शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भोरला टंचाईग्रस्त गावांची थट्टा!

By admin | Updated: May 30, 2017 02:15 IST

पावसाळा सुरू होत आला तरी पंचायत समितीत टंचाई कक्षच नाही. प्रभारी उपअभियंताही आठवड्यातून एकदाच फक्त मंगळवारीच हजर

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : पावसाळा सुरू होत आला  तरी पंचायत समितीत टंचाई कक्षच नाही. प्रभारी उपअभियंताही आठवड्यातून एकदाच फक्त मंगळवारीच हजर असतात. त्यामुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांनी आपली व्यथा मांडायची तरी कुठे व कोणाकडे, असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ करीत आहेत. टँकरबाबत आमची थट्टा सुरू असल्याची व्यथा ते मांडत आहेत.ग्रामीण पाणीपुरवठा विभाग म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी आवस्था झाली आहे.तालुक्यातील भाटघर व नीरादेवघर धरणातील पाणीसाठी अत्यल्प झाल्याने १० गावे आणि १३ वाड्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात सादर केले आहेत. त्यापैकी ३ टँकर व २ पिकअप जीप मंजूर करून टंचाईग्रस्त गावातील लोकांची बोळवण केली आहे.टंचाईबाबत ग्रामस्थ पाणीपुरवठा विभागात आल्यास प्रभारी उपअभियंता आठवड्यातून एकदाच येत असल्यामुळे त्यांचे दर्शनच होत नाही तर शाखा अभियंता फिरतीवर असल्याचे सांगितले जाते. यामुळे येथील एखाद्या लिपिकाशी बोलून सरपंच, ग्रामस्थ किंवा ग्रामसेवकाला घरचा रस्ता धरावा लागतो. मंगळवारशिवाय पाणीपुरवठा विभागातील कोणताच अधिकारी भेटत नाही. शिवाय पुण्याला मीटिंग असली तरी तेही शक्य होत नसल्याचे भगवान कंक यांनी सांगितले. अनेक गावातील टंचाई, एकात्मिकसाठी व नवीन योजना करण्यासाठी अंदाजपत्रकासाठी सहा-सहा महिने वारंवार हेलपाटे मारावे लागतात.तर काम झाल्यावर एम. टी (मूल्यांकन) करण्यासाठी येथील शाखा अभियंता ढाब्यावर जेवण व आर्थिक तरतूद प्रथम केल्यावरही वारंवार हेलपाटे मारुन वेळवर एम. बी. मिळतच नाही. सहा सहा महिने पैसे काढता येत नसल्याने अनेक पाणीपुरवठा योजना तीन ते चार वर्षे होऊनही पूर्ण झालेल्या नाहीत. त्याचाही परिणाम टंचाईवर होत आहे. संबंधित शाखा अभियंत्यांकडून कामे वेळेवर होत नसल्याने ठेकेदार व सरपंच यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सरपंच सांगतात. येथील काही शाखा अभियतंत्यांना अनेक वर्षे झाल्याने ते सरपंच नागरिक व ग्रामसेवकांची पिळवणूक करीत आहेत. त्यांच्यावर प्रभारी उपअभियंत्यांचा अंकुश नाही. त्यामुळे त्यांची बदली करण्याची मागणी होत आहे.