शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

Pune | द्राक्षाच्या भावात १० वर्षातील सर्वात मोठी घसरण, उत्पादक शेतकरी अडचणीत

By अजित घस्ते | Updated: April 22, 2023 17:59 IST

३० ते ४० टक्के राज्यातील द्राक्षे उत्पादक शेकऱ्यांचे यंदा नुकसान...

पुणे : राज्यात गारपीठ व अवकाळी पावसाचा द्राक्षाला मोठा फटका बसला आहे. नाशिक, नगर भागात अद्याप २५ ते ३० हजार टन माल जागेवरच आहे. शेतात उभे असलेले पीक जाण्याच्या मार्गांवर असताना अवकाळी पाऊस फटका बसल्याने अनेक द्राक्षे बागाचे मोठे नुकसान झाले. मालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात द्राक्षे पाठवत आहेत. मात्र बाजारात द्राक्षाला उठाव नसल्याने दरही मिळत नाही. परिणामी द्राक्षे बागायतदारांचा खर्चही निघत नसल्याने यंदा शेतकरी हतबल झाले असल्याने पुढील वर्षी द्राक्षेचे पीक घ्यायचे की नाही, हा प्रश्न द्राक्षे बागायतदारांना पडत आहे.

लॉकडॉऊन काळातही द्राक्षांना ३५ ते ४० रूपये किलोला भाव मिळत होता. मात्र सध्या घाऊक बाजारात १५ ते ३० रूपये पर्यत द्राक्षेला भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च ही निघत नसल्याने यंदा शेतकरी अडचणीत आहे. दरवर्षी १५ डिसेंबर पासून द्राक्षाचा हंगाम सुरू होतो. एप्रिलपर्यंत चालत असतो. यंदा मे अखेरपर्यंत हंगाम सुरू राहिल. फळेही उशीरा लागल्याने द्राक्षाचा हंगाम महिनाभराने पुढे सरकला आहे. पावसाळी वातावरण कायम राहिल्यास द्राक्षाच्या भावात आणखी घट होण्याची शक्यता असल्याचे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

बाजारातील १५ किलो द्राक्षाचे भावद्राक्ष         भाव

सोनाका            ४०० ते ४५०सुपर सोनाका       ४०० ते ५००

तास गणेश         ३०० ते ३५०माणिक चमण       ३५० ते ४००

का झाले दर कमी

- अवकाळी पावसाचा द्राक्षाला मोठा फटका

- वारंवार पावसामुळे यंदा द्राक्षांच्या पिकाची गोडी कमी झाल्याने परदेशात मागणी घटली.

- परदेशात मागणी कमी झाल्याने बागेत द्राक्षे शिल्लक

- अद्यापही पावसाचे सावट कायम

- बाजारात मागणी कमी आणि आवक अधिक

- बाजारात सर्व मालाची विक्री त्या प्रमाणात होत नाही.

राज्यातील काही पट्टयात द्राक्षाला चांगला भाव मिळाला असला तर काही भागात बरेच शेतक-यांचे ३० ते ४० टक्के नुकसान झाले आहे. एकरी ५ लाख खर्च होतो. एक किलो  २० ते २२ रूपये खर्च करावा लागतो. मात्र यंदा मालाची विक्रीच घाऊकमध्ये १५ ते २० रूपये होत असल्याने शेतक-यांना खर्चही निघत नाही. ज्या शेतक-यांचे ४० टन पेक्षा माल गेला आहे. त्याना किमान उत्पादन खर्च निघाला आहे. मात्र त्यांचे १० टनाच्या आत उत्पादन निघाले आहे. अशा बागायदारांना उत्पादन खर्च हि निघाला नाही. त्यामुळे शेतकरी यंदा संकटात सापडला आहे.

- शिवाजी पवार , अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्षे बागायतदार संघ

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड