साळुंखे म्हणाले.