शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

अपंग सैनिकांसमवेत भाऊबीज

By admin | Updated: November 16, 2015 01:58 IST

देशासाठी लढताना आलेले अपंगत्व, कुटुंबीयांपासून आणि सण- उत्सवांपासून दूर असलेले सैनिक आणि समाजसेवेचे व्रत घेतलेल्या सामाजिक संस्था व गणेशोत्सव मंडळांनी प्रेरणादायी

पुणे : देशासाठी लढताना आलेले अपंगत्व, कुटुंबीयांपासून आणि सण- उत्सवांपासून दूर असलेले सैनिक आणि समाजसेवेचे व्रत घेतलेल्या सामाजिक संस्था व गणेशोत्सव मंडळांनी प्रेरणादायी वातावरणात अपंग सैनिकांसमवेत भाऊबीजेचा आनंद लुटला.निमित्त होते बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि सैनिक मित्र परिवारातर्फे खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रातील सैनिकांसाठी आयोजित साहित्यिकांसोबत भाऊबीज या कार्यक्रमाचे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वीणा देव यांनी सैनिकांना औक्षण करुन त्यांच्याशी संवाद साधला. केंद्राचे प्रमुख कर्नल डॉ. पी. आर. मुखर्जी, ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा, सैनिक मित्र परिवाराचे अशोक मेहंदळे, दिलीप गिरमकर, गिरीश देशपांडे, नरेंद्र व्यास, अमित दासानी, अमर हिरेशिखर, संकेत निंबाळकर, सुनील फाटक, अरविंद पारखी, मीनाक्षी दुसाने, स्वाती रजपूत, राजेंद्र बर्वे, स्वाती ओतारी, विद्या घाणेकर, रेणुका शर्मा, गंधाली शहा, निराली लातूरकर आदी उपस्थित होते.वीणा देव म्हणाल्या, ‘‘आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दु:खे असतात. परंतु आपले सैनिक आपल्यासाठी जे सहन करतात, त्याच्या तुलनेत आपल्या दु:खाचे मोल काहीही नसते. देशाच्या सीमेवर अहोरात्र आपले रक्षण करणाऱ्या सैनिकांकडे पाहूनच आपले बनोेबल वाढत असते.’’डॉ. मुखर्जी म्हणाले, ‘‘अपंगत्व आल्यानंतर सैनिकांचे पुढील आयुष्य अवघड असते. त्यामुळे सैनिकांसमवेत सण-उत्सव साजरे केल्याने त्यांचे मनोबल वाढते. अपंगत्व आले तरीही प्रत्येक सैनिकामधील सकारात्मकता मोठी असते. कोणत्याही संकटाला ते धैर्याने सामोरे जातात. केवळ सैनिकच देशसेवा करतात असे नाही तर देशातील प्रत्येक जण आपल्यापरीने आपल्या क्षेत्रात योगदान देऊन देशसेवाच करीत असतो.’’ आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)