शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

भीमा स्वच्छ, सुंदर करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 03:00 IST

भीमा नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी राज, समाज व प्रशासन हे तिघे एकत्र आले पाहिजेत, भीमा स्वच्छ झाली तर जंगल, लोक, धरती, प्रदेश व देशाचे भले होईल. यासाठी भीमाशंकरमधील झाडांची रक्षा करण्याचा संकल्प आपण रक्षाबंधनाच्या दिवशी करू, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी भीमाशंकर येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभीमाशंकर : भीमा नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी राज, समाज व प्रशासन हे तिघे एकत्र आले पाहिजेत, भीमा स्वच्छ झाली तर जंगल, लोक, धरती, प्रदेश व देशाचे भले होईल. यासाठी भीमाशंकरमधील झाडांची रक्षा करण्याचा संकल्प आपण रक्षाबंधनाच्या दिवशी करू, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी भीमाशंकर येथे केले.भीमा नदीचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथून नमामी चंद्रभागा यात्रेला डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते सुरुवात झाली. नदी ही राष्टीय संपत्ती असून तिच्या प्रदूषणामुळे दुष्काळ व पूर या घटना घडू लागल्या आहेत. पूर व दुष्काळमुक्त आणि समृद्ध भारत करण्यासाठी सामान्य माणसांना, विशेषत: पुढच्या पिढीला नदीशी जोडण्याच्या अनुषंगाने जल बिरादरीने काश्मीर ते कन्याकुमारी या कार्यक्षेत्रात १०१ ठिकाणी नदी संवाद जल साक्षरता यात्रा आयोजित केली होती.या वेळी जलतज्ज्ञ अनिल पाटील, पंचायत समिती सदस्य अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, सरपंच दीपक चिमटे, ग्राम परिस्थितिकी विकास समितीचे अध्यक्ष मारुती लोहकरे, सहायक उपवनसंरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे, तहलीसदार सुनील जोशी आदी उपस्थित होते. या वेळी ‘नमामी चंद्रभागा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.नमामी चंद्रभागा मोहिमेत भीमेच्या कडेला राहणाºया लोकांनी ही नदी स्वच्छ करण्याचे ठरविले पाहिजे. जमिनी, डोंगरांना हिरवेगार बनविण्यासाठी नदीची पवित्रता टिकली पाहिजे, यासाठी सर्वांनी संकल्प करा. प्रथम भीमा नदीचा उगम असलेले भीमाशंकर गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा निश्चय या वेळी करा, असे आवाहन त्यांनी केले.१०१ यात्रांचे समायोजनभीमा नदीचा संगम असलेल्या विजापूर येथे देशभरातून निघालेल्या १०१ यात्रांचे समायोजन होणार आहे.या यात्रेत चंद्रभागा म्हणजेच भीमा नदीचे पाणी समाविष्ट होणार असून, या नमामी चंद्रभागा यात्रेची सुरुवात आज (दि. ७) भीमाशंकर येथून झाली. ही यात्रा भीमेच्या उगमापासून संगमापर्यंत जाणार आहे.पुढच्या पिढीला सुखी करण्यासाठी ही जंगले, जंगलातील प्राणी वाचणे जरुरीचे आहे. जंगल पाण्याचे वडील आहेत; तर जमीन, नद्या ही पाण्याची आई आहे. पाणी नसेल तर आपण राहणार नाही. त्यासाठी पाण्याच्या आई-वडिलांना जपले पाहिजे. भीमाशंकरची हिरवी गर्मी ही निळ्या गर्मीला खेचून घेते व त्यातून पाऊस पडतो. जर, येथील जंगल राहिले नाही, तर पाउस पडणार नाही व पाऊस पडला नाही, तर नदी वाहणार नाही व शेतीला पाणी मिळणार नाही.- डॉ. राजेंद्रसिंह,जलतज्ज्ञ