शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यावरील शेती संकटात!

By admin | Updated: April 2, 2016 03:25 IST

खडकवासला कालव्याला आवर्तन न सुटल्याने इंदापूर तालुक्यातील ३६ गावांमधील शेती अडचणीत आली आहे. या गावांमधील ऊसशेतीसह डाळींब, द्राक्षबागांची हजारो हेक्टर शेती

बारामती : खडकवासला कालव्याला आवर्तन न सुटल्याने इंदापूर तालुक्यातील ३६ गावांमधील शेती अडचणीत आली आहे. या गावांमधील ऊसशेतीसह डाळींब, द्राक्षबागांची हजारो हेक्टर शेती पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय पिण्याच्या पाण्यासाठीदेखील येथील अनेक गावे तहानलेली आहेत.खडकवासला कालव्यावर या परिसरातील शेटफळगढे, पोंदवडी, निरगुडे, अकोले, वायसेवाडी, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी, उरुळी, मराडेवाडी, न्हावी, बळपुडी, लोणी देवकर, व्याहळी, कौठळी, वरकुटे, बिजवडी, वडापुरी, पोंधकुलवाडी, बेडसिंगे या गावांसह ३६ गावांमध्ये पाण्याअभावी भीषण परिस्थिती ओढवली आहे. गेल्या ४ महिन्यांपासून खडकवासला कालव्याला पाणीसाठ्याअभावी आवर्तन सुटलेले नाही. दोन महिन्यांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी कालव्याला पाणी सोडण्यात आले होते. या कालव्यांतर्गत परिसरातील ४५ तलाव पिण्याच्या पाण्यासाठी भरण्यात येतात. सध्या हे तलाव कोरडे पडले आहेत. अनेक गावांना पिण्यासाठी टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. या गावांमधील हजारो हेक्टर ऊस जळून जाण्याच्या मार्गावर आहे. तर शेकडो एकर डाळींब आणि द्राक्षबागादेखील नष्ट होणार आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी यंदा फळबागांचा बहार धरला नाही. केवळ बागा जगविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दुष्काळ यंदा चांगलाच परिणामकारक ठरला आहे. पिके जळून गेल्याने या गावांमधील आर्थिक गणिते बदलली आहेत. उत्पन्न न मिळाल्याने शेतकऱ्यांवर बिकट अवस्था ओढवली आहे. ऐन दुष्काळात डाळिंबाचे दर प्रथमच मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांना बागा जगवूनदेखील हाती काहीच लागलेले नाही. निर्यातीसाठी माल तयार नसल्याने सर्व डाळिंब स्थानिक बाजारपेठेत आवक झाली आहे. परिणामी डाळिंबाचे दर घसरले आहेत. काही शेतकऱ्यांचा डाळिंबाचा उत्पादनखर्च देखील वसूल झालेला नाही. (प्रतिनिधी)आगामी काळातही खडकवासला कालव्याला पाणी मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे येथील शेतकरी कायमस्वरूपी अडचणीत आल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात योग्य पद्धतीने पाणी साठवून पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तरच भविष्यकाळात खडकवासला कालवा परिसरातील शेतकऱ्याला भवितव्य आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून मिळणारे पाणी अद्याप मिळालेले नाही. भामा-आसखेडचे पाणी पुणे शहराला पिण्यासाठी मिळाल्यावर येथील शेतीला काही प्रमाणात पाणी मिळून दिलासा मिळेल.- भजनदास पवार, डाळिंब उत्पादक शेतकरी