शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

अध्यक्षांचा अवमान प्रकरण बालकल्याण अधिकाऱ्यांना भाेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:29 IST

पुणे : जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांना शासन सेवेमध्ये परत पाठवण्याच्या ...

पुणे : जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांना शासन सेवेमध्ये परत पाठवण्याच्या केलेल्या ठरावाची अंमलबजावणी न केल्याने आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गदारोळ झाला. संतप्त सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. अखेर दत्तात्रेय मुंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. या सोबतच सौरदिव्यांची दुरूस्ती न करता काढण्यात आलेली बिले, महिला बालकल्याण विभागाने चिक्की खरदेसाठी ठेवलेली रक्कम, तसेच वेल्हा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या जागेवरून जिल्हा परिषदेची गुरुवारी झालेली सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली. यामुळे सभागृहाचे कामकाजही काही काळ ठप्प झाले होते.

जिल्हापरिषदेची सर्वसाधारण सभा गुरूवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रमोद काकडे, कृषी व पशुसंर्वधन सभापती बाबुराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पुजा पारगे, समाजकल्याण सभापती सुरेखा पानसरे, उतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, सर्व पक्षाचे गटनेते व सदस्य व विभाग प्रमुख या वेळी उपस्थित होते.

गेल्या सर्वसाधारण सभेमध्ये मुंडे यांना शासन सेवेत परत पाठवण्याचा ठराव सर्वानुमते झाला होता. परंतु या ठरावाची अंमलबजावणी न झाल्याने आज तहकूब सभेमध्ये या प्रश्नावर सदस्य आक्रमक झाले. ठरावाची अंमलबजावणी न करणे हा सभागृहाचा अवमान आहे. याबद्दलचे नियम काय? अशी विचारणा शिवसेना गटनेते देविदास दरेकर भाजप गटनेते शरद बुट्टे पाटील, आशा बुचके राष्ट्रवादी काँग्रेसचे वीरधवल जगदाळे, काँग्रेसचे गटनेते विठ्ठल आवाळे यांनी केली. यामुद्यावरून वातावरण तापले. अध्यक्ष निर्मला पानसरे आणि उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे प्रशासनाला जाब विचारत याचा खुलासा करण्यास सांगितले. तेव्हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे म्हणाले, मुंडे यांच्या बद्दल सभेमध्ये झालेली चर्चा आणि निर्णयाप्रमाणे शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची तरतूद आहे परंतु विभाग प्रमुखाच्या संदर्भात असे स्पष्ट नसल्याचे त्यांनी नमूद केले तेव्हा सदस्य आक्रमक झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्या अधिकारातच कारवाई करायला हवी. मुंडे यांचा पदभार काढून घ्या, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा. अशी जोरदार मागणी केली. अखेर अध्यक्ष निर्मला पानसे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे आज सभेत उपस्थित नाही उद्या त्यांनी मुंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले.

चौकट

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून बसवलेल्या सौर पथदिव्यांची दुरुस्ती न करताच बिले दिले आहेत. दुरुस्तीसाठी पथक नेमले होते, मात्र त्यांनी दुरुस्तीच केली नाही. आमच्याभागातील दिवे बंदच असल्याचा आरोप सदस्यांनी कृषी अधिकाऱ्यांवर सर्व साधारण सभेत केला. गटनेते शरद बुट्टे-पाटील म्हणाले, सौर दिवा बंद पडला तर ग्रामपंचायतला कुणाला फोन करावा हे समजत नाही, त्यासाठी प्रत्येक ठिकाणी दिवे पुरवणाऱ्या कंपनीचा संपर्क दिला पाहिजे. तर सदस्य आशा बुचके म्हणाल्या, आमच्या भागात देखील सौर दिवा दुरुस्तीसाठी गाडी आलेली नाही. यावर कृषी अधिकारी अनिल देशमुख म्हणाले, ठेकेदाराकडून सगळे दिवे दुरुस्त करून घेतल्याशिवाय अनामत रक्कम देणार नाही.