शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

पुरंदर उपसा योजनेतून चार दिवसांनंतर पाणी सोडण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 22:53 IST

दिवाळीच्या सुटीत होती योजना बंद : वाघापूरला पोहोचले पाणी, दुष्काळात ठरणार फायदेशीर

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याला वरदान ठरणारी पुरंदर उपसा जलसिंचन योजना दिवाळी सुट्टीनंतर पुन्हा सुरू करण्यात आली. योजनेचे पाणी वाघापूर येथील पंप गृहाजवळ दुपारी सव्वा बारा वाजता आले. चार दिवसांनंतर योजना सुरू झाल्याने पाण्याची मागणी केलेल्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

पुरंदर तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती वाढू लागली आहे. त्यात पुरंदरच्या पूर्व भागात तर तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागायचा. मात्र, पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाली आणि काही अंशी दुष्काळीची तीव्रता कमी झाली. त्यात ८१ टक्के वीजबिलाचा वाटा सरकारने उचलल्याने फक्त १९ टक्के वीजबिल लाभार्थी गावातील शेतकºयांना भरावे लागत आहे. यामुळे सध्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे.

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील १४ हजार ४५०, दौंड तालुक्यातील ३ हजार ७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६ हजार ४९८ असे २ लाख ५६ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. सध्या या योजनेचे दोन पंप सुरू असून ४ हजार ५०० लिटर पाणी प्रति सेकंदाला मिळत आहे. सध्या रब्बी हंगामातील पाणी सुरू आहे. या योजनेचे पाणी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकºयांकडून रितसर अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती वाढू लागली आहे. आता कसेबसे जगण्यासाठी पुरंदर उपसा जलसिंचन योजना हाच एक पर्याय उरला आहे. सध्या मागणी वाढल्याने लाभार्थी शेतकºयांना पाणी मिळण्यास उशीर होत आहे. यामुळे ही योजना एकही दिवस बंद राहणार नाही याची सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे मागणीनुसार प्रत्येक शेतकºयांना लवकरात लवकर पाणी मिळेल.टंचाईमधून पाणी सोडणे गरजेचे४पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्यापासून पुरंदर तालुक्यातील पिण्याच्या टँकरची संख्या कमी झाली आहे. गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गावचे सरपंच, उपसरपंच पाण्याचे पैसे भरून गावाजवळील तलाव बंधारे भरुन घेत आहेत. यामुळे गावच्या सार्वजनिक विहिरी, कुपनलिका यांची पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे टँकरची मागणी करण्यापेक्षा पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरळीत चालू राहणे गरजेचे आहे. सध्या पुरंदर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने टंचाईतून पुरंदर तालुक्याला मोफत पाणी मिळण्याची मागणी लाभार्थी गावातीलशेतकºयांनी केली आहे.सध्या पाण्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकरी या पाण्याकडे टक लावून बसला आहे. सर्वसामान्यांना सुरळीत पाणी देण्यासाठी काहीही झाले तरी ही योजना एकही दिवस बंद राहता कामा नये, तसे आदेश महाराष्ट्रचे जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी पंपहाऊसवर झालेल्या शेतकरी व अधिकारी यांच्या आढावा बैठकीत दिले होते. 

टॅग्स :PuneपुणेFortगड