शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पुस्तक विक्री झाली नाही, भाड्याचे पैसे परत द्या; अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची मागणी

By श्रीकिशन काळे | Updated: February 5, 2024 18:28 IST

संमेलनाच्या स्थळापासून पुस्तकाचे गाळे खूप लांब होते. श्रोते तिथपर्यंत यायला कंटाळत असल्याने पुस्तक प्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला नाही.

पुणे : अमळनेर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वाचकांचा खूप कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुस्तक प्रदर्शनात विक्री देखील झाली नाही. परिणामी प्रदर्शनाच्या भरलेल्या भाड्याची पूर्ण रक्कम परत देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने स्वागताध्यक्ष गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. जर रक्कम परत दिली नाही तर पुढच्या वर्षी संमेलनावर बहिष्कार घालण्याची धमकी प्रकाशकांनी दिली आहे.

अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले. त्याला वाचकांची अजिबात गर्दी नव्हती. त्यामुळे संमेलनातील सभामंडप आणि पुस्तक प्रदर्शनातील स्टॉल्स ओस पडलेले होते. कोणत्याही प्रकाशनाच्या पुस्तकांची विक्री झाली नाही. म्हणून प्रकाशक संघाची बैठक सोमवारी (दि.५) पुण्यात झाली. त्यामध्ये प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्ष दत्तात्रय पाष्टे आदी उपस्थित होते.

संमेलनाच्या स्थळापासून पुस्तकाचे गाळे खूप लांब होते. श्रोते तिथपर्यंत यायला कंटाळत असल्याने पुस्तक प्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला नाही. अमळनेर हे खूप छोटे शहर आहे. तेथे जवळजवळ २७५ गाळे दिले होते, हे खरं तर असंयुक्तिक होते. संमेलनाला म्हणावी तशी गर्दी झाली नाही. त्यात जी मंडळी आली ती लांबवरच्या स्टॉलवर फार कमी वेळ होती. पुस्तक विक्रीला जो माहोल निर्माण व्हावा लागतो तो निर्माण झाला नाही. गावोगावच्या अनेक गरीब प्रकाशकांनी साहित्य संमेलनात स्टॉल लावले होते. त्यांचे नुकसान झाले आहे. प्रत्येकाला दहा ते पंधरा हजार रूपयांच्या पुस्तकांची विक्री होईल, असे वाटत होते. परंतु, केवळ पाचशे ते हजार रूपयांची देखील विक्री झाली नाही. त्यामुळे सर्व प्रकाशकांचे नुकसान झाले, असे निवेदनात नमूद आहे.

कोणी दु:खाने, कोणी संतापाने, आज प्रत्येक स्टॉलधारक, प्रकाशक हा संघाकडे आपले गाऱ्हाणे मांडत आहे. त्यामुळे आम्ही बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. अशी परिस्थिती अपवादात्मक आहे. यापूर्वी परळी वैजनाथ येथील संमेलनात खूप पाऊस झाला होता. तेव्हा नुकसानभरपाई पोटी तत्कालीन स्वागताध्यक्ष स्व. गोपीनाथ मुंडे यांनी स्टॉलधारकांना ५ हजार रूपयांचा चेक दिला होता. म्हणून यंदा प्रकाशकांनी भाड्यापोटी भरलेली रक्कम परत द्यावी, अशी मागणी संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी केली आहे.