शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

वाहने भंगारात काढण्याचे केंद्राचे धोरण अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सर्व प्रकारची वाहने विशिष्ट मुदतीनंतर स्क्रॅप (भंगार) करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणास राज्य वाहन चालक-मालक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सर्व प्रकारची वाहने विशिष्ट मुदतीनंतर स्क्रॅप (भंगार) करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणास राज्य वाहन चालक-मालक महासंघाने विरोध केला आहे. पुढील वर्षी १ एप्रिल २०२२ पासून हे धोरण अमलात आणले जाणार आहे.

केंद्रीय भूपृष्ठ वाहन मंत्री नितीन गडकरी यांनी तशी घोषणा केली आहे. पहिली १५ व नंतरची ५ अशा २० वर्षांनंतर सर्व प्रकारची वाहने या धोरणाने मोडीत काढावी लागतील.

महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की, या निर्णयामुळे देशातील १५ वर्षांवरील साधारण ४ कोटी वाहने स्क्रॅप होतील. यातील बहुतांश वाहने व्यावसायिक वापरासाठी कर्ज काढून घेतलेली असतात. ते कर्ज १५ वर्षांत फिटत नाही. वाहनही चांगले चालत असते. अशा स्थितीत नवे वाहन घेणे शक्य होत नाही. हे धोरण म्हणजे एखाद्याचा सुरू असलेला व्यवसाय बंद पाडणे आहे.

ऑल इंडिया मोटर काँग्रेस नवी दिल्ली यांनीही या धोरणाला विरोध केला आहे. सरकारने ते त्वरित रद्द करावे, अन्यथा वाहन मालक चालक देशव्यापी आंदोलन करतील, असा इशारा शिंदे यांनी दिला.