शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भाटघर, नीरा-देवघर धरणे नियोजनाअभावी रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 03:23 IST

टंचाईच्या झळा वाढणार : गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्के पाणीसाठा कमी

भोर : या वर्षी नीरा-देवघर व भाटघर ही धरणे १०० टक्के भरली होती. मात्र, मागील ४ महिन्यांपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे भाटघर धरणात ४२ टक्के, तर नीरा-देवघर धरणात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील ३० टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. अद्याप उन्हाळ्याला ३ महिने शिल्लक आहेत. तोपर्यंत पाण्याचा विसर्ग असाच कायम राहिल्यास दोन्ही धरणांतील पाणीसाठा कमी होऊन धरण परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल.

आक्टोबर महिन्यात पाऊस थांबला आणि लगेच नोव्हेंबर महिन्यापासून भाटघर धरणातून मागील दोन महिने १,८०० क्युसेक्सने पाण्याचा विर्सग सुरू आहे. धरणात सध्या ४२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी धरणात ७० टक्के पाणीसाठा होता. नीरा-देवघर धरणात या घडीला ३६ टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी ५३ टक्के होता. मागील वर्षीच्या तुलनेत दोन्ही धरणांत ३० टक्के पाणीसाठा कमी आहे. सध्या दोन्ही धरणांतील पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. भोर तालुक्यातील कालवे अपूर्ण असून त्यातून मोठ्या प्रमाणात गळगी होत आहे. त्यामुळे दोन्ही धरणांतील पाणी नदीतून खाली जाते. भोरच्या पाण्यावर खालील भागातील बागायती शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जातो. मात्र, दर वर्षी भाटघर धरणातील २४ टीएमसी नीरा-देवघर धरणातील १२ व चापेट गुंजवणी धरणातील ४ असे एकूण ३८ टीएमसी पाणी दर पावसाळयात साठवले जाते. उन्हाळा आली, की धरणेरिकामी होतात. यामुळे येथील स्थानिकांना मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.

भाटघर धरण ब्रिटिशकाळात बांधले गेले. त्यामुळे धरणाला तालुक्यासाठी कालवे नसतील. मात्र, नीरा-देवघर धरण होऊन १५ वर्षे झाली; पण अद्याप नीरा-देवघर धरणाचा उजवा कालवा अपूर्ण, तर डावा कालवा कागदावरच राहिला आहे. त्यामुळे नीरा नदीतून सोयीस्करपणे पाणी खाली जात असून येथील स्थानिकांना पाण्याकडे बघण्याशिवाय कोणताच पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे उद्योग-व्यवसाय नसलेल्या तरुणांचे बागायती शेती करून उदरनिर्वाह करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते की काय, अशीच अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे अनेक तरुण शिक्षण अर्धवट सोडून पुण्या-मुंबईला जाऊन हॉटेलात, हमाली, दुकानात मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह भागवतात.

धरण उशाला, कोरड घशालाभोर तालुक्यातील दोन्ही धरणे पावसाळ्यात १०० टक्के भरतात. उन्हाळ्यात ही धरणे तळ गाठतात. त्यामुळे दर वर्षी उन्हाळ्यात स्थानिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यामुळे येथील लोकांची अवस्था ‘धरण उशाला आणी कोरड घशाला’ अशी झाली आहे. या दोन्ही धरणांच्या पाण्यावर तयार होणारी वीजही स्थानिकांना मिळत नाही.भामा-आसखेड धरणसाठा निम्म्यावरआसखेड : यंदा परतीच्या पावसाने दडी मारल्यामुळे धरण लाभ क्षेत्रातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी दोन महिने आधीच भामा आसखेड धरणातून पाणी सोडावे लागले. त्यामुळे यावर्षी धरणसाठ्यात गेल्यावर्षीच्या गतवर्षीच्या तुलनेत २१ टक्के पाणी कमी झाले ५७.५७ टक्के पाणीसाठा राहिला असल्याची माहिती धरण प्रशासनाचे भारत बेंद्रे यांनी दिली.गेल्यावर्षी फेब्रुवारी अखेर धरणात ७८.६५ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी ५७.५७ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातील पाणीकमी होत असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांची व गावांची पाण्यासाठी पायपीट होणार आहे. भामाआसखेड धरण खेड, शिरूर, दौंड तालुक्याच्या नागरिकांना तसेच चाकण औद्योगिक वसाहतीसाठी वरदान ठरले आहे. परंतु, यंदाचा वाढता उन्हाळा व कमी पाऊस यामुळे यंदाच्या उन्हाळ्याच्या झळा व पाणीटंचाई असे दुहेरी संकट तीनही तालुक्याला सहन करावे लागणार आहे. गतवर्षी धरण क्षेत्रात झालेल्या १ हजार २९२ मिलीमिटर पावसामुळे फेब्रुवारी अखेर ७८.६५ टक्के पाणीसाठा धरणात होता तर यंदा फक्त ७७५ मिलिमिटर पावसानंतर आजअखेर ५७.५७ टक्केच पाणीसाठा धरणात आहे. त्यात बाष्पीभवनाचाही परिणाम पाणीसाठ्यावर होणार आहे.गतवर्षी एकूण पाणीसाठा १८४.२८८ दलघमी पैकी उपयुक्तसाठा १७०.७६६ दलघमी आहे तर यंदा एकूण पाणीसाठा १३८.५२ दलघमी व उपयुक्त साठा फक्त १२४.९९४ दलघमी इतका आहे.