शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

बैलगाडा शर्यतीविना यात्रा ओस; ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 02:13 IST

- शिवाजी आतकरी  खेड : बैलगाडा शर्यत आणि यात्रा-जत्रा हे ग्रामीण भागातीली यात्रांचे खरे समीकरण. मात्र बैलगाडी शर्यतीला न्यायालायने ...

- शिवाजी आतकरी खेड : बैलगाडा शर्यत आणि यात्रा-जत्रा हे ग्रामीण भागातीली यात्रांचे खरे समीकरण. मात्र बैलगाडी शर्यतीला न्यायालायने घातलेल्या बंदीमुळे हे समीकरण विस्कटलेले आहे. सध्या दुष्काळ, शेतमालास कवडीमोल भाव, आणि बैलगाडा शर्यत अभावी रोडावलेल्या यात्रा या सर्वांचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झाला आहे.यात्रा होत नसल्यामुळे आर्थिक उलाढालीचा आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा आर्थिक कणा बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळे मोडला आहे. बैलगाडा शर्यतबंदीचा वाद न्यायप्रविष्ट असला तरी बैलगाडा शौकिनांचे आणि छोट्यामोठ्या व्यावसायिकांचे डोळे यात्रा जत्रांच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतीकडे लागले आहे.पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यात बैलगाडी शर्यत म्हणजे मोठा इव्हेंट होत असे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असे. त्यामध्ये वाहतूक करणाऱ्या वाहनांना काम मिळत असे. तसेच यानिमित्ताने होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांचे स्टॉल, विविध साहित्याचे वितरक, विविध खेळाचे साहित्य इथपासून ते मंडप- लाऊड स्पीकरवाला या सर्वांच्या हाताला काम मिळत असे. चांगला रोजगार यातून उपलब्ध होत असे. त्यातून चांगली उलाढाल होत असे. या सर्व उलाढालीचा सकारात्मक परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होऊन त्यास चालना मिळत होती.शर्यतीच्या बैलांच्या किमतीही त्यामुळे वाढल्या होत्या. बैलव्यापारालही त्यामुळे चालना मिळत होती. बैलगाडा घाटात समालोचन करणाऱ्यांंनाही सुगीचे दिवस आले होते. बैलांना चुकून इजा झाल्यास शेतकºयांना भुर्दंड नको म्हणून विमा कंपन्यांची सुरुवातही झाली होती. त्यामुळे एकूणच यात्रा आणि बैलगाडा शर्यत हे समीकरण झाले होते. त्यातून होणारी रोजगारनिर्मिती पाहता ग्रामीण अर्थव्यस्थेला चालना मिळून एक समाधानी व उत्साही वातावरण यात्रांच्या निमित्ताने पाहण्यास मिळत होते. दरम्यान काही संघटनांनी यावर आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतल्याने शर्यतीस ब्रेक लागला. एरव्ही राजकीय विरोधक असणारे बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून आपापल्या परीने प्रयत्न करू लागले. त्यात यश आले नाही. बैलगाडा शर्यत हा विषय न्यायप्रविष्ट आहे. या शर्यती सुरू झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. सध्या तरी बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळे यात्रा जत्रा ओस पडत आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एकप्रकारे खीळ बसली आहे.दुष्काळात तेरावा महिनासध्या दुष्काळाची गदड छाया संपूर्ण जिल्ह्यावर आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ््यात दुष्काळामुळे अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे किमान गावातील अर्थव्यवस्थेला तारणारी बैैलगाडीची शर्यत सुरु व्हावी यासाठी न्यायालयात एकजुटीने लढण्याचा मानस गावकºयांनी केला आहे. मात्र न्यायालयाने याला परवानगी दिली नाही तर बैैलांची शर्यत थांबेल मात्र गावकºयांना पुन्हा त्यांच्या पोटासाठी आणि जगण्यासाठी धावाधाव करावी लागेल.

टॅग्स :Khedखेड