शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरवाडीत स्वखर्चातून विहिरीच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 01:20 IST

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना : पाणीप्रश्न सुटणार

चासकमान : कोहिंडे बुद्रुक (ता. खेड) गावातील गणेशखिंड ठाकरवाडीमध्ये तान्हाजी कचाटे यांनी स्वत:च्या पैशातून विहीर खोदायला सुरुवात केली आहे. यामुळे आदिवासी बांधवांना करावी लागणारी मैलोन्मैलची भटकंती थांबणार असून, आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. या विहिरीचे पूजन सामाजिक कार्यकर्ते तान्हाजी कचाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

कोहिंडे बुद्रुक गावापासून ४ किलोमीटर अंतरावर पाईट रोडवर उंच डोंगरावर गणेशखिंड येथे अनेक पिढ्यांपासून आदिवासी बांधव राहात असून, ठाकरवाडीमध्ये सुमारे २०० लोकवस्ती आहे. परंतु या वस्तीला पिण्याच्या पाण्याचा कुठल्याही प्रकारे स्रोत नसल्याने आदिवासी बांधवांना ऐन नोव्हेंबर महिन्यापासूनच पहाटे उठून पाणी आणण्यासाठी मैलोन् मैल भटकंती करावी लागते. त्यात विहिरीमधील पाण्याने दर वर्षी तळ गाठत असल्याने अनेकदा घरातील अबालवृद्धांबरोबरच विद्यार्थ्यांना हातातील कामधंदा बुडवून पाणी शेंदून आणावे लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत होते. तसेच कोंहिडे ग्रामपंचायतीने शासनदरबारी पाठपुरावा करूनही या आदिवासी बांधवांना पाणी देण्यासाठी अपयश आले होते. शासनाने आदिवासी बांधवांना कूपनलिका खोदून दिली असती तरी दशकापूर्वीच आदिवासी बांधवांचा पाणी प्रश्न निकाली निघाला असता. या सर्व प्रकाराचा पाठपुरावा करूनही कोणत्याही राजकीय पुढाºयाने दखल न घेतल्याने तसेच शासनाच्या निधीची वाट पाहण्यात वेळ घालविण्यापेक्षा आपली पिढीही दुष्काळात जाईल हे आदिवासी बांधवांच्या लक्षात आल्यावर हा विषय गावातील सामाजिक कार्यकर्ते तान्हाजी कचाटे यांच्या कानावर घातला. तान्हाजी कचाटे यांनी आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने पाणी हेच जीवन मानून कुठल्याही प्रकारे पैशाचा विचार न करता स्वत:च्या पैैशातून मागील वर्षीपासून टँकरने आदिवासी बांधवांना पाणीपुरवठा केला. या वर्षी कचाटे यांनी स्वत:च्या पैशातून विहीर खोदलेल्या विहिरीला पाणी लागले असल्याने डोक्यावरचा हंडा खाली उतरणार असल्याने महिलांच्या चेहºयावर हास्य फुलले होते. यावेळी तान्हाजी कचाटे, सुदाम कुटे, अमोल पिंगळे, प्रदीप कंद, हिरामण कंद, नामदेव कंद, भरत घोलप आदी उपस्थित होते.ग्रामस्थांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार४ठाकरवाडीतील २00 पेक्षा अधिक असलेल्या लोकवस्तीला पिण्याच्या पाण्याच्या कोणताही स्त्रोत नसल्याने ग्रामस्थांना पाण्याची टंचाई४विहिरीमधील पाण्याने दर वर्षी तळ गाठत असल्याने अनेकदा पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना वणवण फिरावे लागत असल्याने त्यांच्या मध्ये नाराजी दिसून येत आहे.४गावातील पाण्याच्या टंचाईचा विचार करून तान्हाजी कचाटे यांनी स्वखर्चातून गावात विहीर खोदण्याच्या कामाला सुरूवात केली.

टॅग्स :Puneपुणे