शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

"बेशिस्त पार्किंगच्या छायाचित्राला मिळणार बक्षीस"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 05:32 IST

पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. पार्किंगला जागा उपलब्ध नसून बेशिस्तपणा वाढला आहे.

पुणे : पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. पार्किंगला जागा उपलब्ध नसून बेशिस्तपणा वाढला आहे. या बेशिस्तीला आवर घालण्यासाठी पुढील काळात बेशिस्तपणे वाहन लावल्याचे छायाचित्र काढून पाठविणाऱ्यास दंडापैकी २० टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी कायदा केला जाणार असल्याचे सुतोवाच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.सिम्बायोसिस स्किल्स अ‍ॅण्ड ओपन युनिव्हर्सिटीच्या वतीने किवळे येथे ‘लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन आणि एमएसएमई क्षेत्रातील संधी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. लॉजिस्टिक स्किल कौन्सिल (एलएससी) चे परिषदेला सहकार्य होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रो-कुलगुरू डॉ. स्वाती मुजूमदार,डॉ. श्रवण कडवेकर, डॉ. रामानुजन आदी उपस्थित होते. गडकरी यांच्या हस्ते यावेळी रस्ते सुरक्षा आणि अपघात संशोधनासाठी नव्याने उभारलेल्या ‘जे पी रिसर्च सेंटर आॅफ एक्सलन्सचे’ चे उद्घाटन झाले.देशातील पार्किंगच्या गंभीर स्थितीविषयी गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. तसेच या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, कमी जागेत अधिक वाहनांचे पार्किंग करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परिवहन विभागाच्या सर्वेक्षणानुसार देशात राज्य शासनाच्या सहकार्याने दोन हजारांहून अधिक बस पोर्ट उभारता येऊ शकतात. बसस्थानकांमधील मोठ्या प्रमाणावरील जागेचा वापर त्यासाठी करता येईल. याचा उपयोग बसस्थानकांसह इतर दळणवळणाच्या सोयींना जोडण्यासाठीही करता येणार आहे. तसेच विविध कार्यालये, दुकाने, बँका आदी व्यावसायिक कारणांसाठी बसपोर्टचा उपयोग होईल. नॅशनल हायवे अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून दिल्लीतील आपल्या कार्यालयासमोर ‘ईझी पार्क’ ही स्वयंचलित कार पार्किंग इमारत उभारली. अशाप्रकारच्या ५० पेक्षा अधिक इमारती मोठ्या शहरांमध्ये उभारण्यात येत असल्याचे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी