शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

‘भीमा-पाटस’ला ६० टक्के मतदान

By admin | Updated: May 21, 2015 23:05 IST

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निरुत्साही वातावरणात सरासरी ६० टक्के मतदान झाले

दौंड : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निरुत्साही वातावरणात सरासरी ६० टक्के मतदान झाले असून खामगाव येथील प्रकार वगळता मतदान शांततेत झाले़ शनिवार (दि.२३) रोजी सकाळी सोनवडी (ता. दौंड) येथील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. भीमा पाटसची निवडणूक आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा पॅनल तर माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली भीमा बचाव सहकार पॅनल यांच्यात झाली. आमदार राहुल कुल यांनी राहू केंद्रावर तर माजी आमदार रमेश थोरात यांनी खुटबाव केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान निरुत्साही वातावरणात मतदान झाल्याने ठिकठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांचा अभाव दिसून येत होता. तर मतदान केंद्रेही ओस पडलेली होती. मतदारांपेक्षा अधिकारी, पोलीस कर्मचारी यांचीच वर्दळ अनेक मतदान केंद्रावर अधिक होती. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. साधारणत: ९ वाजेपर्यंत तुरळक पद्धतीने मतदान झाले. परंतु ११ ते दुपारी ३ पर्यंत बऱ्यापैकी मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. वाढते उन्ह आणि मतदारांची उदासिनता हे दोन प्रमुख कारणे मतदान केंद्रावरील शुकशुकाटीची असल्याचे मतदान केंद्र परिसरात बोलले जात होते. साधारणत: सायंकाळी चार नंतर मतदारांचा ओघ बऱ्यापैकी वाढल्याने मतांच्या टक्केवारीत वाढ होण्यास मदत झाली असल्याची वस्तुस्थिती आहे. मतदार केंद्राच्या परिसरात शांतता असल्याने अधिकारी, कर्मचारी आणि पोलीसांना फक्त जांबळ््या देण्याचे काम उरले होते. कारण चार ते पाच मतदार आल्यानंतर १५ ते २0 मिनिट मतदार फिरकत नव्हता अशा मंदगतीने मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही पॅनलचे कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रावर येण्यासाठी घरोघरी जाऊन विनवणी करीत होते. मात्र मतदारांनी सोयीनुसार मतदान केंद्रावर येण्याचे पसंत केले. घटलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा कोणाला? मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीचा फायदा आमदार राहुल कुल यांच्या जनसेवा पॅनलला की विरोधी माजी आमदार रमेश थोरात यांच्या भीमा बचाव सहकार पॅनलला, याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. यामुळे आता शनिवारी (दि. २३) होणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.४भीमा -पाटस सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी दौंड राजेगाव गटात पारवडी मतदान केंद्रावर ८० टक्के मतदान झाले. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रथमच बारामती तालुक्यातील पारवडी येथे मतदान केंद्र उभारण्यात आले होते. पारवडी ,शिर्सुफळ,सिध्देश्वर निंबोडी आदी गावांचा यामध्ये समावेश आहे.