शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कपॅसिटर टाळणार रोहित्र, कृषिपंपाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST

बारामती परिमंडलात गतवर्षी रोहित्र जळण्याचे सरासरी प्रमाण ७.४७ टक्के आहे. तब्बल ६२६६ रोहित्र गतवर्षी नादुरुस्त झाले होते. तर यंदा ...

बारामती परिमंडलात गतवर्षी रोहित्र जळण्याचे सरासरी प्रमाण ७.४७ टक्के आहे. तब्बल ६२६६ रोहित्र गतवर्षी नादुरुस्त झाले होते. तर यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे चालू रब्बी हंगामात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारणपणे एक जळालेले किंवा नादुरुस्त झालेले रोहित्र दुरुस्त करण्यासाठी किमान २४ हजार रुपयांचा खर्च होतो. त्याच्या क्षमतेनुसार ही किंमत आणखी वाढते. शिवाय ते बदलेपर्यंत महावितरणचा महसूल बुडतो. दुसरीकडे शेतकऱ्यांचेही नुकसान होते. पिके करपतात. उत्पादनात घट होते. त्यामुळे रोहित्र नादुरुस्त होणे महावितरण व शेतकरी दोघांनाही परवडणारे नाही. कपॅसिटर वापराचे फायदे शेतकºयांना सांगण्यासाठी स्वत: मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे व कर्मचाऱ्यानी शुक्रवारी (दि. ६) दुपारी भिगवण उपकेंद्रासमोर असलेल्या उजनी धरणाच्या बॅक वॉटरवर चालू असलेल्या कृषीपंपावर याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्याना दाखवून ते वापरण्याचे आवाहन केले.

यावेळी केलेल्या प्रात्यक्षिकावेळी कपॅसिटर शिवाय लागणारा करंट कपॅसिटरच्या वापरामुळे साधारणपणे २९ टक्क्यांनी कमी लागला. रोहित्र व कृषीपंप वाचवायचे असतील तर कपॅसिटर हाच एकमेव उपाय आहे. कपॅसिटरमुळे वीजभार कमी होतो. मोटारीचे कंपन कमी होते. पाण्याचा विसर्ग वाढतो. रोहित्र व कृषीपंपाची कार्यक्षमता व आयुर्मान सुधारते. वितरण हानी टळून शेतकरी व कंपनी दोघांचाही फायदाच होतो व गैरसोयही टळते.

फोटो

०५१२२०२०बारामती-१३