शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रक्त सांडण्यापेक्षा रक्तदान करा ; पुण्यातीस सत्यशाेधम मुस्लिम मंडळाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 20:12 IST

बकरी ईदनिमित्त कुर्बानी देऊन रक्त सांडण्यापेक्षा रक्तदान करण्याचे आवाहन करत रक्तदान शिबीराचे मुस्लिम सत्यशाेधक मंडळाकडून आयाेजन करण्यात आले हाेते.

पुणे : बकरी ईदला रक्त सांडण्यापेक्षा रक्तदान करुयात असा संदेश देत पुण्यातील मुस्लिम सत्यशाेधक मंडळातर्फे रक्तदान शिबीराचे आयाेजन करण्यात आले हाेते. पुण्यातील राष्ट्र सेवा दलाच्या शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा सांगली- काेल्हापूर येथील पूरातील जखमींना या रक्तदानाच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे. 

बकरी ईद आज देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम सत्यशाेधक मंडळाकडून बकरी ईद निमित्त कुरबानी न देता रक्तदान करण्याचा संदेश देण्यात आला. गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येताे. या उपक्रमात यंदा 50 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. रक्तदानापेक्षा कुठलेही श्रेष्ठ दान नाही. ईद निमित्त रक्त सांडण्यापेक्षा रक्तदान केल्याने दुवा मिळतील असेच या उपक्रमातून सांगण्यात आले. 

यावेळी बाेलताना मुस्लिम सत्यशाेधक मंडळाचे अध्यक्ष डाॅ. शमशुद्दीन तांबाेळी म्हणाले, आम्ही गेल्या आठ वर्षापासून बकरी ईद हा सण रक्तदान सप्ताह म्हणून आम्ही साजरा करताे. प्राण्यांची आहुती देऊन त्यांचे रक्त सांडण्यापेक्षा माणसाला उपयाेगी पडणारं, जात आणि घर्माच्यापलीकडे जात मानुसकीचं नातं जाेपसणारं रक्त सर्वांसाठी आवश्यक आहे. पारंपारिक सण समाजाभिमुख व्हायला हवेत, मानवतावादी व्हायला हवे, यासाठी या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. यंदाच्या पूरामुळे काेल्हापूर, सांगली भागात माेठी जीवीत हानी झाली आहे. तसेच तिथे रक्ताची देखील आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे रक्तसंकलन करण्यात येणार आहे. तसेच मुस्लिम सत्यशाेधक मंडळाकडून 51 हजार रुपये सुद्धा पूरग्रस्तांना देण्यात आले आहेत. हा उपक्रम धर्माच्या चिकित्सेचा नाही तर धर्माच्या उन्नयनाचा भाग आहे. आजच्या काळात माणसासाठी माणसाने जगणं हा या मागील संदेश आहे.