शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

उदंड जाहली वाहने, पोलीस मात्र तोकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 01:25 IST

- राजानंद मोरे  पुणे : वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठीची यंत्रणाच मनुष्यबळाअभावी दुबळी झाली आहे. पुणे व ...

- राजानंद मोरे 

पुणे : वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठीची यंत्रणाच मनुष्यबळाअभावी दुबळी झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील अर्धा कोटीहून अधिक वाहनांसाठी वाहतूक पोलिसांची केवळ १६६८ पदे मंजूर असून, त्यापैकी जवळपास पावणेचारशे पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच वाहतूक नियमन, कारवाई व इतर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये वाहने उदंड झाली आहेत. २००८-०९ या आर्थिक वर्षात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (एमएच १२) सुमारे साडेसतरा लाख तर पिंपरी चिंचवड कार्यालयाकडे (एमएच १४) ६ लाख २९ हजार ९७६ वाहनांची नोंदणी झाली होती. या वर्षी ३१ जानेवारीअखेरपर्यंत ही संख्या अनुक्रमे सुमारे ३८ लाख व १८ लाखांवर पोहोचली आहे. पुणे व पिंपरी- चिंचवडमधील वाहनसंख्या ५० लाखांहून अधिक होते.

एकीकडे वाहनांचे प्रमाण वाढत असताना वाहतुकीवर नियंत्रण ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसांना अपुºया मनुष्यबळावरच काम करावे लागत आहे. स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय होण्यापूर्वी दोन्ही शहरांमध्ये वाहतुकीचे एकूण २८ विभाग होते. एकूण १६६८ वाहतूक पोलिसांची पदे मंजूर होती. त्यापैकी १२९१ कर्मचारी मिळाले होते. पिंपरी- चिंचवड स्वतंत्र झाल्यानंतर पुण्यासाठी केवळ ११०८ कर्मचारी शिल्लक राहिले आहेत. तर पिंपरीला सुमारे २५० कर्मचारी देण्यात आले आहेत. पुणे शहरात उपलब्ध कर्मचाऱ्यांमध्येही दररोज ३०० ते ३५० कर्मचारी सुट्टी किंवा रजेवर असतात.पोलिसांची कसरत : १२ तासांवर काममनुष्यबळ कमी असल्याने केवळ मोठे चौक, मार्गांवरच लक्ष केंद्रित करावे लागते. सध्याचे सिग्नल, चौक, वाहनांची संख्या, वाहतूककोंडी, रस्त्यावर चाललेली कामे पाहता वाहतूक पोलिसांची संख्या तोकडी आहे. परिणामी वाहतूककोंडी फोडताना पोलिसांना कसरत करावी लागते. अनेकदा १२ तासांपेक्षा जास्त काम करावे लागते, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.वाहनसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असली तरीही वाहने कमी व्हावीत याचा महानगरपालिकेने विचार केला पाहिजे. याशिवाय, आता प्रशासकीय बदल करण्याची गरज आहे. वाहतूक पोलीस यंत्रणेत तज्ज्ञ अधिकारी असावेत. जेणेकरून नियोजन, व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे शक्य होईल. सध्या पोलीस खात्यातील कोणत्याही शाखेतील अधिकारी वाहतूक विभागात येतात. वाहतूक पोलीस शहरांतर्गत कसे येतील, हे पाहायला हवे.- प्रांजली देशपांडे,वाहतूकतज्ज्ञ