शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

खरिपातील नुकसानीचा आकडा ९४ लाख हेक्टरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 02:44 IST

पिकांच्या उत्पादकतेमध्ये होणार घट

पुणे : अतिवृष्टी आणि पूर यामुळे राज्यातील खरिपाच्या तब्बल ९४ लाख ५३ हजार १३९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असल्याची माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे. तसेच, शेतात पाणी साचून राहिल्याने जवळपास सर्वच खरीप पिकांच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होणार असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. भात, ऊस, फळे आणि पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.राज्यात ऊस पिकासह सरासरी खरीप क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर असून, १३९.८८ लाख हेक्टरवरील (९३ टक्के) पेरणी-लागवडीची कामे सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत झाली होती. राज्यात आॅक्टोबरपर्यंत पावसाची हजेरी होती. अनेक ठिकाणी सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. आॅगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती.सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील ४ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा अतिवृष्टी झाली. आॅक्टोबरमध्ये देखील पावसाची हजेरी होती. लांबलेला पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसानीची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, भात, मका, तूर, हळद, भुईमूग, नाचणी, संत्रा, लिंबू, डाळिंब, पपई, द्राक्ष, ऊस आणि भाजीपाला अशा विविध पिकांचा समावेश आहे.पाणी साचल्याने पिकांवर परिणामसध्या भात व नाचणी पिकांची काढणी सुरु असून, भुईमूग पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक बोंड उमलण्याच्या अवस्थेत असून, काही ठिकाणच्या वेचणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. तूरही शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांवर विपरित परिणाम झाला असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.