शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बीएसएनएलची सेवा सहा दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 02:22 IST

परिसरात गेल्या ६ दिवसांपासून बीएसएनएलची दूरध्वनी, इंटरनेट सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

सोमेश्वरनगर : परिसरात गेल्या ६ दिवसांपासून बीएसएनएलची दूरध्वनी, इंटरनेट सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. भारत संचार निगम लि.च्या सोमेश्वर केंद्राची सलग सहा दिवस होऊन गेल्यानंतर बीएसएनएलचे लँडलाईन, ब्रॉडबँड सेवा बंद आहे.हजारो ग्राहकांनी एक्स्चेंजला फोन लावायचा प्रयत्न केला, तर केंद्रच बंद आहे. ट्रायच्या नियमानुसार ग्रामीण भागात सेवांची बंधने इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्याला बंधनकारक आहे. त्यानुसार सर्वांत जास्त सरकारचा वाटा असलेली बीएसएनएल सेवा ग्रामीण भागात फक्त नावापुरती उरलेली दिसत आहे. इतर स्पर्धक कंपन्यांनी आपापले प्लॅन बदलून अधिकाधिक सुविधा दिल्या; मात्र बीएसएनएल सतत घोटाळ्यांनी त्रस्त असते. सोमेश्वर परिसरात तर दर आठ दिवसांना काही ना काही घोटाळा चालूच असतो.बीएसएनएलची सेवा लवकर सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. बीएसएनएलबरोबर आयडिया, जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांचीही सेवा ग्राहकांना मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षापासून आयडिया आणि जिओ या दोन कंपन्यांची तर सोमेश्वरनगर सोडल्यानंतर दीड किलोमीटरवर पण रेंज येत नाही. या कंपन्या ग्राहकांना फोर जीचे आमिष दाखवून फोर जी नेटवर्कचा मोबदला घेऊन प्रभावी इंटरनेट सुविधा देत नसल्याचे चित्र आहेत.ग्राहकांचे पैसे मातीमोल...सोमेश्वर कारखाना, सोमेश्वर देवस्थान परिसरात, नीरा रेल्वे स्थानक, मोरगाव, शिरूर-सातारा महामार्ग आदी बाबींबरोबरच शैक्षणिक संकुलाने सोमेश्वर परिसरात बीएसएनएलचे ग्राहक वाढले. गेल्या सहा दिवसांत हजारो ग्राहकांनी ब्रॉडबँडपोटी व लँडलाईनपोटी भाडे विनाकारण घालवल्याची तक्रार केली आहे.महिन्याचे भाडे एकदम आकारणारी कंपनी ग्राहकांचे नुकसान कसे भरून देणार, हा प्रश्न आहे. अनेकांनी हे भाडे वसूल करण्यासाठी ग्राहक मंचात जाण्याचा निर्णय घेतला आहे. उदासीन अधिकारी फक्त ‘घोटाळा आहे,’ एवढेच माफक उत्तर देतात. ‘लवकरच निघेल, पुण्याहून टीम आली आहे,’ असे माळेगाव केंद्राचे अधिकारी सांगत आहेत.

टॅग्स :BSNLबीएसएनएलMobileमोबाइल