शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पायवाटांवर वर्दळ मोठी; पण टेकड्यांवरचा एकांत धोक्याचाच..!

By admin | Updated: February 27, 2016 04:39 IST

वेताळ टेकडीचा विस्तीर्ण परिसर, दाट झुडपे, बंद पडलेली खाण, एकांतात बसलेली जोडपी, एकट्या फिरणाऱ्या तरुणी... सूर्य मावळतीला चाललेला... अंधार पडत चालल्याने लोकांची

पुणे : वेताळ टेकडीचा विस्तीर्ण परिसर, दाट झुडपे, बंद पडलेली खाण, एकांतात बसलेली जोडपी, एकट्या फिरणाऱ्या तरुणी... सूर्य मावळतीला चाललेला... अंधार पडत चालल्याने लोकांची वर्दळही कमी होते... पण याची फिकीर कुणाला? अशा स्थितीतही एकट्या तरुणी, जोडपी स्वत:च्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून आपल्याच नादात असल्याचे दृश्य वेताळ टेकडीवर पाहायला मिळाले.व्यायाम किंवा फिरायला टेकड्यांवर जाणाऱ्या पुणेकरांच्या यादीत वेताळ टेकडी हेही आवडीचे ठिकाण. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण या टेकडीवर फिरण्याचा, व्यायामाचा आनंद घेतात. शुक्रवारीही या टेकडीवर गेल्यानंतर हेच दृश्य पाहायला मिळाले. प्रत्येक जण टेकडीवरील पायवाटांवरून फिरत होता. ज्येष्ठ नागरिक व तरुणाचे प्रमाण जास्त दिसते. काही जोडपी आणि एकट्या महिला व तरुणीही दिसून आल्या. वेताळ टेकडीवर सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्यांची मोठी वर्दळ असली, तरी या टेकडीवर असलेली दाट झुडपे आणि बंद पडलेल्या खाणीमुळे एकांत धोक्याचा ठरू शकतो. टेकडीचा विस्तीर्ण परिसर मोठा असून झाडाझुडपांचे प्रमाणही जास्त आहे. अंधार पडल्यानंतर काही जोडपी व एकट्या मुली बिनधास्तपणे टेकडीवरील निर्जन ठिकाणी फिरताना आढळून आली.टेकडीचा परिसर मोठा असून अनेक पायवाटा आहेत. या रस्त्यानेही महिला-तरुणी एकट्या बिनधास्तपणे फिरताना दिसल्या. टेकडीवर असलेल्या बंद खाणीलगत तरुण-तरुणींचे घोळके, जोडपी दिसून आली. अंधार वाढत गेल्यानंतरही काही जोडपी खाणीच्या दिशेने जात होती. एकट्या मुलीही मोबाइलवर गाणी ऐकत फिरत होत्या. परिसरातील दाट झुडपांमुळे हा एकांत धोक्याचा ठरू शकतो, याचे भानही त्यांना नव्हते. पायवाटांच्या बाजूला ठिकठिकाणी सिमेंटच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. टेकडीवर येताना आणलेला कचरा लोक या टाक्यांमध्ये टाकतात. यांतील काही टाक्यांमध्ये मद्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे ग्लास, पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या प्लेट आढळून आल्या. त्यामुळे या टेकड्यांवर मद्यपींचा वावर किंवा ओल्या पार्ट्याही रंगत असतील, अशी शक्यता आहे. वन विभाग व पुणे महापालिकेमार्फत नागरी वनव्यवस्थापन समितीमार्फत टेकडीवर व्यवस्थापन केले जाते. पण, सिमेंटच्या टाक्यांमधील मद्याच्या बाटल्या पाहून या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. टेकडीचा विस्तीर्ण परिसर पाहता, सुरक्षा पुरविणे शक्य नसल्याने प्रत्येकाने आपल्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे.(टीम लोकमत : राहुल कलाल, हिना कौसर खान-पिंजार, राजानंद मोरे, लक्ष्मण मोरे, सायली जोशी-पटवर्धन, अनिरुद्ध करमरकर, दत्तप्रसाद शिंदे.)