शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त : पुनर्वसनाच्या कारवाईला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 01:03 IST

भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खेड व दौड तालुक्याच्या लाभक्षेत्रात जमिनी शिल्लक नाही.

खेड : भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खेड व दौड तालुक्याच्या लाभक्षेत्रात जमिनी शिल्लक नाही. अशा पार्श्वभूमीवर इतर लाभक्षेत्रातील जमिनी मिळवणे तसेच नुकसानभरपाई कशी असावी, यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. आधी पुनर्वसन मग धरण, असे आश्वासन देऊनही ३५ वर्षांनंतर का होईना पुनर्वसनाच्या कार्यवाहीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि खेडचे प्रांताधिकारी आयुषप्रसाद यांच्या वेगवान कारभारानेभामा आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती आली. ४०३ पूर्णत: बाधित आणि पात्र लाभार्थ्यांच्या नावाने सातबारा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार ३५ हेक्टर खेड व ६६ हेक्टर दौंड तालुक्यात धरणग्रस्तांना देण्यात आली. त्यातील काही सातबारा वाटप आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. धरणग्रस्तांच्या दृष्टीने ही पहिली सुखनैव बाब होती.याबाबत सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, की तीनशे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यांना लाभक्षेत्रात देण्यासाठी जमीन उपलब्ध नाही. तसेच काहींची मागणी जमिनीऐवजी नुकसानभरपाई मिळण्याची आहे. या दोन्ही मुद्यांच्या अनुषंगाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. इतर लाभक्षेत्रात पुनर्वसनासाठी जमीन मिळावी या मागणीसह नुकसानभरपाई कशी असावी, याची मार्गदर्शन या प्रस्तावाद्वारे मागवण्यात आले असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.संकलन दुरुस्तीनंतर शासनाच्या लेखी किती धरणग्रस्तांचेपुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे चित्र स्पष्ट झाले. अर्थात शासनाच्या लेखी अपात्र असणाऱ्या काही धरणग्रस्तांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.६८ जणांना सातबारा वाटप झाले असले तरी मोठे काम अजून बाकी आहे. त्यातच वाटपास जमीन शिल्लक नसणे व जमिनीऐवजी आर्थिक पॅकेजचा विषय पुढे येणे या दोन मुद्यांवर पुनर्वसन जमीन दुसºया लाभक्षेत्रात द्यावी व पॅकेज कसे असावे याबाबतचाप्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. सरकारी पातळीवरून त्वरित निर्णय घेतला गेल्यास एकदाची सुरू झालेली पुनर्वसन प्रक्रिया पुढेजाऊ शकते.इतर लाभक्षेत्रात जमीन पुनर्वसनासाठी मिळावी आणि नव्याने करण्यात आलेल्या आर्थिक पॅकेजबाबत मार्गदर्शक तत्त्वे असावीत, यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ६८ धरणग्रस्तांना सातबारा वाटप नुकतेच करण्यात आले. हा विषय त्वरित तडीस नेण्याचा प्रयत्न आहे.- आयुष प्रसाद,सहायक जिल्हाधिकारीवांगमराठवाडी आणि कावडी प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मोबदला देऊन पुनर्वसन करण्यात आले आहे. पुनर्वसनाच्या जमिनीचा ताबा अथवा उत्तर अडचणी असतील तर भामा-आसखेड धरणग्रस्तांना विश्वासात घेऊन आर्थिक पॅकेजचा पर्याय खुला ठेवण्यात यावा. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भूखंड, व्यावसायिक संधीचा सरकारने पुनर्वसनासाठी विचार करावा.- रोहिदास गडदे,बाधित शेतकरी

टॅग्स :Puneपुणे