शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

प्लास्टीक बंदी कायदा रद्द करा : उत्पादकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 19:29 IST

महाराष्ट्र सरकारने २३ मार्च रोजी परिपत्रक काढून प्लास्टीकवरच्या वापरावर आणि उत्पादनावर बंदी घातली आहे. किराणामाल, फळे-भाजी विक्रेत्यांपासून ते कपडे विक्रेत्यापर्यंत सर्वांनाच याची झळ बसणार आहे. 

ठळक मुद्देकायद्यातील तरतुदी सापत्न असल्याची टीका

पुणे : महाराष्ट्र सरकारने एका रात्रीत जाहीर केलेली प्लास्टीक बंदी अत्यंत चुकीची आहे. त्यातील तरतुदींमुळे बलाढ्य बिस्कीट आणि वेफर्स कंपन्यांची या कायद्यातून सुटका होणार असून, किराणा दुकानदार, गृहउद्योग, दुग्ध उद्योगासह अनेकांना त्याची झळ बसणार आहे. त्यामुळे हा कायदा रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र प्लास्टीक मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष रवी जश्नानी, सचिव निखिल राठी, प्रमोद शहा, नितीन पटवा, संजय तन्ना या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने २३ मार्च रोजी परिपत्रक काढून प्लास्टीकवरच्या वापरावर आणि उत्पादनावर बंदी घातली आहे. किराणामाल, फळे-भाजी विक्रेत्यांपासून ते कपडे विक्रेत्यापर्यंत सर्वांनाच याची झळ बसणार आहे. जिश्नानी म्हणाले, राज्य सरकारचा या वर्षीचा हा सर्वात धक्कादायक निर्णय आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता प्लॅस्टीकवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. आत्ता असलेले प्लास्टीक परराज्यात नेऊन विकावे अथवा नष्ट करावे असे सांगण्यात आले आहे. सामाजिक न्यायाच्या विरुद्ध हे वर्तन असल्याने, त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार विरोधात याचिका दाखल केली आहे. प्लास्टीक बंदीच्या कायद्यात सरकारने वेफर्स, बिस्कीट, नूडल्स अशा विविध वस्तू बनविणाºया कंपन्यांवर मेहेर नजर केली आहे. ज्या कंपन्यांमध्ये वस्तू तयार होऊन ती तेथेच यंत्राने पॅक जाईल त्यांना सूट दिली आहे. त्यामुळे गृह उद्योग, किराणा, दुग्ध उद्योग, भाजी-फळे विक्रेते असे सर्व प्रकारचे विक्रेत्यांना झळ बसेल. अशी सापत्न वागणुक सरकारकडून दिली जात आहे. वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होत आहे. मग वाहनांवर सरकार बंदी घालणार का ? घनकचरा व्यवस्थापना अभावी प्लास्टीकची समस्या निर्माण झाली आहे. त्यावर उपाय करण्या ऐवजी सरकार चुकीचा उपाय करीत आहे. प्लास्टीकला व्यवहार्य पर्याय सध्या उपलब्ध नसताना सरकारने घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याचे जिश्नानी म्हणाले. प्लास्टीकवर बंदी ऐवजी, त्याचे व्यवस्थापन करायला हवे. बंदी घातल्यास, त्याचे नियमन कसे करणार, त्याला इतर सक्षम पर्याय कोणते देणार याबाबत अनभिज्ञताच आहे. त्यामुळे ही बंदी यशस्वी होणार नसल्याचे ग्राहकपेठेचे सूर्यकांत पाठक म्हणाले. एका विभागाचा सरकारी अधिकारी म्हणतो प्लास्टीक बंद पदार्थ हवेत. आता त्यावर बंदी आली. हा कायदा अव्यवहार्य असल्याचे चितळे बंधूचे भागिदार श्रीकृष्ण चितळे म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेPlastic banप्लॅस्टिक बंदीState Governmentराज्य सरकार