शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

कालव्यावरील पाणीवापर संस्था ठरल्या कुचकामी

By admin | Updated: May 30, 2017 02:19 IST

सर्व शेतकऱ्यांना समान पाणीवाटप या उद्देशाने स्थापन केलेल्या नीरा डाव्या कालव्यावरील पाणीवाटप संस्थाच कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कसोमेश्वरनगर : सर्व शेतकऱ्यांना समान पाणीवाटप या उद्देशाने स्थापन केलेल्या नीरा डाव्या कालव्यावरील पाणीवाटप संस्थाच कुचकामी ठरताना दिसत आहेत. दुजाभाव करीत पाण्याचे वाटप केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था झाली आहे. या संस्था बंद कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्र जलसुधार योजनेअंतर्गत जलसंपदा खात्याने २००७ मध्ये कालव्यांवरील पाणीवापर संस्था उभारण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर या पाणीवापर संस्थांची कामे करून ती २०१२-१३ मध्ये पाणीवापर संस्थांकडे हस्तांतरित करण्यात आले. सुरुवातीला प्रतिहेक्टरी २०० रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी आकारली जात होती. यामध्ये कालांतराने वाढ करण्यात आली. नीरा डाव्या कालव्यावरील ३ नवा फाटा, ३ जुना फाटा, ४ फाटा, ५ फाटा, ५ अ, ५ ब आणि ६ फाटा या फाट्यांवर या संस्थांची स्थापना करण्यात आली. पाणीपट्टीच्या स्वरूपात आकारली जाणारी रक्कम ही सरकारी तिजोरीमध्ये जमा केली जाणार होती. मात्र शेतकऱ्यांकडून जमा केलेली रक्कम नक्की जाते कुठे? हा प्रश्न नेहमीच शेतकऱ्यांना पडत असतो. या संस्थांमध्ये तोंडे पाहून पाण्याचे वाटप केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.कर्मचारीच बनले मालक : या पाणीवापर संस्थांमधून पाण्याचे योग्य वाटप करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. मात्र ते संस्थांचे मालक बनल्याचे दिसत आहेत. यांच्याकडून तोंडे पाहून पाण्याचे वाटप करत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच एकीकडे या कर्मचाऱ्यांना संस्थेचा पगार असतानाही तसेच शेतकरी उसाच्या बिलामधून पाणीपट्टी भरत असतानाही शेतकऱ्यांकडून चिरीमिरी पैसे गोळा करण्याचे चित्र सर्रास दिसते़पाटबंधारे खाते हात झटकून मोकळेपाणीवाटप करताना या पाणीवापर संस्थांचा जसा शेतकऱ्यांवर वॉच आहे तसाच वॉच नीरा पाटबंधारे खात्याचा असणे गरजेचे आहे. मात्र पाटबंधारे खात्यातील काही अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे या संस्था मनमानी कारभार करताना दिसत आहेत. दुसरीकडे या पाणीवापर संस्थांची आमचे काहीही घेणेदेणे नसल्याचे सांगत हे अधिकारी हात झटकून मोकळे होत आहेत. संस्थांचा कारभार उघड्यावरकरोडो रुपये खर्च करून पाणीवापर संस्था उभारल्या, मात्र पाच वर्षे झाली तरीही या संस्थांचा कारभार अडगळीत चालतो. या संस्थांना स्वमालकीची कार्यालये नाहीत. तसेच संचालक मंडळाची निवड करताना सर्व सभासद शेतकऱ्यांना न बोलावता काही मोजक्या शेतकऱ्यांना एकत्र करून संचालक मंडळाची निवड केली जात आहे.