शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

केंद्र शासनाचे उत्पादकता वाढविण्याचे धोरण, आधुनिक शेतीमध्ये संशोधन व पूरक व्यवसायाला चालना देण्याची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 04:53 IST

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती व्यवसायाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल, तर कृषी उत्पादकता वाढविण्याशिवाय पर्याय नाही.

पुणे : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती व्यवसायाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल, तर कृषी उत्पादकता वाढविण्याशिवाय पर्याय नाही. आधुनिक शेती करण्यासाठी संशोधनाची आवश्यकता असून, त्याचे शास्त्रशुद्ध धडे शेतकºयांना देण्याची गरज आहे़ प्रगत शेती व पूरक व्यवसाय वाढीसाठी आवश्यक धोरणे राबवायला हवीत, अशी शिफारस नीती आयोगाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत करण्यात आली.खेड्याकडे चला, असे राष्टÑपिता महात्मा गांधीजींनी म्हटले होते. मात्र, गेल्या काही वर्षांत ग्रामीण विकासाकडे दुर्लक्ष झाले. त्याच वेळी केवळ शहरी भागातील औद्योगिक विकासाला चालना मिळून नागरीकरण वाढीस लागले. मात्र, नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती व्यवसायाला चालना देण्याचे धोरण केंद्र सरकारने ठेवले आहे, अशी माहिती भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) चेअरमन हणमंत गायकवाड यांनी दिली.नीती आयोगाच्या पुढाकाराने ‘आर्थिक धोरण पुढे नेण्यासाठी’ या विषयावर दिल्लीतील बैठकीत चर्चा झाली.या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, सचिव राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आदी उपस्थित होते.देशातील व जगभरातील विविध क्षेत्रांतील ३० तज्ज्ञांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यात कृषी क्षेत्रात नवीन प्रयोग व संशोधन करणारी संस्था म्हणून सहभागी झालेल्या ‘भारत विकास ग्रुप’ या संस्थेचे चेअरमन हणमंत गायकवाड यांनी सादरीकरण केले.पहिल्या सत्रात दीर्घ अर्थशास्त्र समतोल, कृषी आणि ग्रामीण विकास, रोजगार, आरोग्य आणि शिक्षण, उत्पादन आणि निर्यात, शहरी विकास पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी या सहा विषयांवर महत्त्वपूर्ण व धोरणात्मक चर्चा झाली.>शाश्वत शेतीची आवश्यकता - हणमंत गायकवाड‘‘देशाचे आर्थिक धोरण पुढे नेण्यासाठीच्या या चर्चेत काही तज्ज्ञांनी सादरीकरण केले. ग्रामीण व शेतकरी विकासासंदर्भात भूमिका मांडण्याची संधी ‘बीव्हीजी’ला मिळाली. शाश्वत व समृद्ध शेतीसाठी कोणत्या उपाययोजना आपण करू शकतो. शेतीसाठी होणाºया रासायनिक खते व औषधांच्या अमर्याद माºयामुळे मानव, पशू-पक्षी, जमीन आणि एकूणच पर्यावरण आणि पिकांचेही नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बीव्हीजी’ने सुरू केलेल्या ‘विषमुक्त शेती अभियाना’ची माहिती दिली. विषारी औषधे व रासायनिक खतांमुळे पीक उत्पादनांचा समाजजीवनावर व आरोग्यावर होणाºया विघातक परिणामाचे वास्तव हणमंत गायकवाड यांनी मांडले.शेती व्यवसाय शास्त्रशुद्धपणे करता येतो, हा विषयही तळागाळात पोहोचलेला नाही. त्यासाठी काम करण्याची गरज आहे. आजही मोठ्या प्रमाणावर पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. बहुसंख्य शेतकºयांना आधुनिक व शाश्वत शेती व्यवसायाविषयीचे ज्ञान मिळालेले नाही. माती, पाणी परीक्षणाचे महत्त्व माहिती नाही. यासाठी शेतकºयांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. शास्त्रशुद्ध शेती केल्यास उत्पादनाबरोबरच उत्पन्नातही वाढ होईल, अशी मांडणीही त्यांनी केली.