शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त : पुनर्वसनाच्या कारवाईला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 01:03 IST

भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खेड व दौड तालुक्याच्या लाभक्षेत्रात जमिनी शिल्लक नाही.

खेड : भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खेड व दौड तालुक्याच्या लाभक्षेत्रात जमिनी शिल्लक नाही. अशा पार्श्वभूमीवर इतर लाभक्षेत्रातील जमिनी मिळवणे तसेच नुकसानभरपाई कशी असावी, यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. आधी पुनर्वसन मग धरण, असे आश्वासन देऊनही ३५ वर्षांनंतर का होईना पुनर्वसनाच्या कार्यवाहीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि खेडचे प्रांताधिकारी आयुषप्रसाद यांच्या वेगवान कारभारानेभामा आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती आली. ४०३ पूर्णत: बाधित आणि पात्र लाभार्थ्यांच्या नावाने सातबारा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार ३५ हेक्टर खेड व ६६ हेक्टर दौंड तालुक्यात धरणग्रस्तांना देण्यात आली. त्यातील काही सातबारा वाटप आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. धरणग्रस्तांच्या दृष्टीने ही पहिली सुखनैव बाब होती.याबाबत सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, की तीनशे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यांना लाभक्षेत्रात देण्यासाठी जमीन उपलब्ध नाही. तसेच काहींची मागणी जमिनीऐवजी नुकसानभरपाई मिळण्याची आहे. या दोन्ही मुद्यांच्या अनुषंगाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. इतर लाभक्षेत्रात पुनर्वसनासाठी जमीन मिळावी या मागणीसह नुकसानभरपाई कशी असावी, याची मार्गदर्शन या प्रस्तावाद्वारे मागवण्यात आले असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.संकलन दुरुस्तीनंतर शासनाच्या लेखी किती धरणग्रस्तांचेपुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे चित्र स्पष्ट झाले. अर्थात शासनाच्या लेखी अपात्र असणाऱ्या काही धरणग्रस्तांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.६८ जणांना सातबारा वाटप झाले असले तरी मोठे काम अजून बाकी आहे. त्यातच वाटपास जमीन शिल्लक नसणे व जमिनीऐवजी आर्थिक पॅकेजचा विषय पुढे येणे या दोन मुद्यांवर पुनर्वसन जमीन दुसºया लाभक्षेत्रात द्यावी व पॅकेज कसे असावे याबाबतचाप्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. सरकारी पातळीवरून त्वरित निर्णय घेतला गेल्यास एकदाची सुरू झालेली पुनर्वसन प्रक्रिया पुढेजाऊ शकते.इतर लाभक्षेत्रात जमीन पुनर्वसनासाठी मिळावी आणि नव्याने करण्यात आलेल्या आर्थिक पॅकेजबाबत मार्गदर्शक तत्त्वे असावीत, यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ६८ धरणग्रस्तांना सातबारा वाटप नुकतेच करण्यात आले. हा विषय त्वरित तडीस नेण्याचा प्रयत्न आहे.- आयुष प्रसाद,सहायक जिल्हाधिकारीवांगमराठवाडी आणि कावडी प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मोबदला देऊन पुनर्वसन करण्यात आले आहे. पुनर्वसनाच्या जमिनीचा ताबा अथवा उत्तर अडचणी असतील तर भामा-आसखेड धरणग्रस्तांना विश्वासात घेऊन आर्थिक पॅकेजचा पर्याय खुला ठेवण्यात यावा. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भूखंड, व्यावसायिक संधीचा सरकारने पुनर्वसनासाठी विचार करावा.- रोहिदास गडदे,बाधित शेतकरी

टॅग्स :Puneपुणे