शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

भीमाकाठ दुतर्फा होणार हिरवागार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:51 IST

नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत भीमा नदीपात्राच्या दुतर्फा पाचशे मीटरपर्यंत तब्बल ४ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग विकसित करण्यात येणार असून, नजीकच्या काळात हा हरित पट्टा दहा

पुणे : नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत भीमा नदीपात्राच्या दुतर्फा पाचशे मीटरपर्यंत तब्बल ४ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग विकसित करण्यात येणार असून, नजीकच्या काळात हा हरित पट्टा दहा किलोमीटरपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती नमामि चंद्रभागा प्राधिकरणाचे सचिव तथा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत दळवी यांनी ही माहिती दिली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सौरभ राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूरचे (निरीचे) प्रमुख संशोधक एन. एन. राव या वेळी उपस्थित होते.भीमा नदीचा उगम असलेल्या भीमाशंकरपासून ते राज्याच्या सीमेपर्यंत हरित पट्टा विकसित करण्याचा मानस आहे. याशिवाय या नदीसह तिच्या उपनद्या व मोठ्या नाल्यांवरील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येतील.पहिल्या टप्प्यात भीमानदीकाठी दुतर्फा पाचशे मीटर क्षेत्रावर फळबागांची लागवड करण्यात येणार आहे. ही फळबाग लागवड सुमारे ४ हजार हेक्टरवर असेल. या माध्यमातून दहा किलोमीटर लांबीचे एकाच फळझाडांचा पट्टा विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यावरण विभागाकडून १६.८० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच, चंद्रभागा नदी संवर्धन अभियानदेखील राबविण्यात येणार आहे. त्यानुसार चंद्रभागा नदी २०२२ पर्यंत प्रदूषणमुक्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.- चंद्रकांत दळवी, आयुक्त