शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

प्लास्टीक बंदी कायदा रद्द करा : उत्पादकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 19:29 IST

महाराष्ट्र सरकारने २३ मार्च रोजी परिपत्रक काढून प्लास्टीकवरच्या वापरावर आणि उत्पादनावर बंदी घातली आहे. किराणामाल, फळे-भाजी विक्रेत्यांपासून ते कपडे विक्रेत्यापर्यंत सर्वांनाच याची झळ बसणार आहे. 

ठळक मुद्देकायद्यातील तरतुदी सापत्न असल्याची टीका

पुणे : महाराष्ट्र सरकारने एका रात्रीत जाहीर केलेली प्लास्टीक बंदी अत्यंत चुकीची आहे. त्यातील तरतुदींमुळे बलाढ्य बिस्कीट आणि वेफर्स कंपन्यांची या कायद्यातून सुटका होणार असून, किराणा दुकानदार, गृहउद्योग, दुग्ध उद्योगासह अनेकांना त्याची झळ बसणार आहे. त्यामुळे हा कायदा रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र प्लास्टीक मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष रवी जश्नानी, सचिव निखिल राठी, प्रमोद शहा, नितीन पटवा, संजय तन्ना या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने २३ मार्च रोजी परिपत्रक काढून प्लास्टीकवरच्या वापरावर आणि उत्पादनावर बंदी घातली आहे. किराणामाल, फळे-भाजी विक्रेत्यांपासून ते कपडे विक्रेत्यापर्यंत सर्वांनाच याची झळ बसणार आहे. जिश्नानी म्हणाले, राज्य सरकारचा या वर्षीचा हा सर्वात धक्कादायक निर्णय आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता प्लॅस्टीकवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. आत्ता असलेले प्लास्टीक परराज्यात नेऊन विकावे अथवा नष्ट करावे असे सांगण्यात आले आहे. सामाजिक न्यायाच्या विरुद्ध हे वर्तन असल्याने, त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार विरोधात याचिका दाखल केली आहे. प्लास्टीक बंदीच्या कायद्यात सरकारने वेफर्स, बिस्कीट, नूडल्स अशा विविध वस्तू बनविणाºया कंपन्यांवर मेहेर नजर केली आहे. ज्या कंपन्यांमध्ये वस्तू तयार होऊन ती तेथेच यंत्राने पॅक जाईल त्यांना सूट दिली आहे. त्यामुळे गृह उद्योग, किराणा, दुग्ध उद्योग, भाजी-फळे विक्रेते असे सर्व प्रकारचे विक्रेत्यांना झळ बसेल. अशी सापत्न वागणुक सरकारकडून दिली जात आहे. वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होत आहे. मग वाहनांवर सरकार बंदी घालणार का ? घनकचरा व्यवस्थापना अभावी प्लास्टीकची समस्या निर्माण झाली आहे. त्यावर उपाय करण्या ऐवजी सरकार चुकीचा उपाय करीत आहे. प्लास्टीकला व्यवहार्य पर्याय सध्या उपलब्ध नसताना सरकारने घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याचे जिश्नानी म्हणाले. प्लास्टीकवर बंदी ऐवजी, त्याचे व्यवस्थापन करायला हवे. बंदी घातल्यास, त्याचे नियमन कसे करणार, त्याला इतर सक्षम पर्याय कोणते देणार याबाबत अनभिज्ञताच आहे. त्यामुळे ही बंदी यशस्वी होणार नसल्याचे ग्राहकपेठेचे सूर्यकांत पाठक म्हणाले. एका विभागाचा सरकारी अधिकारी म्हणतो प्लास्टीक बंद पदार्थ हवेत. आता त्यावर बंदी आली. हा कायदा अव्यवहार्य असल्याचे चितळे बंधूचे भागिदार श्रीकृष्ण चितळे म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेPlastic banप्लॅस्टिक बंदीState Governmentराज्य सरकार