शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

चाकणला स्वतंत्र पाणी योजनेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:19 IST

१0 वर्षांत चाकणचे गावखेड्याचे रूप बदलून शहरीकरण झाले. ग्रामपंचायतीची नगरपालिका झाली त्याला दीड वर्ष झाले. नगर परिषदेची सत्ता शिवसेनेने ताब्यात घेऊन आपला पहिला नगराध्यक्ष केला. नुकताच नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्याने पुन्हा सत्ता ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आले. राजकीय घडामोडी घडत आहेत; मात्र चाकणच्या मूलभूत समस्यांत काय बदल झाला? याचा ‘लोकमत’ने आढावा घेतला. चाकणकरांना सध्या दिवसाआड पाणी मिळत असून तहान भागत असली, तरी भविष्यातील वाढते नागरीकरण पाहता, चाकणला स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची गरज आहे.

- चंद्रकांत मांडेकर चाकण : नगर परिषद सध्या हजार लिटरला ८ रुपये देऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून विकतचे पाणी चाकणकरांना पुरवत आहे. सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे पाण्यासाठी तशी ‘बोंब’ शहरात होत नाही. मात्र, २०११च्या जनगणनेनुसार चाकणची लोकसंख्या ४१ हजार ११३ अशी असली, तरी शहरात त्याच्या दुप्पट म्हणचे लाखाच्या आसपास लोक राहतात. हा नागरीकरणाचा वाढता वेग पाहता, भविष्यात पाणी ही मोठी समस्या चाकण नगर परिषदेसमोर असणार आहे. यासाठी शहराला स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची गरज आहे.भामा-आसखेड धरणातील पाणी एमजीपीकडून काही भागात, तर भामा नदीतून जलशुद्धीकरण करून उर्वरित भागासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या जलशुद्धीकरण केंद्राचे नव्याने अद्ययावतीकरण केल्याने नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला आहे. शहराचे दोन विभाग करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.ग्रामपंचायत काळात चाकणचा पाणीप्रश्न हा गंभीर होता. मात्र, नगर परिषद झाल्यानंतर टंचाईच्या झळा कमी झाल्या. मात्र, शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. एमआयडीसी व तरंगती लोकसंख्या विचारात घेता सुमारे एक लाथ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी ५.५ टक्के इतक्या पाण्याची गरज लागेल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुधारित पाणीपुरवठा योजनेचे सर्वेक्षण केले असून, सरकारच्या अमृत जलधारा या योजनेअंतर्गत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.चाकण शहरासह सर्व लहानमोठ्या गृहप्रकल्पांना समाधानकारक पाणी उपलब्ध झाल्यानंतर लवकरच पाणीपुरवठा मीटर सक्तीचे करणार आहे. अनधिकृत नळ कनेक्शन बंद करणार आहे. अतिरिक्त पाणीगळतीकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सांगितले.असा होतो पाणीपुरवठा४चाकण शहराला सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक १, २, ३, १३, १४, १५, १६, २०, २१ व २२ (आंबेठाण रोड, राणूबाई मळा, देशमुखआळी, दावडमळा, भुजबळआळी व संपूर्ण शिक्रापूर) या भागासाठी भामा-आसखेड धरणातून पाणी विकत घेऊन पुरवठा करण्यात येतोे.४दुसºया दिवशी प्रभाग क्रमांक ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १७, १८, १९ व २४ (संपूर्ण चाकण गावठाण, एकतानगर, आगरवाडी, राक्षेवाडी, पठारवाडी, माळआळी, बाजारपेठ व खंडोबामाळ) या परिसरासाठी भामा नदीवरील बंधाºयातील पाणी जॅकवेलमार्फत जलशुद्धीकरण केंद्रातील टाक्यांमधून पावडर, क्लोरिन गॅसचा योग्य प्रमाणात वापर करून फिल्टर करून पुरवठा करण्यात येत आहे.चाकण शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेतल्यास, स्वतंत्र पाणी योजनेची गरज आहे. त्यानुसार भामा-आसखेड धरणातील ठराविक टक्के पाणी आरक्षित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. केंद्र सरकारच्या अमृत जलधारा योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.- मंगल गोरे, नगराध्यक्षाचाकण शहराच्या विकासासाठी निधीची मोठी गरज आहे. सध्या नव्याने जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे चाकणकरांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू केला आहे. ज्या भागात अजूनही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, त्याबाबत लवकरच उपाययोजना करण्यात येईल.- राजेंद्र गोरे, उपनगराध्यक्ष