शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

बीआरटी बनली ‘बिमारू’

By admin | Updated: July 8, 2017 02:27 IST

महापालिकेतर्फे निगडी-दापोडी दरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटीएस मार्ग उभारला आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेतर्फे निगडी-दापोडी दरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटीएस मार्ग उभारला आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. असे असतानाही इतक्या वर्षांत हा मार्ग सुरू झालेला नाही. त्यामुळे हा मार्ग म्हणजे बिमारू रोड ट्रान्सपोर्ट सर्व्हिस झाला आहे. अधिकाऱ्यांची उदासीनता आणि भ्रष्ट कारभारामुळे बीआरटीएसची ही मार्गिका सुरू करण्यास सातत्याने विलंब होत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे निगडी-दापोडीदरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टम अर्थात बीआरटीएस मार्गिका उभारली आहे; मात्र काही वर्षांपासून या मार्गाला सातत्याने विलंब होत आहे. तांत्रिक त्रुटी पुढे करून महापालिकेचे संबंधित अधिकारी वेळ मारून नेत आहेत. यातून केवळ काही ठेकेदारांचे हित साधण्याचा प्रयत्न होत आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या मार्गाच्या कामात अनेक त्रुटी दाखवत आणि या मार्गाच्या कामाला विलंब करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. परिणामी या मार्गाचे काम अपूर्णावस्थेत आहे. बीआरटीमुळे निगडी-दापोडी या मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. ग्रेड सेपरेटरसाठीचे इनमर्ज आणि आऊटमर्ज या बीआरटीएससाठी सातत्याने बदलण्यात येत आहेत. त्यामुळे या मार्गावरील सेवा रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली. बीआरटीएस मार्ग खुला न झाल्याने पीएमपीएमएल बसही सेवा रस्त्यांवरूनच धावतात. त्यामुळे सेवा रस्त्यांवरील वाहनांमध्ये अधिकच भर पडते. परिणामी सेवा रस्त्यावर सातत्याने वाहतूककोंडी होते. सिग्नलला वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे वाहनांचा खोळंबा होऊन शहराच्या प्रदूषणात वाढ होत आहे. वाहतुकीचे नियोजन ढासळल्याने अपघात होत आहेत.मेट्रोच्या कामाने वाहतुकीचा खोळंबा पुणे-मुंबई महामार्गावर वल्लभनगर येथे मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे वल्लभनगर येथे महामार्गावर या कामासाठी अर्धा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. केवळ एक पदरी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. परिणामी येथे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे बहुतांश वाहनचालक वल्लभनगर येथील सेवा रस्त्याचा वापर करीत आहेत. परिणामी सेवा रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यातच बीआरटीएस मार्गिका अद्याप सुरू न झाल्याने बससाठीही सेवा रस्त्याचाच वापर सुरू आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून पाचपट दंड वसूल करावा, अशी मागणी भाजपाचे शहर - जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.