शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

केंद्राचे धोरण साखर उद्योगविरोधी -हर्षवर्धन पाटील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 2:43 AM

केंद्र सरकारने राज्यातील सर्वच साखर कारखान्यांना आयकर भरण्यासंदर्भात नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच, कारखान्यांना साखरसाठा मर्यादेचे आदेश काढले आहेत. परिणामी, साखरेचे दर कमी झाले आहेत. अशा परिस्थितीतच दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने ३ लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे.

बावडा : केंद्र सरकारने राज्यातील सर्वच साखर कारखान्यांना आयकर भरण्यासंदर्भात नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच, कारखान्यांना साखरसाठा मर्यादेचे आदेश काढले आहेत. परिणामी, साखरेचे दर कमी झाले आहेत. अशा परिस्थितीतच दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने ३ लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. केंद्र शासनाने साखर उद्योगाच्या विरोधातील धोरण बदलावे, असे आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.शहाजीनगर येथे नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली. सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. या वेळी ते बोलत होते.पाटील म्हणाले, ‘‘आगामी हंगामात कारखान्याचे १२.५० टक्के साखर उताºयाचे उद्दिष्ट आहे. मागील गळीत हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे गाळप कमी झाले. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही प्रतिटनास रु. २५०५ दर देण्याचा शब्द आपण पाळला आहे. कारखान्याने उपपदार्थनिर्मितीचे सर्व प्रकल्प उभारले आहेत. आता आगामी काळात गुंतवणुकीसाठी नवीन कर्ज काढण्याची गरज राहिलेली नाही. त्यामुळे येणाºया हंगामात ऊसदरात नीरा-भीमा कारखाना इतर कारखान्यांच्या तुलनेत पुढेच राहील, यात शंका नाही.या वार्षिक सभेस अ‍ॅड. कृष्णाजी यादव, प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, विकास पाटील, किरण पाटील, देवराज जाधव, अमरसिंह पाटील, मनोज पाटील, मंगेश पाटील, रघुनाथ राऊत, अनिल पाटील,श्रीमंत ढोले, धनंजय कोरटकर, तानाजीराव देवकर, रणजित रणवरे, अजिनाथ बोराडे, प्रतापराव पाटील, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे, शिवाजी शिंदे, महादेव घाडगे, सुरेश मेहेर, महेश जगदाळे, दत्तात्रय शिर्के, विश्वासराव काळकुटे, मोहन गुळवे, नागेश नष्टे, तानाजीराव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.७ लाख टन गाळप नियोजनकारखान्याने चालू गळीत हंगामात ७ लाख टन ऊस गाळपाचे नियोजन केलेले असून साखर उतारा वाढीसाठी शेतकºयांनी सहकार्य करावे, शेतकºयांनी नवीन ऊस बियाणे वापरावे, एकरी ऊस उत्पादकता वाढवावी, नीरा-भीमा कारखान्याच्या ऊस विकास कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी अहवालवाचन केले. कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Puneपुणे