शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक धोरणातच बदल व्हावा

By admin | Updated: February 28, 2017 06:43 IST

प्राचीन इतिहास पाहिल्यास आपल्या असे लक्षात येते, की मानवाच्या परिस्थितीमध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा ह्या केवळ विज्ञानामुळे झाल्याचे दिसून येते.

-डॉ. जे. के. सोळंकी प्राचीन इतिहास पाहिल्यास आपल्या असे लक्षात येते, की मानवाच्या परिस्थितीमध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा ह्या केवळ विज्ञानामुळे झाल्याचे दिसून येते. आणि निश्चितच विज्ञानामुळे मानवी समाजाची प्रगती झालेली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान हे मानवाच्या कल्याणासाठीच असावे, असे सर्वांना माहीत असूनही काही अविचारी लोक याचा दुरुपयोग करीत आहे. काही स्वार्थी व अविचारी लोकांच्या फायद्यासाठी समाजात अंधश्रद्धा आजही पसरविल्या जात आहेत व विज्ञान माहीत असूनही लोक आमिषाला बळी पडतात. यासाठी वरचेवर विज्ञान प्रसार केला पाहिजे व लोकांना विज्ञानवादी बनविले पाहिजे. वैज्ञानिकदृष्ट्या भारताने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे व दिवसेंदिवस त्यामध्ये भर पडत आहे. त्यामुळे पाश्चात्य जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला आहे. परंतु अजून खूप काही करायचे आहे. त्यासाठी भारतात विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती खूप वेगाने चालू ठेवली पाहिजे. भारत ही जगातील ज्ञान विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नक्कीच महासत्ता होईल; परंतु त्यासाठी देशातील प्रत्येकाने मनापासून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत.मुळात मूलभूत विज्ञान हे विकासात्मक संशोधनाचा पाया असतो; परंतु मूलभूत विज्ञान क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी येण्यास तयार होत नाहीत, अर्थात याला काही प्रमाणात शैक्षणिक धोरणे व नोकरींची उपलब्धता हेही जबाबदार आहेत. मूलभूत विज्ञानाकडे करियर म्हणून पाहिले पाहिजे जरी यामध्ये पैसा कमी मिळत असला तरीही...! शैक्षणिक धोरणे बदलाने, नोकरींची भरपूर प्रमाणात उपलब्धता करणे व चांगल्या प्रमाणात पैसा उपलब्ध करून देणे हे प्रयत्न तर केलेच पाहिजेत. याचबरोबर खासगी कंपन्यांना व उद्योगांना यामध्ये समाविष्ट केले पाहिजे. (विज्ञान दिनामागचं गुपित!)(अवघा देश ‘विज्ञानाभिमुख’ व्हावा)प्रसारमाध्यमामध्ये विज्ञान विषयाबद्दल लिहिण्यासाठी पत्रकारांना प्रशिक्षण देणे तसेच त्यांना विज्ञानावर आधारित लेखासाठी चांगले मानधन देणे गरजेचे आहे. प्रसारमाध्यमे व विज्ञान संस्था यांच्यात वारंवार संपर्क व संवाद झाला पाहिजे. वरील बाबींचा पाठपुरावा केल्यास अभ्यासू पत्रकार प्रसारमाध्यमाच्या सदुपयोगातून विज्ञान प्रसार नक्कीच करतील, असा विश्वास आहे!जीएमआरटी प्रकल्प प्रमुख, खोडद (नारायणगाव)