शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

कालव्यावरील शेती संकटात!

By admin | Updated: April 2, 2016 03:25 IST

खडकवासला कालव्याला आवर्तन न सुटल्याने इंदापूर तालुक्यातील ३६ गावांमधील शेती अडचणीत आली आहे. या गावांमधील ऊसशेतीसह डाळींब, द्राक्षबागांची हजारो हेक्टर शेती

बारामती : खडकवासला कालव्याला आवर्तन न सुटल्याने इंदापूर तालुक्यातील ३६ गावांमधील शेती अडचणीत आली आहे. या गावांमधील ऊसशेतीसह डाळींब, द्राक्षबागांची हजारो हेक्टर शेती पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय पिण्याच्या पाण्यासाठीदेखील येथील अनेक गावे तहानलेली आहेत.खडकवासला कालव्यावर या परिसरातील शेटफळगढे, पोंदवडी, निरगुडे, अकोले, वायसेवाडी, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी, उरुळी, मराडेवाडी, न्हावी, बळपुडी, लोणी देवकर, व्याहळी, कौठळी, वरकुटे, बिजवडी, वडापुरी, पोंधकुलवाडी, बेडसिंगे या गावांसह ३६ गावांमध्ये पाण्याअभावी भीषण परिस्थिती ओढवली आहे. गेल्या ४ महिन्यांपासून खडकवासला कालव्याला पाणीसाठ्याअभावी आवर्तन सुटलेले नाही. दोन महिन्यांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी कालव्याला पाणी सोडण्यात आले होते. या कालव्यांतर्गत परिसरातील ४५ तलाव पिण्याच्या पाण्यासाठी भरण्यात येतात. सध्या हे तलाव कोरडे पडले आहेत. अनेक गावांना पिण्यासाठी टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. या गावांमधील हजारो हेक्टर ऊस जळून जाण्याच्या मार्गावर आहे. तर शेकडो एकर डाळींब आणि द्राक्षबागादेखील नष्ट होणार आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी यंदा फळबागांचा बहार धरला नाही. केवळ बागा जगविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दुष्काळ यंदा चांगलाच परिणामकारक ठरला आहे. पिके जळून गेल्याने या गावांमधील आर्थिक गणिते बदलली आहेत. उत्पन्न न मिळाल्याने शेतकऱ्यांवर बिकट अवस्था ओढवली आहे. ऐन दुष्काळात डाळिंबाचे दर प्रथमच मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांना बागा जगवूनदेखील हाती काहीच लागलेले नाही. निर्यातीसाठी माल तयार नसल्याने सर्व डाळिंब स्थानिक बाजारपेठेत आवक झाली आहे. परिणामी डाळिंबाचे दर घसरले आहेत. काही शेतकऱ्यांचा डाळिंबाचा उत्पादनखर्च देखील वसूल झालेला नाही. (प्रतिनिधी)आगामी काळातही खडकवासला कालव्याला पाणी मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे येथील शेतकरी कायमस्वरूपी अडचणीत आल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात योग्य पद्धतीने पाणी साठवून पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तरच भविष्यकाळात खडकवासला कालवा परिसरातील शेतकऱ्याला भवितव्य आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून मिळणारे पाणी अद्याप मिळालेले नाही. भामा-आसखेडचे पाणी पुणे शहराला पिण्यासाठी मिळाल्यावर येथील शेतीला काही प्रमाणात पाणी मिळून दिलासा मिळेल.- भजनदास पवार, डाळिंब उत्पादक शेतकरी