शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

बीएसएनएलची सेवा सहा दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 02:22 IST

परिसरात गेल्या ६ दिवसांपासून बीएसएनएलची दूरध्वनी, इंटरनेट सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

सोमेश्वरनगर : परिसरात गेल्या ६ दिवसांपासून बीएसएनएलची दूरध्वनी, इंटरनेट सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. भारत संचार निगम लि.च्या सोमेश्वर केंद्राची सलग सहा दिवस होऊन गेल्यानंतर बीएसएनएलचे लँडलाईन, ब्रॉडबँड सेवा बंद आहे.हजारो ग्राहकांनी एक्स्चेंजला फोन लावायचा प्रयत्न केला, तर केंद्रच बंद आहे. ट्रायच्या नियमानुसार ग्रामीण भागात सेवांची बंधने इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्याला बंधनकारक आहे. त्यानुसार सर्वांत जास्त सरकारचा वाटा असलेली बीएसएनएल सेवा ग्रामीण भागात फक्त नावापुरती उरलेली दिसत आहे. इतर स्पर्धक कंपन्यांनी आपापले प्लॅन बदलून अधिकाधिक सुविधा दिल्या; मात्र बीएसएनएल सतत घोटाळ्यांनी त्रस्त असते. सोमेश्वर परिसरात तर दर आठ दिवसांना काही ना काही घोटाळा चालूच असतो.बीएसएनएलची सेवा लवकर सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. बीएसएनएलबरोबर आयडिया, जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांचीही सेवा ग्राहकांना मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षापासून आयडिया आणि जिओ या दोन कंपन्यांची तर सोमेश्वरनगर सोडल्यानंतर दीड किलोमीटरवर पण रेंज येत नाही. या कंपन्या ग्राहकांना फोर जीचे आमिष दाखवून फोर जी नेटवर्कचा मोबदला घेऊन प्रभावी इंटरनेट सुविधा देत नसल्याचे चित्र आहेत.ग्राहकांचे पैसे मातीमोल...सोमेश्वर कारखाना, सोमेश्वर देवस्थान परिसरात, नीरा रेल्वे स्थानक, मोरगाव, शिरूर-सातारा महामार्ग आदी बाबींबरोबरच शैक्षणिक संकुलाने सोमेश्वर परिसरात बीएसएनएलचे ग्राहक वाढले. गेल्या सहा दिवसांत हजारो ग्राहकांनी ब्रॉडबँडपोटी व लँडलाईनपोटी भाडे विनाकारण घालवल्याची तक्रार केली आहे.महिन्याचे भाडे एकदम आकारणारी कंपनी ग्राहकांचे नुकसान कसे भरून देणार, हा प्रश्न आहे. अनेकांनी हे भाडे वसूल करण्यासाठी ग्राहक मंचात जाण्याचा निर्णय घेतला आहे. उदासीन अधिकारी फक्त ‘घोटाळा आहे,’ एवढेच माफक उत्तर देतात. ‘लवकरच निघेल, पुण्याहून टीम आली आहे,’ असे माळेगाव केंद्राचे अधिकारी सांगत आहेत.

टॅग्स :BSNLबीएसएनएलMobileमोबाइल