शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

हमीभावाचे धोरण बदला; निर्यातीसाठी सवलत द्या, विघ्नहरच्या गळीत हंगामाचा शुभारंभ; जीएसटीमुळे महागाई वाढत चाललीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:03 IST

नारायणगाव : नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाही; उलट व्यावसायिक गुंतवणूकदार अडचणीत येऊन भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे.

नारायणगाव : नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाही; उलट व्यावसायिक गुंतवणूकदार अडचणीत येऊन भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. सदोष जीएसटी प्रणालीमुळे महागाई वाढलेली आहे. कर्जमाफीचा शेतक-यांना फायदा झालेला नाही, अशी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करून हमीभावाचे धोरण बदलले पाहिजे, निर्यातीसाठी सवलत दिली पाहिजे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३२व्या गळीत हंगामचा शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाईस चेअरमन घोलप, सुमित्राताई शेरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवके वळसे-पाटील, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड़ संजय काळे, जि़ प़ गटनेत्या आशाताई बुचके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, शरद लेंडे, पांडुरंग पवार, कारखान्याचे सर्व संचालक, शेतकरी, सभासद, विविध गावांचे सरपंच, कारखान्याचे अधिकारी, सोसायट्यांचे चेअरमन आदी मान्यवर उपस्थित होते़पवार म्हणाले, की जीएसटी प्रणाली सदोष आहे. दुधावर जीएसटी नाही; परंतु दुधावर असलेल्या प्रॉडक्टवर जीएसटी लागू केल्याने दरवाढ झाली आहे. जीएसटीमुळे महागाई वाढत चालली आहे़ अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाल्याने सर्वसामान्य शेतकºयांना त्याचा फटका बसला आहे. कारखान्यांना निर्यातीसाठी सवलती दिल्या पाहिजेत. निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले, तरच शेतकरी टिकेल़ शेती व शेतकºयांची परस्थिती बदलली पाहिजे. यासाठी किंमत व धोरण बदलेले पाहिजे़ भविष्यात सामुदायिक शेती ही काळाची गरज आहे़विघ्नहर कारखाना उत्तमरीत्या सुरू आहे़ या वर्षी उसाचे टनेज वाढणार असल्याने गळिताची जबाबदारी विघ्नहरने घ्यावी़ यापुढेही काटकसरीने कारखाना चालवावा, असा सल्ला पवार यांनी या वेळी दिला़दिलीप वळसे-पाटील म्हणाले, की शेतकरी जगला तरच देश पुढे जाईल़ मोदींनी शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले; मात्र ते पाळण्यात आलेले नाही़ शेतकºयांना कर्जमाफी नाही, हमीभाव नाही, कर्जमाफीसाठी शेतकºयांना हेलपाटे मारावे लागत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.पूर्वीचे सरकार असताना अडचणी होत्या़ आत्ताचे सरकार असूनही अडचणी आहेत़ आम्ही सत्तेत आहोत किंवा नाही हे माहीत नाही; परंतु हे सरकार शेतकºयांचे नाही़, अशी टीका अध्यक्षीय भाषणात खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केली. त्यांनी बैलगाडा शर्यती जिव्हाळ्याचा विषय असून त्याबाबत कायदा होऊनदेखील अंमलबजावणी होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.शरद पवार हे रयतेचे राजे असून दूरदृष्टी असलेले नेते आहेत, असे गौरवोद्गार आमदार शरद सोनवणे यांनी या वेळी काढले.चेअरमन सत्यशील शेरकर यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले यांनी सूत्रसंचालन केले़ कारखान्याचे व्हा़ चेअरमन अशोक घोलप यांनी आभार मानले़