शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

खरिपातील नुकसानीचा आकडा ९४ लाख हेक्टरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 02:44 IST

पिकांच्या उत्पादकतेमध्ये होणार घट

पुणे : अतिवृष्टी आणि पूर यामुळे राज्यातील खरिपाच्या तब्बल ९४ लाख ५३ हजार १३९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असल्याची माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे. तसेच, शेतात पाणी साचून राहिल्याने जवळपास सर्वच खरीप पिकांच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होणार असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. भात, ऊस, फळे आणि पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.राज्यात ऊस पिकासह सरासरी खरीप क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर असून, १३९.८८ लाख हेक्टरवरील (९३ टक्के) पेरणी-लागवडीची कामे सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत झाली होती. राज्यात आॅक्टोबरपर्यंत पावसाची हजेरी होती. अनेक ठिकाणी सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. आॅगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती.सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील ४ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा अतिवृष्टी झाली. आॅक्टोबरमध्ये देखील पावसाची हजेरी होती. लांबलेला पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसानीची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, भात, मका, तूर, हळद, भुईमूग, नाचणी, संत्रा, लिंबू, डाळिंब, पपई, द्राक्ष, ऊस आणि भाजीपाला अशा विविध पिकांचा समावेश आहे.पाणी साचल्याने पिकांवर परिणामसध्या भात व नाचणी पिकांची काढणी सुरु असून, भुईमूग पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक बोंड उमलण्याच्या अवस्थेत असून, काही ठिकाणच्या वेचणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. तूरही शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांवर विपरित परिणाम झाला असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.