शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

धान्य घोटाळा चौकशीच्या फे-यात, समितीवर समिती नेमूनही अपहाराची जबाबदारी निश्चित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 06:06 IST

राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या तपासणी पथकाने शिवाजीनगर येथील धान्य गोदामाची तपासणी करून जवळपास ५० लाख रुपयांचा धान्य घोटाळा उघडकीस आणला.

- विशाल शिर्के 

पुणे : राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या तपासणी पथकाने शिवाजीनगर येथील धान्य गोदामाची तपासणी करून जवळपास ५० लाख रुपयांचा धान्य घोटाळा उघडकीस आणला.पुढे फेरतपासणीत या घोटळ्यातील रक्कम १० लाखांवर आली. त्यानंतरही गेल्या सात वर्षांत संबंधित अधिकाºयांवर दोषाची जबाबदारी निश्चित करणे प्रशासनाला शक्य झाले नाही. केवळ चौकशी समित्यांच्या फेºयातच या घोटाळ्याची चौकशी अडकली असल्याची धक्कादायक वास्तव समोर आले आहे.अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने ९ ते २४ डिसेंबर २०१० या कालावधीत धान्य गोदामाची तपासणी केली होती. त्यात गव्हाच्या ६ हजार ६२९ गोण्या, तांदूळ ५० आणि तूरडाळीच्या १० गोण्यांचा अपहार झाल्याचे समोर आले होते. ही रक्कम तत्कालीन बाजारभावानुसार तब्बल ४४ लाख ४३ हजार रुपये इतकी होती. इतक्या रकमेचा धान्यसाठा कमी आढळल्याचा अभिप्राय या तपासणी पथकाने नोंदविला होता.आवक-जावक नोंदी, माल ठेवण्याची पद्धत यावरदेखील गंभीर ताशेरे ओढण्यात आले होते. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे तत्कालीन सचिव उमाकांत दांगट यांनी शहर अन्नधान्य अधिकाºयांना त्या वेळी कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली होती.माहिती अधिकार कार्यकर्ते जयप्रकाश उणेचा यांनी ही घटना समोर आणली आहे. त्यानंतर पुढे या प्रकरणाची १० ते १९ मार्च २०११ दरम्यान फेरतपासणी करण्यातआली. यात पहिल्या तपासणीच्या तुलनेत केवळ १ हजार ४७७ क्विंटल गव्हाचा अपहार झाल्याचे आढळून आले. त्याची रक्कम ९ लाख ८९ हजार रुपयांच्या घरात होती. नंतर या प्रकरणाची चौकशी डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१५ पर्यंत ठप्प होती.पुढे या प्रकरणाच्या चौकशीसाठी दबाव वाढल्याने पुन्हा तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, अद्यापही या समितीचे कामकाज पूर्ण झाले नाही. गंमत म्हणजे या प्रकरणी अन्नधान्य वितरण अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावणारे सनदी अधिकारी दांगट, विभागीय आयुक्त म्हणून निवृत्त झालेआहेत. मात्र, अजूनही या घोटाळ्याच्या चौकशी समितीचा घोळ संपलेला नाही.समितीचा असा खेळखंडोबाडिसेंबर २०१०मध्ये उघडकीस आलेल्या या धान्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालीन लेखाधिकारी एस. एन. पाटील, एन. एम. काकडे, बी. व्ही. कांबळे यांची २८ डिसेंबर २०१२ रोजी समिती स्थापन केली. पुढे २०१७मध्ये राजेंद्र येराम, एम. जी. वाघमारे, मंगेश खरात यांची नियुक्ती झाली.आता पुन्हा येराम यांच्या जागी एम. यू. चराटे यांची १८ मे २०१७ रोजी नियुक्ती करण्यात आली. मात्र, चराटे यांनी या समितीच्या कामकाजात सहभागच घेतला नाही. त्यासाठी त्यांना २८ जुलै २०१७ रोजी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. या चौकशी समितीचे कामकाज पूर्ण करण्याबाबत सरकारकडून विचारणा होत आहे.या तपासणीसाठी आपल्याला कागदपत्रांच्या छायांकित प्रती दिल्यानंतरही आपण कामकाज केलेलेनाही, अशी नोटीस बजावण्यात आली होती. शासनाकडून आक्षेप आल्यास त्यासाठी आपल्याला जबाबदार धरले जाईल, असेही नोटीशीत बजावण्यात आले होती.२०१३ ते २०१७या काळात या प्रकरणी नक्की काय कामकाज झाले, याची माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे घोटाळ्याच्या चौकशीचा फेरा सात वर्षांनंतर तरी पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या समितीची सद्य:स्थिती माहीत नसल्याची प्रतिक्रिया अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवारयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गेल्या सात वर्षांत धान्य घोटाळ्याची समिती नेमून, तपासणी करणे प्रशासनाला शक्य झालेले नाही. या प्रकरणात तत्कालीन बडे अधिकारी अडकलेले असल्यानेच, तपासाला जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. या समितीतीतील सदस्यांची पदे पाहिल्यास, वरिष्ठ अधिकाºयांविरोधात ते कारवाईचा अहवाल कसा देणार, हादेखील एक प्रश्नच आहे. - जयप्रकाश उणेचा, माहिती अधिकार कार्यकर्ते

टॅग्स :Puneपुणे