शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

अत्याचारांना पालिकाही जबाबदार

By admin | Updated: August 24, 2016 01:09 IST

वारजे माळवाडी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारावरून नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत मंगळवारी पालिका प्रशासनाचे वाभाडे काढले.

पुणे : वारजे माळवाडी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारावरून नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत मंगळवारी पालिका प्रशासनाचे वाभाडे काढले. महिलांसाठीच्या स्वच्छतागृह, शौचालय बांधणी, सुरक्षेकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळेच असे प्रकार होत असल्याची टीका करण्यात आली. आयुक्तांनी आकडेवारी देत सावरून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त महिला सदस्यांचे समाधान झाले नाही.माधुरी सहस्रबुद्धे यांनी हा विषय उपस्थित केला. वारजे माळवाडी येथील ती घटना त्या कुटुंबाकडे शौचालय नसल्यामुळेच झाली असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मनीषा घाटे यांनी त्यावर पीएमपीच्या मुख्यालयातील महिला स्वच्छतागृहात काही जणांनी लावलेल्या कॅमेऱ्याचा विषय उपस्थित केला. शहरासाठी ही अत्यंत लाजीरवाणी घटना असून त्यातून प्रशासनाने काहीच बोध घेतला नसल्याची टीका त्यांनी केली. वर्षा तापकीर, नंदा लोणकर यांनी प्रशासनाला हा विषय गंभीर आहे असे वाटतच नसल्याचे मत व्यक्त केले.या महिला सदस्यांच्या टीकेच्या भडीमारानंतर सर्वच सदस्य प्रशासनावर घसरले. कमल व्यवहारे यांनी शहराच्या मध्यभागात महिलांसाठी म्हणून स्वच्छतागृहांची काहीच व्यवस्था नाही असे सांगितले. सुनंदा गडाळे यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. मीनल सरवदे स्वच्छतागृहांमधील अस्वच्छता व सुरक्षा यावर बोलल्या. विद्येचे माहेरघर म्हणवणाऱ्या या शहरात महिलाच काय लहान मुलीही सुरक्षित नाहीत असे त्या म्हणाल्या. धनंजय जाधव, रवींद्र माळवदकर यांनी जुन्या पुण्यात महिलांच्या सुरक्षेचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, त्यात प्रामुख्याने त्यांच्या स्वच्छतागृहांची व्यवस्था हा विषय असून त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे असे ते म्हणाले.चंचला कोद्रे, पुष्पा कनोजिया, वसंत मोरे, सचिन भगत, कर्णे गुरुजी, डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. फक्त उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्हणून शौचालये बांधण्यात येत आहेत. त्याचे ड्रेनेज, पाणी, सुरक्षा याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. आयुक्तांपासून क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांपर्यंत कोणीही सुरक्षा उपाय राबविण्याचा साधा विचारही करीत नाहीत असे ते म्हणाले. सचिन दोडके यांनी या गंभीर विषयाबाबत प्रशासनाकडे काही धोरणच नसल्याची टीका केली. नागरिकांकडून मिळकत कर वसलू केला जातो, मात्र त्यांना नागरी सुविधा दिल्या जात नाहीत. अशा अनेक वसाहती उपनगरांमध्ये आहेत. तिथे त्वरित काही केले नाही तर यापुढेही अशा घटना होत राहतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली.आयुक्त कुणाल कुमार यांनी आकडेवारी देत सदस्यांना आवर घालण्याच्या प्रयत्न केला, मात्र कोणीही त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. उलट उद्दिष्टपूर्तीसाठी म्हणून ड्रेनेज किंवा अन्य व्यवस्था नसतानाही शौचालये बांधली गेली अशी टीका करण्यात आली. शहरात लवकरच मोबाईल शौचालये सुरू करण्यात येत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. स्वच्छतागृहे, शौचालये आवश्यक आहेत अशी गर्दीची १३० ठिकाणे शहरात निश्चित करण्यात आली असून, तिथे सार्वजनिक शौचालये बांधण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) >शौचालय बांधणीत पुणे महापालिकेचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. एका वर्षात पालिकेने १३ हजार ५०० वैयक्तिक शौचालये बांधली. शहरात कुठे त्याची गरज आहे याचा अभ्यास करूनच हे काम सुरू आहे. येत्या वर्षभरात आणखी ८ हजार शौचालये बांधण्यात येणार आहेत. जुन्या वाड्यांमध्ये घरमालक- भाडेकरू वाद असतात, त्यामुळे मर्यादा येतात, मात्र त्यावर मार्ग काढला जात आहे. सुरक्षा व स्वच्छता याबाबतही प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. वारजे-माळवाडी परिसरात त्वरित काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. यात काही अडचणी असतील तर त्या सोडविण्याचे प्रयत्न प्रशासन कसोशीने करीत आहे.- कुणाल कुमार, आयुक्त