शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भांडारकर संस्थेत घटना दुरुस्ती? ; विश्वस्तांच्या कार्यकालात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:24 IST

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नियामक मंडळ आणि विश्वस्तांच्या कार्यकालामध्ये वाढ करण्यासाठी घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नियामक मंडळ आणि विश्वस्तांच्या कार्यकालामध्ये वाढ करण्यासाठी घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेला वेग आला आहे.नियामक मंडळाचा कार्यकाल पाच वर्षे आणि विश्वस्तांचा सात वर्षे करण्यात येण्याच्या प्रस्तावावर विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मतदान होणार आहे. मात्र, शंभर वर्षांपूर्वीची घटना बदलून शताब्दी वर्षानिमित्त करण्यात येत असलेल्या या घटनादुरुस्तीबाबत काही आजीव सभासदांनी नाराजी व्यक्त केली आहे.भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या शताब्दी वर्षाची सांगता ६ जुलै रोजी झाली. शताब्दी वर्षानिमित्त संस्थेने अनेक नवीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.नवीन प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी नियामक मंडळ आणि विश्वस्तांना पुरेसा कालावधी मिळावा, यादृष्टीने नियामक मंडळाचा कार्यकाल तीन वर्षांवरून पाच वर्षे आणि विश्वस्तांचा कार्यकाल पाचवरून सात वर्षे करावा, असा प्रस्ताव वर्धापनदिनी झालेल्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता.मात्र, संस्थेच्या घटनेनुसार या सभेस पुरेसे सदस्य उपस्थित नसल्याने हा प्रस्ताव मागे घेण्यात आला. मात्र, संस्थेच्या घटनेतील तरतुदीनुसार २५ सदस्यांनी लेखी निवेदन दिल्यास विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची तरतूद घटनेमध्ये आहे. त्यानुसार, आता संस्थेच्या नियामक आणि कार्यकारी मंडळाच्या कार्यकालामध्ये वाढ करण्यासाठी शनिवारी (५ आॅगस्ट) विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. परंतू, शंभर वर्षांपूर्वीची घटना बदलून शताब्दी वर्षानिमित्त करण्यात येत असलेल्या या घटनादुरुस्तीबाबत काही आजीव सभासदांनी नाराजी व्यक्त केली आहे.दर तीन वर्षांनी २५ जागांसाठी निवडणूक -भांडारकर संस्थेच्या घटनेनुसार, दर तीन वर्षांनी नियामक मंडळाच्या २५ जागांसाठी निवडणूक घेतली जाते. या घटनेनुसार, शंभर वर्षे संस्थेची वाटचाल झालेली आहे. मात्र, शताब्दी वर्षात नव्याने निवडून आलेल्या नियामक मंडळाच्या सदस्यांना तीन वर्षांचा कालावधी अपुरा पडू लागल्याने तो पाच वर्षांचा करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संस्थेच्या वर्धापन दिनाच्या सर्वसाधारण सभेतच ही दुरुस्ती करून घेण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यामुळे, आता शनिवारी होत असलेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मंजुरीसाठी येणार असल्याने संस्थेच्या आजीव सभासदांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नियामक मंडळाचा कालावधी वाढवून घेण्यामागे सत्ता ताब्यात घेण्याचा हेतू सहजगत्या साध्य होत आहे, अशी माहिती संस्थेच्या आजीव सभासदांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.शताब्दी वर्षानिमित्त भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे अनेक नवीन प्रकल्प, योजना हाती घेण्यात आल्या आहेत. कोणताही प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी किमान साडेतीन-चार वर्षांचा कालावधी लागतो. अशा परिस्थितीत तीन वर्षांनी नियामक मंडळ आणि पाच वर्षांनी विश्वस्त बदलल्यास नव्या सदस्यांना सर्व काम नव्याने हाती घ्यावे लागेल. त्यामुळे नियामक मंडळ आणि विश्वस्तांचा कालावधी अनुक्रमे पाच आणि सात वर्षे करण्याचा प्रस्ताव शनिवारी विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मांडून घटनादुरुस्तीबाबत चर्चा केली जाणार आहे. नियामक मंडळ आणि विश्वस्त या दोघांचाही कार्यकाल पाच वर्षांचाच ठेवावा, अशी मागणी काही आजीव सदस्यांनी केली आहे. मात्र, प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने आणि संस्थेच्या प्रक्रियेनुसार, वास्तवात ते शक्य होणे अवघड आहे.-राहुल सोलापूरकर, विश्वस्त