शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Pune | द्राक्षाच्या भावात १० वर्षातील सर्वात मोठी घसरण, उत्पादक शेतकरी अडचणीत

By अजित घस्ते | Updated: April 22, 2023 17:59 IST

३० ते ४० टक्के राज्यातील द्राक्षे उत्पादक शेकऱ्यांचे यंदा नुकसान...

पुणे : राज्यात गारपीठ व अवकाळी पावसाचा द्राक्षाला मोठा फटका बसला आहे. नाशिक, नगर भागात अद्याप २५ ते ३० हजार टन माल जागेवरच आहे. शेतात उभे असलेले पीक जाण्याच्या मार्गांवर असताना अवकाळी पाऊस फटका बसल्याने अनेक द्राक्षे बागाचे मोठे नुकसान झाले. मालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात द्राक्षे पाठवत आहेत. मात्र बाजारात द्राक्षाला उठाव नसल्याने दरही मिळत नाही. परिणामी द्राक्षे बागायतदारांचा खर्चही निघत नसल्याने यंदा शेतकरी हतबल झाले असल्याने पुढील वर्षी द्राक्षेचे पीक घ्यायचे की नाही, हा प्रश्न द्राक्षे बागायतदारांना पडत आहे.

लॉकडॉऊन काळातही द्राक्षांना ३५ ते ४० रूपये किलोला भाव मिळत होता. मात्र सध्या घाऊक बाजारात १५ ते ३० रूपये पर्यत द्राक्षेला भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च ही निघत नसल्याने यंदा शेतकरी अडचणीत आहे. दरवर्षी १५ डिसेंबर पासून द्राक्षाचा हंगाम सुरू होतो. एप्रिलपर्यंत चालत असतो. यंदा मे अखेरपर्यंत हंगाम सुरू राहिल. फळेही उशीरा लागल्याने द्राक्षाचा हंगाम महिनाभराने पुढे सरकला आहे. पावसाळी वातावरण कायम राहिल्यास द्राक्षाच्या भावात आणखी घट होण्याची शक्यता असल्याचे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

बाजारातील १५ किलो द्राक्षाचे भावद्राक्ष         भाव

सोनाका            ४०० ते ४५०सुपर सोनाका       ४०० ते ५००

तास गणेश         ३०० ते ३५०माणिक चमण       ३५० ते ४००

का झाले दर कमी

- अवकाळी पावसाचा द्राक्षाला मोठा फटका

- वारंवार पावसामुळे यंदा द्राक्षांच्या पिकाची गोडी कमी झाल्याने परदेशात मागणी घटली.

- परदेशात मागणी कमी झाल्याने बागेत द्राक्षे शिल्लक

- अद्यापही पावसाचे सावट कायम

- बाजारात मागणी कमी आणि आवक अधिक

- बाजारात सर्व मालाची विक्री त्या प्रमाणात होत नाही.

राज्यातील काही पट्टयात द्राक्षाला चांगला भाव मिळाला असला तर काही भागात बरेच शेतक-यांचे ३० ते ४० टक्के नुकसान झाले आहे. एकरी ५ लाख खर्च होतो. एक किलो  २० ते २२ रूपये खर्च करावा लागतो. मात्र यंदा मालाची विक्रीच घाऊकमध्ये १५ ते २० रूपये होत असल्याने शेतक-यांना खर्चही निघत नाही. ज्या शेतक-यांचे ४० टन पेक्षा माल गेला आहे. त्याना किमान उत्पादन खर्च निघाला आहे. मात्र त्यांचे १० टनाच्या आत उत्पादन निघाले आहे. अशा बागायदारांना उत्पादन खर्च हि निघाला नाही. त्यामुळे शेतकरी यंदा संकटात सापडला आहे.

- शिवाजी पवार , अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्षे बागायतदार संघ

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड