शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ मान्यतेच्या नियमावलीत होणार बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 04:25 IST

एआययूमध्ये चार संशोधक विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाणार असून त्यांना विविध संशोधन प्रकल्पांवर काम करावे लागेल.

राहुल शिंदे पुणे : देशातील विद्यापीठांना मान्यता देण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या नियमावलीत बदल करण्याचा निर्णय असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीजने (एआययू) घेतला आहे. लवकरच या नियमांची अंमलबजावणी सुरू केली जाणार असल्याचे एआययुचे अध्यक्ष डॉ. माणिकराव साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

देशातील पारंपरिक विद्यापीठे, केंद्रीय विद्यापीठे, मुक्त विद्यापीठे,अभिमत व खासगी आदी विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्याचे काम एआयूतर्फे काही वर्षांपासून सुरू आहे. बांगलादेश, भूतान, रिपब्लिक आॅफ कझाकस्तान, मलेशिया, नेपाळ, थायलंड आदी देशातील १३ विद्यापीठे एआययूचे सहयोगी सदस्य आहेत. देशाच्या उच्च शिक्षणाला दिशा देण्यात एआययूची भूमिका महत्त्वाची आहे.

डॉ. साळुंखे म्हणाले, माहिती तंत्रज्ञानामुळे पुढील काळात अनेक अभ्यासक्रम आॅनलाईन शिकविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यापीठांसाठी शेकडो एकर जागेची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे एआययूकडून विद्यापीठ मान्यतेच्या नियमावलीत बदल केले जाणार आहेत. परदेशातून पदवी प्राप्त करून भारतात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीची समकक्षता एआययूकडून तपासून दिली जाते. परदेशातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी भारतात येऊन शिक्षण घ्यावे. या उद्देशाने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार एआययूतर्फे ‘स्टडी इंडिया’हा उपक्रम राबविला जात आहे.

एआययूमध्ये चार संशोधक विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाणार असून त्यांना विविध संशोधन प्रकल्पांवर काम करावे लागेल. भारतात परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केल्यास काय होईल आदी विषयावर हे विद्यार्थी काम करतील, असेही त्यांनी सांगितले.जगभरातील घडामोडींचे जर्नल प्रसिद्ध करणारजगभरातील शिक्षण क्षेत्रात घडणाºया नावीन्यपूर्ण गोष्टींची व घडामोडींची माहिती माहिती व्हावी. या उद्देशाने एआययूतर्फे स्वतंत्र जर्नल प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यात प्रसिद्ध होणाºया लेखांची-शोधनिबंधांची गुणवत्ता तपासली जाईल. एआययूच्या संकेतस्थळावर जगभरातील विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी माहिती उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे परदेशी विद्यापीठांचे भारतातील विद्यापीठांशी करार करण्याचे काम सोपे होणार आहे, असे डॉ. साळुंखे म्हणाले.