शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

कॅनॉल रस्ता ते म्हसाडे वस्तीपर्यंतचा शेतरस्ता झाला खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:11 IST

दावडी येथील म्हसाडेवस्तीवरील शेतकऱ्यांना असणारा अनेक वर्षे वादात अडकला होता. शेतमाल वाहतुकीसाठी रस्ता बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान व गैरसोयीचा ...

दावडी येथील म्हसाडेवस्तीवरील शेतकऱ्यांना असणारा अनेक वर्षे वादात अडकला होता. शेतमाल वाहतुकीसाठी रस्ता बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान व गैरसोयीचा सामना करावा लागत होता. तसेच, या ठिकाणी लोकवस्ती असल्याने नागरिकांना जाणे- येणे बंद झाले होते. शेतकऱ्यांना शेतीमाल डोक्यावर बाहेर काढावा लागत असे व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत होते. या रस्त्यासाठी अनेक वादविवाद होऊन पोलीस ठाण्यात वाद गेला होता. मात्र, या रस्त्यावरून कायम होणारा वाद व शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता दावडीचे सरपंच संभाजी घारे, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील, उपसरपंच राहुल कदम,ग्रामपंचायत सदस्या पुष्पा होरे, माजी उपसरपंच भाऊसो होरे, ग्रामपंचायत सदस्य अनिल नेटके, मारुती बोत्रे, बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले, रमेश होरे, यांच्या मध्यस्थीने या वस्तीवरील सर्व भाऊबंदांना एकत्र घेऊन विश्वासात घेऊन ह्या रस्त्याचा वाद कायमस्वरूपी मिटविण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी, शेतमाल बाहेर काढण्यासाठी रस्ता मिळाल्याने शेतकरी आनंद व्यक्त करत आहे .हा रस्ता खुला झाल्याने ३५० एकर जमीन व २०० शेतकऱ्यांच्या शेतीमालाची दळणवळाची सोय झाली आहे. या रस्त्यासाठी ग्रामपंचायत निधी उपलब्ध करून देण्यात आला असून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे सरपंच आबा घारे यांनी सांगितले.

०५ दावडी

दावडी-म्हसाडे वस्ती ते कॅनॉल रस्ता खुला करून रस्त्याचे काम चालू केले. यावेळी उपस्थित असलेले संभाजी घारे, उपसरपंच राहुल कदम, पोलीस पाटील व शेतकरी