शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विहिरींनी गाठला तळ

By admin | Updated: May 10, 2016 00:48 IST

उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शेतातील विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. उसाचे पीक वाचविण्यासाठी निमसाखर (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विंधन विहिरी

निरवांगी : उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शेतातील विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. उसाचे पीक वाचविण्यासाठी निमसाखर (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विंधन विहिरी घेण्याकडे कल दिसून येत आहे. पाटबंधारे खात्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या परिसरातील शेतीपिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. या परिसरातील विहिरींचे पाणी संपलेले असल्याने कालव्यावरील शेतकऱ्यांचा विंधन विहिरी घेण्याकडे कल दिसून येत आहे. निमसाखर, कंळब या रस्त्याने मोठ्या प्रमाणात विहिरी शेतकरी पोकलेनच्या साह्याने खोदण्याचे काम करीत आहेत; परंतु पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेल्याने हजारो रुपये खर्च करूनही पाणी लागत नाही. > नियोजनाअभावी अकोलेत पाणीटंचाईअकोले : परिसरात दिवसेंदिवस पाणीटंचाई जोर धरत आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत. मात्र, पाण्याचा साठा आणि टँकर भरण्यासाठी दिलेल्या वेळेचे नियोजन नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाण्याच्या खेपा टाकण्यात टँकर वाहतूकदारांना अडचण निर्माण होत आहे.अकोले परिसरात गावठाण, दराडेवस्ती, गायकवाडवस्ती, वायसेवाडी, धायगुडे या ठिकाणी दररोज ८ खेपा टाकण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत. मात्र, पुरेशा खेपा मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत सरपंच सुनीता वणवे म्हणाल्या, ‘‘प्रशासनाने दोन टँकर मंजूर केले आहेत. वायसेवाडी, धायगुडेवाडी परिसरात पाण्याच्या खेपा ठरल्याप्रमाणे मिळत आहेत. मात्र, गावातील वस्ती परिसरात टँकरचे नियोजन कोलमडले आहे. खेपा मिळण्यात अडचण येत आहेत.याबाबत गटविकास अधिकारी अनिकेत पाटील यांनी सांगितले, की विजेची कमतरता असल्याने तसेच पाणी भरण्यासाठी दिलेल्या वेळेत टँकर न पोहोचल्यास खेप टाकण्यात अडचण येत आहे; मात्र काही कारणास्तव पाणी मिळण्यास अडचण निर्माण झाल्यास संबंधितांनी सूचना करावी. त्यानंतर टँकर पूर्ववत करण्यात येईल.