शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या आराखड्यानुसारच रिंग रोडची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शेतकऱ्यांना देशोधडीला लावून केलेला विकास आम्हाला अमान्य आहे. जुन्या आराखड्यानुसारच रिंग रोड करा, जर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शेतकऱ्यांना देशोधडीला लावून केलेला विकास आम्हाला अमान्य आहे. जुन्या आराखड्यानुसारच रिंग रोड करा, जर तुम्ही तसे करणार नसाल तर आमचा कडवा विरोध असेल, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना सुनावले.

रिंगरोडमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन मंगळवारी पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या वेळी आमदार भीमराव तापकीर, तसेच सिंहगड खोऱ्यातील मुठा, सांगरुण, कातवडी, वरदाडे, खामगाव मावळ, शिवगंगा खोऱ्यातील खोपी, कांजले, केलवडे व भोर येथील अल्पभूधारक शेतकरी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रिंगरोडचा जो आराखडा तयार केला होता. त्यात शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होत नव्हता. मात्र, महाविकास आघाडी सरकारने काही जणांचे हित डोळ्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा घाट घातला आहे. अशाप्रकारे विकासकामे राबवली जाणार असतील तर ते आम्हाला अमान्य आहे. त्यामुळे प्रस्तावित आराखडा रद्द करावा. अन्यथा, आमचा कडवा विरोध असेल अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

---

सरकारचे वागणे ‘हम करे सो कायदा’

विद्यमान सरकार ‘हम करे सो कायदा’ या भूमिकेत वागत आहे. त्यामुळे सातत्याने विकासाभिमुख प्रकल्प तयार करण्याऐवजी, काही जणांचे हितसंबंध जपण्यासाठी काम करत आहे. राज्य सरकारच्या या धोरणामुळे जनता देखील त्रस्त आहे. आगामी काळात जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.