शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

बीआरटी बनली ‘बिमारू’

By admin | Updated: July 8, 2017 02:27 IST

महापालिकेतर्फे निगडी-दापोडी दरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटीएस मार्ग उभारला आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेतर्फे निगडी-दापोडी दरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटीएस मार्ग उभारला आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. असे असतानाही इतक्या वर्षांत हा मार्ग सुरू झालेला नाही. त्यामुळे हा मार्ग म्हणजे बिमारू रोड ट्रान्सपोर्ट सर्व्हिस झाला आहे. अधिकाऱ्यांची उदासीनता आणि भ्रष्ट कारभारामुळे बीआरटीएसची ही मार्गिका सुरू करण्यास सातत्याने विलंब होत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे निगडी-दापोडीदरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टम अर्थात बीआरटीएस मार्गिका उभारली आहे; मात्र काही वर्षांपासून या मार्गाला सातत्याने विलंब होत आहे. तांत्रिक त्रुटी पुढे करून महापालिकेचे संबंधित अधिकारी वेळ मारून नेत आहेत. यातून केवळ काही ठेकेदारांचे हित साधण्याचा प्रयत्न होत आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या मार्गाच्या कामात अनेक त्रुटी दाखवत आणि या मार्गाच्या कामाला विलंब करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. परिणामी या मार्गाचे काम अपूर्णावस्थेत आहे. बीआरटीमुळे निगडी-दापोडी या मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. ग्रेड सेपरेटरसाठीचे इनमर्ज आणि आऊटमर्ज या बीआरटीएससाठी सातत्याने बदलण्यात येत आहेत. त्यामुळे या मार्गावरील सेवा रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली. बीआरटीएस मार्ग खुला न झाल्याने पीएमपीएमएल बसही सेवा रस्त्यांवरूनच धावतात. त्यामुळे सेवा रस्त्यांवरील वाहनांमध्ये अधिकच भर पडते. परिणामी सेवा रस्त्यावर सातत्याने वाहतूककोंडी होते. सिग्नलला वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे वाहनांचा खोळंबा होऊन शहराच्या प्रदूषणात वाढ होत आहे. वाहतुकीचे नियोजन ढासळल्याने अपघात होत आहेत.मेट्रोच्या कामाने वाहतुकीचा खोळंबा पुणे-मुंबई महामार्गावर वल्लभनगर येथे मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे वल्लभनगर येथे महामार्गावर या कामासाठी अर्धा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. केवळ एक पदरी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. परिणामी येथे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे बहुतांश वाहनचालक वल्लभनगर येथील सेवा रस्त्याचा वापर करीत आहेत. परिणामी सेवा रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यातच बीआरटीएस मार्गिका अद्याप सुरू न झाल्याने बससाठीही सेवा रस्त्याचाच वापर सुरू आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून पाचपट दंड वसूल करावा, अशी मागणी भाजपाचे शहर - जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.