शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आयटी सिटीवर कागदी घोड्यांचा बोजा

By admin | Updated: July 4, 2015 00:20 IST

गेल्या दशकभरात आयटी हब आणि आता केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत वर्णी लावण्यासाठी राज्यातील प्रमुख शहर म्हणून दावेदार असलेल्या पुणे महापालिकेचा कारभार

पुणे : गेल्या दशकभरात आयटी हब आणि आता केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत वर्णी लावण्यासाठी राज्यातील प्रमुख शहर म्हणून दावेदार असलेल्या पुणे महापालिकेचा कारभार मात्र अद्यापही कागदी घोड्यांवरच सुरू आहे. एकीकडे जगाची वाटचाल पेपरलेस होत असताना, महापालिकेत मात्र, दिवसेंदिवस रद्दीचा ढीग वाढतच असल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांत तब्बल दीड लाख किलो रद्दीची विक्री महापालिकेने केली असून त्यातून जवळपास १५ लाख रुपयांचे उत्पन्न महापालिकेस मिळाले आहे. त्यातही आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेचे सर्व विभागांची कार्यपद्धती आॅनलाइन होत असताना, दुसरीकडे हे रद्दीचे प्रमाणही दरवर्षी वाढत आहे.कोणतेही शासकीय काम हे कागदांशिवाय होत नाही. महापालिकेतही असे शेकडो कागद दररोज वापरले. त्यात महापालिकेच्या निमंत्रणपत्रिकांपासून ते विविध विभागांमध्ये लागणाऱ्या प्रिंटिंगसाठीच्या कागदांचा समावेश आहे. तर महापालिकेकडे शेकडो नागरिक दररोज विविध विभागांसाठी अर्ज करत असतात, याशिवाय महापालिकेची स्वतंत्र प्रिंटिंग प्रेस असून त्या ठिकाणी पालिकेच्या दैनंदिन कामासाठीची छपाई केली जाते. त्यामुळे महापालिकेत मोठ्या प्रमाणावर कागदाची आवश्यकता भासते. मात्र, तेवढेच प्रमाण वाया जाणाऱ्या कागदांचेही असल्याचे दिसून येते. या रद्दीत, कात्रण, कागदी बोळा, निरस्त, वर्तमानपत्र, जकात रद्दी, टोपलीत टाकण्यात आलेले कागदी बोळे, या रद्दीचा समावेश आहे. महापालिकेत २०१४-१५ या आर्थिक वर्षात साठलेली रद्दी विक्रीसाठी देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला असून त्यातून ही माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, महापालिकेत २०१२-१३ मध्ये तब्बल ४९ हजार ४०० किलो रद्दी तयार झाली. तर २०१३-१४ मध्ये ४२ हजार ६०० किलो रद्दी तयार झाली. तर मागील वर्षी २०१४-१५ मध्ये या रद्दीत तब्बल १३ हजार किलोंची वाढ होऊन हा आकडा ५५ हजार ५०० किलोंच्या घरात पोहोचला आहे.तीन महिन्यांत चौदा लाखांचा महसूल महापालिकेस या रद्दीच्या विक्रीतून गेल्या तीन महिन्यांत सुमारे, १४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यात २०१२-१३ मध्ये ४ लाख ३३ हजा़र रुपये, २०१३-१४ मध्ये ४ हजार रुपये, २०१४-१५ मध्ये ५ लाख ४८ हजार रुपये मिळाले आहेत; तर या वर्षीच्या विक्रीतून प्रशासन ६ ते ७ लाख रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तीन वर्षांपासून महापालिकेच्या सर्व विभागांची कार्यपद्धती आॅनलाइन होत असताना, दुसरीकडे हे रद्दीचे प्रमाणही दरवर्षी वाढत आहे.