शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटी बनली ‘बिमारू’

By admin | Updated: July 8, 2017 02:27 IST

महापालिकेतर्फे निगडी-दापोडी दरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटीएस मार्ग उभारला आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेतर्फे निगडी-दापोडी दरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटीएस मार्ग उभारला आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. असे असतानाही इतक्या वर्षांत हा मार्ग सुरू झालेला नाही. त्यामुळे हा मार्ग म्हणजे बिमारू रोड ट्रान्सपोर्ट सर्व्हिस झाला आहे. अधिकाऱ्यांची उदासीनता आणि भ्रष्ट कारभारामुळे बीआरटीएसची ही मार्गिका सुरू करण्यास सातत्याने विलंब होत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे निगडी-दापोडीदरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टम अर्थात बीआरटीएस मार्गिका उभारली आहे; मात्र काही वर्षांपासून या मार्गाला सातत्याने विलंब होत आहे. तांत्रिक त्रुटी पुढे करून महापालिकेचे संबंधित अधिकारी वेळ मारून नेत आहेत. यातून केवळ काही ठेकेदारांचे हित साधण्याचा प्रयत्न होत आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या मार्गाच्या कामात अनेक त्रुटी दाखवत आणि या मार्गाच्या कामाला विलंब करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. परिणामी या मार्गाचे काम अपूर्णावस्थेत आहे. बीआरटीमुळे निगडी-दापोडी या मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. ग्रेड सेपरेटरसाठीचे इनमर्ज आणि आऊटमर्ज या बीआरटीएससाठी सातत्याने बदलण्यात येत आहेत. त्यामुळे या मार्गावरील सेवा रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली. बीआरटीएस मार्ग खुला न झाल्याने पीएमपीएमएल बसही सेवा रस्त्यांवरूनच धावतात. त्यामुळे सेवा रस्त्यांवरील वाहनांमध्ये अधिकच भर पडते. परिणामी सेवा रस्त्यावर सातत्याने वाहतूककोंडी होते. सिग्नलला वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे वाहनांचा खोळंबा होऊन शहराच्या प्रदूषणात वाढ होत आहे. वाहतुकीचे नियोजन ढासळल्याने अपघात होत आहेत.मेट्रोच्या कामाने वाहतुकीचा खोळंबा पुणे-मुंबई महामार्गावर वल्लभनगर येथे मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे वल्लभनगर येथे महामार्गावर या कामासाठी अर्धा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. केवळ एक पदरी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. परिणामी येथे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे बहुतांश वाहनचालक वल्लभनगर येथील सेवा रस्त्याचा वापर करीत आहेत. परिणामी सेवा रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यातच बीआरटीएस मार्गिका अद्याप सुरू न झाल्याने बससाठीही सेवा रस्त्याचाच वापर सुरू आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून पाचपट दंड वसूल करावा, अशी मागणी भाजपाचे शहर - जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.