शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

कालव्यावरील पाणीवापर संस्था ठरल्या कुचकामी

By admin | Updated: May 30, 2017 02:19 IST

सर्व शेतकऱ्यांना समान पाणीवाटप या उद्देशाने स्थापन केलेल्या नीरा डाव्या कालव्यावरील पाणीवाटप संस्थाच कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कसोमेश्वरनगर : सर्व शेतकऱ्यांना समान पाणीवाटप या उद्देशाने स्थापन केलेल्या नीरा डाव्या कालव्यावरील पाणीवाटप संस्थाच कुचकामी ठरताना दिसत आहेत. दुजाभाव करीत पाण्याचे वाटप केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था झाली आहे. या संस्था बंद कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्र जलसुधार योजनेअंतर्गत जलसंपदा खात्याने २००७ मध्ये कालव्यांवरील पाणीवापर संस्था उभारण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर या पाणीवापर संस्थांची कामे करून ती २०१२-१३ मध्ये पाणीवापर संस्थांकडे हस्तांतरित करण्यात आले. सुरुवातीला प्रतिहेक्टरी २०० रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी आकारली जात होती. यामध्ये कालांतराने वाढ करण्यात आली. नीरा डाव्या कालव्यावरील ३ नवा फाटा, ३ जुना फाटा, ४ फाटा, ५ फाटा, ५ अ, ५ ब आणि ६ फाटा या फाट्यांवर या संस्थांची स्थापना करण्यात आली. पाणीपट्टीच्या स्वरूपात आकारली जाणारी रक्कम ही सरकारी तिजोरीमध्ये जमा केली जाणार होती. मात्र शेतकऱ्यांकडून जमा केलेली रक्कम नक्की जाते कुठे? हा प्रश्न नेहमीच शेतकऱ्यांना पडत असतो. या संस्थांमध्ये तोंडे पाहून पाण्याचे वाटप केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.कर्मचारीच बनले मालक : या पाणीवापर संस्थांमधून पाण्याचे योग्य वाटप करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. मात्र ते संस्थांचे मालक बनल्याचे दिसत आहेत. यांच्याकडून तोंडे पाहून पाण्याचे वाटप करत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच एकीकडे या कर्मचाऱ्यांना संस्थेचा पगार असतानाही तसेच शेतकरी उसाच्या बिलामधून पाणीपट्टी भरत असतानाही शेतकऱ्यांकडून चिरीमिरी पैसे गोळा करण्याचे चित्र सर्रास दिसते़पाटबंधारे खाते हात झटकून मोकळेपाणीवाटप करताना या पाणीवापर संस्थांचा जसा शेतकऱ्यांवर वॉच आहे तसाच वॉच नीरा पाटबंधारे खात्याचा असणे गरजेचे आहे. मात्र पाटबंधारे खात्यातील काही अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे या संस्था मनमानी कारभार करताना दिसत आहेत. दुसरीकडे या पाणीवापर संस्थांची आमचे काहीही घेणेदेणे नसल्याचे सांगत हे अधिकारी हात झटकून मोकळे होत आहेत. संस्थांचा कारभार उघड्यावरकरोडो रुपये खर्च करून पाणीवापर संस्था उभारल्या, मात्र पाच वर्षे झाली तरीही या संस्थांचा कारभार अडगळीत चालतो. या संस्थांना स्वमालकीची कार्यालये नाहीत. तसेच संचालक मंडळाची निवड करताना सर्व सभासद शेतकऱ्यांना न बोलावता काही मोजक्या शेतकऱ्यांना एकत्र करून संचालक मंडळाची निवड केली जात आहे.