शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
7
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
8
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
9
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
10
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
11
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
12
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
13
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
14
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
15
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
16
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
17
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
18
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
19
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
20
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?

पुस्तक विक्री झाली नाही, भाड्याचे पैसे परत द्या; अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची मागणी

By श्रीकिशन काळे | Updated: February 5, 2024 18:28 IST

संमेलनाच्या स्थळापासून पुस्तकाचे गाळे खूप लांब होते. श्रोते तिथपर्यंत यायला कंटाळत असल्याने पुस्तक प्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला नाही.

पुणे : अमळनेर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वाचकांचा खूप कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुस्तक प्रदर्शनात विक्री देखील झाली नाही. परिणामी प्रदर्शनाच्या भरलेल्या भाड्याची पूर्ण रक्कम परत देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने स्वागताध्यक्ष गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. जर रक्कम परत दिली नाही तर पुढच्या वर्षी संमेलनावर बहिष्कार घालण्याची धमकी प्रकाशकांनी दिली आहे.

अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले. त्याला वाचकांची अजिबात गर्दी नव्हती. त्यामुळे संमेलनातील सभामंडप आणि पुस्तक प्रदर्शनातील स्टॉल्स ओस पडलेले होते. कोणत्याही प्रकाशनाच्या पुस्तकांची विक्री झाली नाही. म्हणून प्रकाशक संघाची बैठक सोमवारी (दि.५) पुण्यात झाली. त्यामध्ये प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, उपाध्यक्ष दत्तात्रय पाष्टे आदी उपस्थित होते.

संमेलनाच्या स्थळापासून पुस्तकाचे गाळे खूप लांब होते. श्रोते तिथपर्यंत यायला कंटाळत असल्याने पुस्तक प्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला नाही. अमळनेर हे खूप छोटे शहर आहे. तेथे जवळजवळ २७५ गाळे दिले होते, हे खरं तर असंयुक्तिक होते. संमेलनाला म्हणावी तशी गर्दी झाली नाही. त्यात जी मंडळी आली ती लांबवरच्या स्टॉलवर फार कमी वेळ होती. पुस्तक विक्रीला जो माहोल निर्माण व्हावा लागतो तो निर्माण झाला नाही. गावोगावच्या अनेक गरीब प्रकाशकांनी साहित्य संमेलनात स्टॉल लावले होते. त्यांचे नुकसान झाले आहे. प्रत्येकाला दहा ते पंधरा हजार रूपयांच्या पुस्तकांची विक्री होईल, असे वाटत होते. परंतु, केवळ पाचशे ते हजार रूपयांची देखील विक्री झाली नाही. त्यामुळे सर्व प्रकाशकांचे नुकसान झाले, असे निवेदनात नमूद आहे.

कोणी दु:खाने, कोणी संतापाने, आज प्रत्येक स्टॉलधारक, प्रकाशक हा संघाकडे आपले गाऱ्हाणे मांडत आहे. त्यामुळे आम्ही बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. अशी परिस्थिती अपवादात्मक आहे. यापूर्वी परळी वैजनाथ येथील संमेलनात खूप पाऊस झाला होता. तेव्हा नुकसानभरपाई पोटी तत्कालीन स्वागताध्यक्ष स्व. गोपीनाथ मुंडे यांनी स्टॉलधारकांना ५ हजार रूपयांचा चेक दिला होता. म्हणून यंदा प्रकाशकांनी भाड्यापोटी भरलेली रक्कम परत द्यावी, अशी मागणी संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी केली आहे.