शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

“भगतसिंह कोश्यारींनी ‘ते’ पत्र सर्वांसमोर आणावे”; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2023 23:34 IST

भगतसिंह कोश्यारी आता राज्यपाल पदावर नाहीत, त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यास मी बांधील नाही, असे अजित पवार म्हणाले.

पुणे: माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरेंवर टीका करताना काही गंभीर आरोप केले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर बोलताना अजित पवार म्हणाले, भगतसिंह कोश्यारी यांना धमकी दिली असेल तर ते पत्र रेकॉर्डवर असेल, ते पत्र त्यांनी सर्वांसमोर आणावे. भगतसिंह कोश्यारी यांच्याजवळ खरेच पत्र असेल तर त्यांनी मीडियाला द्यावे आणि ते जनतेसमोर आणावे. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

भगतसिंह कोश्यारी आता राज्यपाल पदावर नाहीत, त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यास मी बांधील नाही. आता आमच्यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. आम्ही निवडणुकीमध्ये लक्ष घातले आहे. दिवसभर रवींद्र धंगेकरांच्या रॅलीत होतो. त्यामुळे ते काय बोलले ते मी नीट ऐकले नाही. ते जे काही बोलले ते उद्या ऐकेन आणि त्यानंतर उत्तर देईन, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, आज महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी रॅली काढली होती. त्याला कसबा मतदार संघातील पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. रात्रीचे १० वाजेपर्यंत कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून राहिला. मी आणि रवींद्र जेव्हा पुणेकरांना अभिवादन करत होतो तेव्हा ते अतिशय मनापासून आम्हाला प्रतिसाद देत होते, असेही त्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी