शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

सीमावादातील गावांसाठी दोन दिवसांत मोठी घोषणा- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 10:07 IST

महाराष्ट्र सरकारकडून कायद्याच्या चौकटीत राहून लवकरच सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले...

पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद १९६५ पासून सुरू आहे. महाराष्ट्राकडून ८६५ गावांबाबत मागणी केली जाते, तेव्हा कर्नाटककडून प्रत्युत्तर दिले जाते. त्यामुळे या गावांबाबत येत्या दोन दिवसांत मोठी घोषणा करणार आहे, असा गौप्यस्फोट उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केला. महाराष्ट्र सरकारकडून कायद्याच्या चौकटीत राहून लवकरच सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

या सीमा वादाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील यांच्यासह शंभुराज देसाई यांना पुढाकार घेण्यासाठी नियुक्त केले आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केल्यानंतर गदारोळ माजला. त्यानंतरही महाराष्ट्रातील कन्नड भाषिक सोलापूर आणि अक्कलकोट हे भाग कर्नाटकात यायला हवेत, अशी मागणीही त्यांनी केली. त्यामुळे राज्यातील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी पुण्यात बोलताना पाटील म्हणाले, ‘भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर बेळगाव, निपाणी, कारवारसह ८६५ मराठी भाषिक गावांतील मराठी नागरिकांवर अन्याय होत आहे. त्यावर महाराष्ट्र सरकारकडून फुंकर घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या गावांतील मराठी भाषिक, विशेषत: युवक-युवतींसाठी कायद्याच्या चौकटीत राहून खास सोयीसुविधा, सवलती देता येतील. याबाबत लवकरच घोषणा केली जाईल.”

सांगलीच्या पूर्व भागातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्याला टेंभू-ताकारी-म्हैसाळ पाणीपुरवठा योजनेतून पाणी दिले जात आहे. याच योजनेतून सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी तालुक्यातील गावांना पाणी पोचविण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.