शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

भादलवाडी तलावाने तळ गाठला, पाण्यासाठी होतेय पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:36 IST

पाण्यासाठी पायपीट : तलावात पाणी सोडण्याची मागणी

पळसदेव : पळसदेव परिसरातील भादलवाडी तलावाने तळ गाठला आहे. यामुळे या परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या तलावात पाणी सोडण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. पाऊस पडेना, तलावात पाणी येत नाही, त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पश्चिम भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. उभी पिके जळून गेली आहेत. रात्री कडाक्याची थंडी अन् दिवसा कडक ऊन अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. विहिरीतील पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत.

तलावात पाणी नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. ऊसपिकाला अधिक फटका बसला आहे. सध्या खडकवासला कालव्याचे आवर्तन सुरू आहे. त्या आशेवर शेतकरी बसला आहे. मात्र तलावांमध्ये पाणी काही येत नाही. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तलावात पाणी सोडण्याबाबत जलसंपदा खाते दुजाभाव करीत आहे. तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी तलावात पाणी सोडण्याबाबत निष्क्रिय आहेत. एकमेकांवर टीका करण्यापलीकडे त्यांना काही जमत नाही. अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केल्या.पाणीप्रश्न गंभीर बनला असताना त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. हिवाळ्यात ही परिस्थिती तर उन्हाळ्यात काय होणार, याचा प्रत्यय आताच येऊ लागला आहे. गाय, म्हैस या जनावरांना चारा नसल्याने भटकंती करावी लागत आहे. वन्यप्राणी चारयासाठी व पाण्याच्या शोधार्थ सैरभैर फिरताना दिसतात. जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी दुष्काळी परिस्थितीची जाण ठेवून तरी तलावांमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.भादलवाडी येथील तलावातील मच्छीमार चिंताग्रस्त४भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावावर येथील मच्छीमार अवलंबून आहे. या तलावात सुमारे अडीच लाख रुपये खर्च करून मत्स्यबीज सोडण्यात आले होते. मात्र पाणी आटल्याने हे मत्स्यबीज मृत्युमुखी पडत आहे.४तसेच पक्ष्यांच्या भक्ष्यस्थानी शिकार ठरत आहे. तरी या तलावात पाणी सोडण्याची मागणी माजी सरपंच अशोक भंडलकर यांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणे