शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

चाकणला स्वतंत्र पाणी योजनेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:19 IST

१0 वर्षांत चाकणचे गावखेड्याचे रूप बदलून शहरीकरण झाले. ग्रामपंचायतीची नगरपालिका झाली त्याला दीड वर्ष झाले. नगर परिषदेची सत्ता शिवसेनेने ताब्यात घेऊन आपला पहिला नगराध्यक्ष केला. नुकताच नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्याने पुन्हा सत्ता ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आले. राजकीय घडामोडी घडत आहेत; मात्र चाकणच्या मूलभूत समस्यांत काय बदल झाला? याचा ‘लोकमत’ने आढावा घेतला. चाकणकरांना सध्या दिवसाआड पाणी मिळत असून तहान भागत असली, तरी भविष्यातील वाढते नागरीकरण पाहता, चाकणला स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची गरज आहे.

- चंद्रकांत मांडेकर चाकण : नगर परिषद सध्या हजार लिटरला ८ रुपये देऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून विकतचे पाणी चाकणकरांना पुरवत आहे. सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे पाण्यासाठी तशी ‘बोंब’ शहरात होत नाही. मात्र, २०११च्या जनगणनेनुसार चाकणची लोकसंख्या ४१ हजार ११३ अशी असली, तरी शहरात त्याच्या दुप्पट म्हणचे लाखाच्या आसपास लोक राहतात. हा नागरीकरणाचा वाढता वेग पाहता, भविष्यात पाणी ही मोठी समस्या चाकण नगर परिषदेसमोर असणार आहे. यासाठी शहराला स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची गरज आहे.भामा-आसखेड धरणातील पाणी एमजीपीकडून काही भागात, तर भामा नदीतून जलशुद्धीकरण करून उर्वरित भागासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या जलशुद्धीकरण केंद्राचे नव्याने अद्ययावतीकरण केल्याने नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला आहे. शहराचे दोन विभाग करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.ग्रामपंचायत काळात चाकणचा पाणीप्रश्न हा गंभीर होता. मात्र, नगर परिषद झाल्यानंतर टंचाईच्या झळा कमी झाल्या. मात्र, शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. एमआयडीसी व तरंगती लोकसंख्या विचारात घेता सुमारे एक लाथ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी ५.५ टक्के इतक्या पाण्याची गरज लागेल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुधारित पाणीपुरवठा योजनेचे सर्वेक्षण केले असून, सरकारच्या अमृत जलधारा या योजनेअंतर्गत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.चाकण शहरासह सर्व लहानमोठ्या गृहप्रकल्पांना समाधानकारक पाणी उपलब्ध झाल्यानंतर लवकरच पाणीपुरवठा मीटर सक्तीचे करणार आहे. अनधिकृत नळ कनेक्शन बंद करणार आहे. अतिरिक्त पाणीगळतीकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सांगितले.असा होतो पाणीपुरवठा४चाकण शहराला सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक १, २, ३, १३, १४, १५, १६, २०, २१ व २२ (आंबेठाण रोड, राणूबाई मळा, देशमुखआळी, दावडमळा, भुजबळआळी व संपूर्ण शिक्रापूर) या भागासाठी भामा-आसखेड धरणातून पाणी विकत घेऊन पुरवठा करण्यात येतोे.४दुसºया दिवशी प्रभाग क्रमांक ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १७, १८, १९ व २४ (संपूर्ण चाकण गावठाण, एकतानगर, आगरवाडी, राक्षेवाडी, पठारवाडी, माळआळी, बाजारपेठ व खंडोबामाळ) या परिसरासाठी भामा नदीवरील बंधाºयातील पाणी जॅकवेलमार्फत जलशुद्धीकरण केंद्रातील टाक्यांमधून पावडर, क्लोरिन गॅसचा योग्य प्रमाणात वापर करून फिल्टर करून पुरवठा करण्यात येत आहे.चाकण शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेतल्यास, स्वतंत्र पाणी योजनेची गरज आहे. त्यानुसार भामा-आसखेड धरणातील ठराविक टक्के पाणी आरक्षित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. केंद्र सरकारच्या अमृत जलधारा योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.- मंगल गोरे, नगराध्यक्षाचाकण शहराच्या विकासासाठी निधीची मोठी गरज आहे. सध्या नव्याने जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे चाकणकरांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू केला आहे. ज्या भागात अजूनही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, त्याबाबत लवकरच उपाययोजना करण्यात येईल.- राजेंद्र गोरे, उपनगराध्यक्ष