शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

भादलवाडी तलावाने तळ गाठला, पाण्यासाठी होतेय पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:36 IST

पाण्यासाठी पायपीट : तलावात पाणी सोडण्याची मागणी

पळसदेव : पळसदेव परिसरातील भादलवाडी तलावाने तळ गाठला आहे. यामुळे या परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या तलावात पाणी सोडण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. पाऊस पडेना, तलावात पाणी येत नाही, त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पश्चिम भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. उभी पिके जळून गेली आहेत. रात्री कडाक्याची थंडी अन् दिवसा कडक ऊन अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. विहिरीतील पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत.

तलावात पाणी नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. ऊसपिकाला अधिक फटका बसला आहे. सध्या खडकवासला कालव्याचे आवर्तन सुरू आहे. त्या आशेवर शेतकरी बसला आहे. मात्र तलावांमध्ये पाणी काही येत नाही. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तलावात पाणी सोडण्याबाबत जलसंपदा खाते दुजाभाव करीत आहे. तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी तलावात पाणी सोडण्याबाबत निष्क्रिय आहेत. एकमेकांवर टीका करण्यापलीकडे त्यांना काही जमत नाही. अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केल्या.पाणीप्रश्न गंभीर बनला असताना त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. हिवाळ्यात ही परिस्थिती तर उन्हाळ्यात काय होणार, याचा प्रत्यय आताच येऊ लागला आहे. गाय, म्हैस या जनावरांना चारा नसल्याने भटकंती करावी लागत आहे. वन्यप्राणी चारयासाठी व पाण्याच्या शोधार्थ सैरभैर फिरताना दिसतात. जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी दुष्काळी परिस्थितीची जाण ठेवून तरी तलावांमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.भादलवाडी येथील तलावातील मच्छीमार चिंताग्रस्त४भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावावर येथील मच्छीमार अवलंबून आहे. या तलावात सुमारे अडीच लाख रुपये खर्च करून मत्स्यबीज सोडण्यात आले होते. मात्र पाणी आटल्याने हे मत्स्यबीज मृत्युमुखी पडत आहे.४तसेच पक्ष्यांच्या भक्ष्यस्थानी शिकार ठरत आहे. तरी या तलावात पाणी सोडण्याची मागणी माजी सरपंच अशोक भंडलकर यांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणे