शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त १७८ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:09 IST

राज्यात एक आठवडा पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध असल्याने या भरारी ग्रुपच्या माध्यमातून घेतला. रक्तदान केल्याने कुणाचा तरी जीव वाचणार ...

राज्यात एक आठवडा पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध असल्याने या भरारी ग्रुपच्या माध्यमातून घेतला. रक्तदान केल्याने कुणाचा तरी जीव वाचणार असेल तर एक सामाजिक बांधिलकी या नात्याने तरूणाईने रक्तदान करायलाच हवे, असा संकल्प भरारी ग्रुपच्या वतीने कोरोना महामारी काळात केला आहे. कोरोना या विषाणूने जगात थैमान घातल्याने कोरोनाबाधित रुग्णांना व इतर रुग्णांना रक्ताची खूप टंचाई भासू लागली आहे. राज्यातील सर्व रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तपेढ्यामधे रक्तसाठा अल्प प्रमाणात आहे. रक्तदान ही काळाची गरज आहे. रक्तपुरवठ्याच्या तुटवडावर मात करण्यासाठी शासकीय जिल्हा रक्तपेढीच्या सहकार्याने बाणेरे येथील सोमेश्वर मंदिर येथे भरारी ग्रुपने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरासाठी ऑनलाइन नोंदणी ठेवली होती.

सर्व रक्तदात्यांना मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप केले. शिबिरामधे ४१ नवीन रक्तदात्यानी प्रथमच रक्तदान केले. पोलिस, युवक युवती व नागरिक यानी आवर्जून सहभाग नोंदविला. आयआरबीचे रिजनल मॅनेजर प्रदीप शहा, चार्टर्ड अकाउंटट सचिन वास्कर, डॉ. विनित गांधी, ‘आम्ही सांगलीकर’चे अध्यक्ष अरुण कदम यांनी भेट देऊन कौतुक केले.

भरारी ग्रुपचे दीपक पाटील, विनित शिंदे, प्रशांत पाटील, शैलेश घाडगे, स्वप्निल डोळस, विशाल पाटील, भगवान खसे, रोहन तावरे, संतोष इंगळे, महेश कदम, नामदेव शेलार, रवींद्र कोथेरे, ऐश्वर्या पुजारी, वृषाली राजहंस, शुभदा भोसले आदींनी परिश्रम घेतले. भरारी ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष सुभाष सातपुते यानी आयोजन केले होते.

फोटो - क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भरारी ग्रुपच्या वतीने आयोजित शिबिरात १७८ रक्तदात्यानी रक्तदान करुन मोठा प्रतिसाद दिला.