शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

सैनिकांबाबतची मानसिकता बदला

By admin | Updated: February 21, 2017 03:15 IST

‘सैनिक अतिशय खडतर आणि धोक्याच्या पद्धतीने जगतात व आपल्या देशाचे, देशवासियांचे रक्षण करतात. पाकिस्तानसह इतर शेजारी

पुणे : ‘सैनिक अतिशय खडतर आणि धोक्याच्या पद्धतीने जगतात व आपल्या देशाचे, देशवासियांचे रक्षण करतात. पाकिस्तानसह इतर शेजारी देशांकडून होणाऱ्या विश्वासघातकी कारवाया उधळून लावतात. त्यांच्यामुळेच भारतीय नकाशाचे स्थान टिकून आहे. मात्र, समाजाची त्यांच्याप्रती मानसिकता अतिशय संकुचित असून, ती बदलण्याची गरज आहे’, असे मत लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी केले.लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल रिजन-१ च्या वतीने आयोजित ‘शौर्य... गाथा अभिमानाची’ या कार्यक्रमात प्रभुदेसाई बोलत होत्या. लायन्स क्लबचे जिल्हा प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, रेखा शेट्टी, रिजन चेअरपर्सन सुनील पंडित, माधुरी पंडित, उपप्रांतपाल गिरीश मालपाणी, रमेश शहा, समन्वयक आनंद आंबेकर, विभागीय अध्यक्ष बलविंदर राणा, राजगोपाल कट्टी व विलास मुळे आदी उपस्थित होते.सुनील पंडित यांनी उपक्रमांची माहिती दिली. आनंद आंबेकर यांनी स्वागत केले. सतीश धोका, प्रदीप बर्गे आणि विनीता खोसे यांनी सूत्रसंचालन केले. विलास मुळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)१ ‘सैनिकांच्याप्रती आदराची भावना ठेवली पाहिजे. वारंवार सैनिकही समाजाचे चित्र बदलावे, अशी आशा व्यक्त करतात. भारतीय सैनिक स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी सीमेवर उभे आहेत. प्राणांचे बलिदान देत आहेत. २ आपण त्यांच्या जीवावर सुखी जीवन जगत असूनही, त्यांच्याप्रती संतापजनक वक्तव्य करतो, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. भारतीय सैनिकांप्रती आदर, विश्वास आणि अभिमान ठेवला, तर त्यांचे मनोधैर्य वाढेल आणि सीमाभागात येणाऱ्या सर्व संकटांचा ते सामना करू शकतील. तेव्हा सैनिकांप्रती समाजाची भावना बदलण्यासाठी लायन्स क्लब्जसारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे त्या म्हणाल्या.३ चंद्रहास शेट्टी म्हणाले, ‘समाजाची सेवा करण्याचे भाग्य लायन्स क्लबला लाभले आहे. शंभर वर्षांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी लायन्स आगामी काळातही कटिबद्ध आहे.’