शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

चाकणला राष्ट्रीय महामार्गालगतचे कचरा दहन धोकादायक

By admin | Updated: November 16, 2016 17:32 IST

येथील सेवा रस्त्याच्या कडेला बिनबोभाट कचरा जाळला जात असल्यामुळे पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या - जाणा-या वाहनांना धोका उद्भवण्याची

नगरसेवक राहुल कांडगे यांनी दिला आंदोलनाचा इशारा.चाकण, दि. १६ : येथील सेवा रस्त्याच्या कडेला बिनबोभाट कचरा जाळला जात असल्यामुळे पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या - जाणा-या वाहनांना धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्गा जवळील चाकण - मुटकेवाडी दरम्यानच्या सेवा रस्त्यालगत सातत्याने होत असलेल्या या प्रकाराची तत्काळ दखल घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल कांडगे यांच्यासह येथील वाहनचालक तसेच नागरिकांनी केली आहे.येथील नगरपरिषद हद्दीतील अनेक दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, भाजी विक्रेते ओला सुका कचरा रस्त्याच्या कडेला कशाही पद्दतीने आणून टाकतात. कोणाला कसलाच थांगपत्ता लागू न देता या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी हा कचरा रहदारीच्या व वर्दळीच्या ठिकाणी पेटविला जातो. कचरा टाकणारे बरचसे दुकानदार, हॉटेल व्यावसायिकच या कच-याला आग लावतात. वा-यामुळे ही आग सर्वत्र पसरून संपूर्ण कचरा जळून जातो. या आगीमुळे धुराचे लोट रस्त्यावर पसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या आगीत प्लास्टिक, काड्या, कागद यांचे प्रमाण जास्त असते. ओल्या सुक्या कचऱ्याने दुर्गंधी सुटते. हवेमुळे ही आग पसरून संपूर्ण कचरा जळला जातो. यातून निघणारे धुराचे लोळ सर्वत्र पसरतात. अशा आगीच्या शेजारून पेट््रोल, डिझेल, रॉकेल, गॅस यांची अतिज्वलनशील वाहने गेल्यास मोठा धोका उद्भवू शकतो. हिवाळ्यातील धुक्याप्रमाणे राज्य मार्गावर पसरणाऱ्या या कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय धुराच्या प्रचंड लोटांनी समोरील बाजूने येणारे वाहनही दिसत नसल्याने अपघातांचाही धोका वाढला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडून सर्व सामान्य नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेतले जात नसल्याचा आरोप नगरसेवक राहुल कांडगे यांच्यासह या भागातील वाहनचालक व प्रवाशांनी केला आहे.-----------------------------------------------------------------------------------------------------------------------* कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावा, अन्यथा आंदोलन - नगरसेवक राहुल कांडगे------------------------------------------------------------------------"चाकण नगर परिषदेच्या हद्दीत वाघेवस्ती, माणिक चौक, भुयारी मार्ग, आंबेठाण रोड, विशाल गार्डन, गावठाण, मुटकेवाडी रस्ता आदि ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला असतो. त्यामुळे येथिल परिसराला कचऱ्याची सूज आलेली दिसते. या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक डेंगू, मलेरिया, टायफर, चिकनगुनिया या जीवघेण्या आजारानें फणफणले असून, त्रस्त झाले आहेत. तर काही दिवसांपूर्वी येथील एका महिलेचा डेंगूने बळी घेतला आहे. कचरा वेळेत उचलला जात नसल्याने नागरिकाना याचा अखंडपणे मनस्ताप सहन करावा लागत आहे. कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावा. अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येईल, असा इशारा नगरसेवक राहुल कांडगे यांनी दिला आहे."