शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Pune | द्राक्षाच्या भावात १० वर्षातील सर्वात मोठी घसरण, उत्पादक शेतकरी अडचणीत

By अजित घस्ते | Updated: April 22, 2023 17:59 IST

३० ते ४० टक्के राज्यातील द्राक्षे उत्पादक शेकऱ्यांचे यंदा नुकसान...

पुणे : राज्यात गारपीठ व अवकाळी पावसाचा द्राक्षाला मोठा फटका बसला आहे. नाशिक, नगर भागात अद्याप २५ ते ३० हजार टन माल जागेवरच आहे. शेतात उभे असलेले पीक जाण्याच्या मार्गांवर असताना अवकाळी पाऊस फटका बसल्याने अनेक द्राक्षे बागाचे मोठे नुकसान झाले. मालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात द्राक्षे पाठवत आहेत. मात्र बाजारात द्राक्षाला उठाव नसल्याने दरही मिळत नाही. परिणामी द्राक्षे बागायतदारांचा खर्चही निघत नसल्याने यंदा शेतकरी हतबल झाले असल्याने पुढील वर्षी द्राक्षेचे पीक घ्यायचे की नाही, हा प्रश्न द्राक्षे बागायतदारांना पडत आहे.

लॉकडॉऊन काळातही द्राक्षांना ३५ ते ४० रूपये किलोला भाव मिळत होता. मात्र सध्या घाऊक बाजारात १५ ते ३० रूपये पर्यत द्राक्षेला भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च ही निघत नसल्याने यंदा शेतकरी अडचणीत आहे. दरवर्षी १५ डिसेंबर पासून द्राक्षाचा हंगाम सुरू होतो. एप्रिलपर्यंत चालत असतो. यंदा मे अखेरपर्यंत हंगाम सुरू राहिल. फळेही उशीरा लागल्याने द्राक्षाचा हंगाम महिनाभराने पुढे सरकला आहे. पावसाळी वातावरण कायम राहिल्यास द्राक्षाच्या भावात आणखी घट होण्याची शक्यता असल्याचे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

बाजारातील १५ किलो द्राक्षाचे भावद्राक्ष         भाव

सोनाका            ४०० ते ४५०सुपर सोनाका       ४०० ते ५००

तास गणेश         ३०० ते ३५०माणिक चमण       ३५० ते ४००

का झाले दर कमी

- अवकाळी पावसाचा द्राक्षाला मोठा फटका

- वारंवार पावसामुळे यंदा द्राक्षांच्या पिकाची गोडी कमी झाल्याने परदेशात मागणी घटली.

- परदेशात मागणी कमी झाल्याने बागेत द्राक्षे शिल्लक

- अद्यापही पावसाचे सावट कायम

- बाजारात मागणी कमी आणि आवक अधिक

- बाजारात सर्व मालाची विक्री त्या प्रमाणात होत नाही.

राज्यातील काही पट्टयात द्राक्षाला चांगला भाव मिळाला असला तर काही भागात बरेच शेतक-यांचे ३० ते ४० टक्के नुकसान झाले आहे. एकरी ५ लाख खर्च होतो. एक किलो  २० ते २२ रूपये खर्च करावा लागतो. मात्र यंदा मालाची विक्रीच घाऊकमध्ये १५ ते २० रूपये होत असल्याने शेतक-यांना खर्चही निघत नाही. ज्या शेतक-यांचे ४० टन पेक्षा माल गेला आहे. त्याना किमान उत्पादन खर्च निघाला आहे. मात्र त्यांचे १० टनाच्या आत उत्पादन निघाले आहे. अशा बागायदारांना उत्पादन खर्च हि निघाला नाही. त्यामुळे शेतकरी यंदा संकटात सापडला आहे.

- शिवाजी पवार , अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्षे बागायतदार संघ

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड