शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ब्रेकडाऊन पीएमपीला ‘ब्रेक’ लावण्याचे आदेश

By admin | Updated: April 2, 2017 02:47 IST

देखभाल-दुरुस्तीअभावी सातत्याने रस्त्यातच बंद पडणाऱ्या (ब्रेकडाऊन) बसेसचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे

पुणे : देखभाल-दुरुस्तीअभावी सातत्याने रस्त्यातच बंद पडणाऱ्या (ब्रेकडाऊन) बसेसचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी प्रयत्न सुरू केले आहे. सध्याचे ब्रेकडाऊनचे प्रमाण २० ते ३० टक्के असून, ते दहा टक्क्यांपर्यंत खाली आणावे, असा आदेश त्यांनी सर्व आगारप्रमुखांना दिला आहे. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच महत्त्वाचे निर्णय घेऊन पीएमपीच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी कामाची वेळ बदलण्याचा पहिला निर्णय घेतला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी कामावर वेळेत न आलेल्या ११७ कर्मचाऱ्यांचा दिवस विनावेतन करण्यात आला. ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यासाठीही आता त्यांनी प्रयत्न सुरू केले आहे. सद्यस्थितीत पीएमपीच्या २७५ ते ३०० बस दररोज मार्गावरच बंद पडतात. त्यामुळे हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच पीएमपीला उत्पन्नावरही पाणी सोडावे लागत आहे. पीएमपीची प्रतिमाही खराब झाली आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात मालकीच्या व भाडेतत्त्वावरील एकूण २०३६ बसेस असून, त्यातील सुमारे १३०० ते १४०० बसेस दररोज मार्गावर असतात. मात्र त्यातील सरासरी २७५ ते ३०० बसेस रोज अनेक कारणांमुळे ब्रेकडाऊन होत आहेत. सध्या हे प्रमाण २० ते ३० टक्क्यांच्या घरात आहे. हे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे आदेश मुंढे यांनी दिले आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी अनेक बस सातत्याने बंद पडतात. (प्रतिनिधी)