शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 06:14 IST

मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, त्याचा नागरिकांना त्रास होऊ नये. यासाठी ‘सीओईपी’च्या मदतीने वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, त्याचा नागरिकांना त्रास होऊ नये. यासाठी ‘सीओईपी’च्या मदतीने वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी प्रकल्पाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी वाहतुकीत टप्प्याटप्प्याने बदल करण्यात येणार असून, येत्या मंगळवारपासून (दि. २५) त्याची अंंमलबजावणी करण्यात येणार आहे. महामेट्रोचे मुख्य प्रकल्प समन्वयक श्रीनिवास कुलकर्णी, कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (सीओईपी)च्या नगर विकास विभागाचे प्रा. प्रताप रावळ, वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, महामेट्रोचे सल्लागार नीरज जैन यांनी प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत वाहतूक आराखड्याविषयी माहिती दिली. मेट्रोचा पिंपरी महापालिका ते रेंज हिल दरम्यानचा मार्गाचे काम पूर्ण होण्यास ३० महिन्यांचा कालावधी लागणार आहे. शहरात मेट्रोचे काम हे काँक्र ीटच्या मधल्या रस्त्यावर सुरू राहणार आहे. त्यामुळे हॅरीस पुलापासून मेगा मार्ट सिग्नल चौकापर्यंत महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक सर्व्हीस रस्त्याने वळविण्यात येणार आहे. हीच वाहतूक नाशिक फाटा चौकातून पुढे खराळवाडी येथील इंडियन आॅईल पेट्रोल पंपापर्यंत पुन्हा सर्व्हीस रस्त्याने वळविण्यात येईल.खराळवाडी येथून पुण्याकडे येणारी वाहतूक ही केवळ मधल्या काँक्रीट रस्त्यानेच सुरू राहील. खराळवाडी ते नाशिक फाटा आणि पुढे मेगा मार्ट चौक ते पुढे हॅरीस पुलापर्यंत ही वाहतूक मधल्या एका मार्गामधून सुरू राहील. पूर्ण एक मार्ग केवळ मेट्रोच्या कामासाठी राखीव ठेवण्यात येईल, असे प्रा. प्रताप रावळ यांनी सांगितले.बीआरटी मार्ग दुचाकीसाठीमेट्रोचे काम सुरू असलेल्या रस्त्यावर आवश्यक ते दिशादर्शक, सूचना फलक बसवावे. याबरोबरच रस्त्याला ज्या ठिकाणी वळण दिले असेल त्याअगोदर ५०० मीटर अंतरावर हा सूचना फलक लावावा. रात्री वाहनासाठी रिफ्लेक्टर, ब्लिंकर्स लावावेत. वाहतूक सुरळीत रहावी यासाठी दिवसाच्या तीन शिफ्टमध्ये या ठिकाणी वाहतूक वॉर्डन तैनात असतील. या काळात बीआरटी लेनमधूनही दुचाकी वाहतूक सुरू करावी, अशा सूचना पालिकेला केल्याचे राजेंद्र भामरे यांनी सांगितले. नाशिक फाटा उड्डाणपुलाला वळसाप्रस्तावित मेट्रो मार्गाला नाशिक फाटा उड्डाणपुलाचा अडथळा ठरणार आहे. त्यामुळे हा उड्डाणपुल पाडण्यात येणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्याविषयी मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी म्हणाले, ‘‘उड्डाणपुलाला मेट्रोचा कोणताही धोका नाही. टाटा उड्डाणपुलाला वळसा घालून मेट्रो जाणार आहे.’’