शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कोऱ्या उत्तरपत्रिकांमुळे मुख्याध्यापकांचा ‘ताप’वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:10 IST

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परंतु, मुख्य परीक्षा ...

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परंतु, मुख्य परीक्षा केंद्रांवर पाठविलेल्या कोऱ्या उत्तर पत्रिका व इतर शैक्षणिक साहित्य सांभाळण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर येऊन पडली आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला आहे. मात्र, या उत्तरपत्रिकांचे अद्याप प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर वितरण केलेले नाही. त्यामुळे बहुतांश मुख्याध्यापक-प्राचार्य निश्चिंत आहेत.

राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षांसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य मुख्य परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवले आहे. या परीक्षा केंद्रांवरून प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कोऱ्या उत्तर पत्रिका नकाशे व तोंडी परीक्षेसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुणे विभागातून अहमदनगर व सोलापूर या तीन जिल्ह्यातून बारावीचे २ लाख ३० हजार ९८३ विद्यार्थी तर दहावीचे २ लाख ७१ हजार ५०३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य सध्या मुख्य परीक्षा केंद्राच्या ताब्यात आहे. मात्र, सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत हे साहित्य वाटल्यानंतर ते सांभाळण्याची मुख्याध्यापकांवरील जबाबदारी वाढणार आहे.

-------

पुणे विभागातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या

दहावीतील विद्यार्थी - २ लाख ७१ हजार ५०३

मुले -१,५०,६९०

मुली-१,२०,७९७

बारावीतील विद्यार्थी - २ लाख ३० हजार ९८३

मुले -१,२६,६०६

मुली-१,०४,३३७

---

ताब्यातील साहित्य :

कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट, स्टीकर, सिटिंग प्लॅन, ए बी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य आदी मुख्य परीक्षा केंद्रावर कस्टडीत आहे.

---

परीक्षा व पुढील प्रवेश कधी?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा कधी घोषित केल्या जाणार आणि परीक्षा केव्हा होणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे या परीक्षांचा निकाल जाहीर करून पुढील प्रवेश प्रक्रिया केव्हा राबवणार असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

--

मुख्य परीक्षा केंद्रांना बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिका व दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे साहित्य राज्य मंडळाकडून मिळाले आहे. परीक्षा कालावधीत एक ते दोन महिने हे साहित्य सांभाळावेच लागते. त्याचा कुठलाही त्रास नाही. सध्या उपकेंद्रांना हे साहित्य वितरित झालेले नाही.

- हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा

---

कोऱ्या उत्तरपत्रिका व प्रात्यक्षिक परीक्षांचे साहित्य सांभाळण्याचा मुख्याध्यापकांना कोणताही त्रास होत नाही. केवळ शैक्षणिक साहित्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शिल्लक राहिले तर पुढील वर्षी सुद्धा त्याचा वापर करता येतो. मात्र, त्याची नीटपणे नोंद ठेवावी लागते.

- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ

--

मुख्य परीक्षा केंद्रांना शैक्षणिक साहित्य सांभाळण्यासाठी कस्टडी तयार करावी लागते. प्रश्नपत्रिका सुरक्षित राहाव्यात यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करावा लागतो. सध्या मुख्य परीक्षा केंद्रांवरून सर्व शाळांपर्यंत हे शैक्षणिक साहित्य उपलब्ध झालेले नाही. परंतु, ते वितरीत होईल. त्यावेळी मुख्याध्यापकांचा ताप वाढणार आहे.

- अविनाश ताकवले, प्राचार्य, पूना नाईट हायस्कूल