शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

हमीभावाचे धोरण बदला; निर्यातीसाठी सवलत द्या, विघ्नहरच्या गळीत हंगामाचा शुभारंभ; जीएसटीमुळे महागाई वाढत चाललीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:03 IST

नारायणगाव : नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाही; उलट व्यावसायिक गुंतवणूकदार अडचणीत येऊन भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे.

नारायणगाव : नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाही; उलट व्यावसायिक गुंतवणूकदार अडचणीत येऊन भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. सदोष जीएसटी प्रणालीमुळे महागाई वाढलेली आहे. कर्जमाफीचा शेतक-यांना फायदा झालेला नाही, अशी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करून हमीभावाचे धोरण बदलले पाहिजे, निर्यातीसाठी सवलत दिली पाहिजे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३२व्या गळीत हंगामचा शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाईस चेअरमन घोलप, सुमित्राताई शेरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवके वळसे-पाटील, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड़ संजय काळे, जि़ प़ गटनेत्या आशाताई बुचके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, शरद लेंडे, पांडुरंग पवार, कारखान्याचे सर्व संचालक, शेतकरी, सभासद, विविध गावांचे सरपंच, कारखान्याचे अधिकारी, सोसायट्यांचे चेअरमन आदी मान्यवर उपस्थित होते़पवार म्हणाले, की जीएसटी प्रणाली सदोष आहे. दुधावर जीएसटी नाही; परंतु दुधावर असलेल्या प्रॉडक्टवर जीएसटी लागू केल्याने दरवाढ झाली आहे. जीएसटीमुळे महागाई वाढत चालली आहे़ अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाल्याने सर्वसामान्य शेतकºयांना त्याचा फटका बसला आहे. कारखान्यांना निर्यातीसाठी सवलती दिल्या पाहिजेत. निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले, तरच शेतकरी टिकेल़ शेती व शेतकºयांची परस्थिती बदलली पाहिजे. यासाठी किंमत व धोरण बदलेले पाहिजे़ भविष्यात सामुदायिक शेती ही काळाची गरज आहे़विघ्नहर कारखाना उत्तमरीत्या सुरू आहे़ या वर्षी उसाचे टनेज वाढणार असल्याने गळिताची जबाबदारी विघ्नहरने घ्यावी़ यापुढेही काटकसरीने कारखाना चालवावा, असा सल्ला पवार यांनी या वेळी दिला़दिलीप वळसे-पाटील म्हणाले, की शेतकरी जगला तरच देश पुढे जाईल़ मोदींनी शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले; मात्र ते पाळण्यात आलेले नाही़ शेतकºयांना कर्जमाफी नाही, हमीभाव नाही, कर्जमाफीसाठी शेतकºयांना हेलपाटे मारावे लागत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.पूर्वीचे सरकार असताना अडचणी होत्या़ आत्ताचे सरकार असूनही अडचणी आहेत़ आम्ही सत्तेत आहोत किंवा नाही हे माहीत नाही; परंतु हे सरकार शेतकºयांचे नाही़, अशी टीका अध्यक्षीय भाषणात खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केली. त्यांनी बैलगाडा शर्यती जिव्हाळ्याचा विषय असून त्याबाबत कायदा होऊनदेखील अंमलबजावणी होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.शरद पवार हे रयतेचे राजे असून दूरदृष्टी असलेले नेते आहेत, असे गौरवोद्गार आमदार शरद सोनवणे यांनी या वेळी काढले.चेअरमन सत्यशील शेरकर यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले यांनी सूत्रसंचालन केले़ कारखान्याचे व्हा़ चेअरमन अशोक घोलप यांनी आभार मानले़