शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

आळंदी यात्रेतील कोट्यवधींच्या उलाढालीला ब्रेक.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:27 IST

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील कार्तिकीवारी तथा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा कोरोनामुळे मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित संपन्न होत आहे. यात्रा कालावधीत ...

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील कार्तिकीवारी तथा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा कोरोनामुळे मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित संपन्न होत आहे. यात्रा कालावधीत प्रशासनाकडून आळंदीत संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याचे पालन केले जात आहे. यापार्श्वभूमीवर आळंदीतील पान, फुले, हार, प्रसाद विक्री, पेढे, खेळणी, पूजेचे साहित्य व इतर व्यवसाय बंद राहणार असल्याने कोट्यावधी रुपयांची उलाढाल थांबली आहे.

आषाढी व कार्तिकीवारीचा संजीवन समाधी सोहळा आळंदी शहराचा आर्थिक कणा मानला जातो. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना महामारीच्या संकटामुळे माऊलींचे मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने मंदिर परिसरातील व्यवसाय ठप्प होऊन अर्थकारण ठप्प झाले होते. दुकानातील माल टाकून देण्याची वेळ व्यावसायिकांवर आली. दरम्यान दिवाळीत मंदिरे खुले करण्याचा आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आला. त्यानंतर विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा सुरळीत करण्यासाठी व्यावसायिकांनी सुरुवात केली. सध्या सुरू असलेल्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी दुकानदारांनी नव्याने माल भरला. मात्र, यात्रा कालावधीत संचारबंदीचे आदेश लागू झाल्यानंतर पुन्हा दुकाने बंद करण्यात आल्याने दुकानातील संपूर्ण माल वाया जाण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे.

दरम्यान आठ दिवसीय कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत असतात. या आठ दिवसाच्या यात्रेत आळंदीत बहुतांशी सर्वच व्यावसायिकांची लाखोंची उलाढाल होत असते. परंतु यंदा कोरोनाच्या महामारीमुळे हे आर्थिक चक्र बंद पडले आहे.

चौकट.................

तीर्थक्षेत्र आळंदीत संजीवन समाधी मंदिराच्या आजुबाजूला दोनशेहून अधिक छोटी - मोठी दुकाने आहेत. यामध्ये पाने-फुले, प्रसाद, हार, खेळणी, तुळशीच्या माळा आदी वस्तू विक्री केल्या जातात. व्यावसायिकांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर आहे. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून अर्थकारण बंद आहे. त्यामुळे व्यवसायासाठी घेतलेले कर्ज, हप्ते, व्याज त्याचबरोबर कुटुंबाचा उदरनिर्वाह हे सारे अर्थकारण करायचे कसे? असा गंभीर प्रश्न या व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे.

मानाच्या तिनही दिंड्या एकादशीला येणार आळंदीत

कार्तिकी वारीसाठी शासनाने परवानगी दिलेल्या मानाच्या तीन दिंड्या एकादशीच्या दिवशी (दि.११) आळंदीत एसटीने दाखल होणार आहेत. पंढरपूरातून कार्तिकी वारीसाठी श्री पांडरुंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या मानाच्या तीन दिंड्या एसटीने वीस वारकऱ्यांसह येणार आहेत.

फोटो

०९ आळंदी यात्रा

तीर्थक्षेत्र आळंदीत संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली दुकाने. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)